दहावीचा निकल आज दुपारी जाहीर झाला आहे. दुपारी 1 वाजल्यापासून हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येतो आहे. मात्र लाखो विद्यार्थी निकाल बघत असल्याने निकालाची वेबसाईट क्रॅश झाली. ही वेबसाईट क्रॅश झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहण्यास अडचणी येत आहेत. http: //result.mh-ssc.ac.in आणि mahahssc board.in या दोन्ही वेबसाईटवर निकाल जाहीर झाला. मात्र अजूनही वेबसाईट क्रॅशच आहे. (SSC Website Crash) बोर्डाकडून याबाबतची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र वेबसाईटचे हिट्स वाढल्याने वेबसाईट क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
ही वेबसाईट गेल्या दोन तासांपासून क्रॅश झाली आहे. ही वेबसाईट पूर्ववत होण्यासाठी आणखी एक ते दोन तास लागू शकतात असंही समजतं आहे. निकालच्या दोन्ही वेबसाईट्सवर युजर्स वाढल्याने वेबसाईट क्रॅश झाली, ती पूर्ववत करण्याचं काम सुरू आहे मात्र तोपर्यंत विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणतात..
दहावीच्या निकालाचे संकेतस्थळ लवकरच पुर्ववत सुरू करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. संकेतस्थळ लवकरच पुर्ववत सुरू होऊन विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल बघता येईल असा दिलासा त्यांनी दिला आहे.
माध्यमिक शालांत परीक्षेच्या संकेतस्थळावर अचानक भेट देणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे संकेतस्थळ काही काळासाठी क्रॅश झाल्याने विद्यार्थांना आपला निकाल बघता आला नाही. या सर्व तांत्रिक बिघाडाची चौकशीचेही प्रा. गायकवाड यांनी निर्देश दिले आहेत.
Maharashtra SSC Result 2021: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या 2021 परीक्षेच्या निकाल 16 जुलै 2021 जाहीर करण्यात आला आहे. (Maharashtra SSC result 2021) यंदाच्या निकालाची खासियत म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच आपलं निकाल पत्र हाती मिळणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदाची दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे अंतर्गत मुल्यमापनाच्या जोरावर मुलांना यंदा दहावीचे गुण देण्यात आले आहेत.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदाची दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना यंदा दहावीचे गुण देण्यात आले आहेत.
असा आहे विभागवार निकाल
राज्याचा निकाल 99.95 टक्के
नऊ विभागीय मंडळाने घेतली परीक्षा
सर्वात जास्त निकाल 100 टक्के कोकण
सर्वात कमी निकाल 99.84 टक्के नागपूर
औरंगाबाद 99.96 टक्के
मुंबई 99.96 टक्के टक्के
कोल्हापूर 99.92 टक्के
अमरावती 99.98 टक्के
नाशिक 99.96 टक्के
लातूर 99.96 टक्के
एकूण 15 लाख 75 हजार 752 विद्यार्थी संपादणूक शाळांकडून प्राप्त झाली आहे, त्यापैकी 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
ADVERTISEMENT