अनिल देशमुखांनी १०० कोटी मागितले, परमबीर यांच्या आरोपांची सरकार करणार चौकशी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर राज्य सरकारने चौकशीच्या दृष्टीकोनातून पहिलं पाऊल उचललं आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्याकडे १०० कोटींची मागणी केली होती असं परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं होतं. यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. अखेरीस राज्य सरकारने […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 03:15 PM • 30 Mar 2021

follow google news

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर राज्य सरकारने चौकशीच्या दृष्टीकोनातून पहिलं पाऊल उचललं आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्याकडे १०० कोटींची मागणी केली होती असं परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं होतं. यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. अखेरीस राज्य सरकारने परमबीर सिंगांनी केलेल्या आरोपांची एक सदस्यीय समितीकडून चौकशी करण्याचं ठरवलं आहे.

हे वाचलं का?

‘परमबीर सिंग यांना माफीचा साक्षीदार करायचं ठरवलंय, ‘त्या’ पत्रामागे खूप मोठं कारस्थान’

उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलास चांदीवाल हे या प्रकरणाचा तपास करणार आहेत. या समितीला आपल्या चौकशीचा अहवाल ६ महिन्यांमध्ये सादर करायचा आहे. परमबीर सिंग यांनी केलेले आरोप गंभीर होते. मात्र त्यांनी जेव्हा हे आरोप केले तेव्हा त्यांच्यावरच शंका उपस्थित करण्यात आली. त्यानंतर त्यांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने मात्र परमबीर यांना हायकोर्टात जाण्याचे निर्देश दिले. त्यानंतर त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. ज्यावर आता बुधवारी सुनावणी होणार आहे.

सचिन वाझे ते परमबीर सिंग प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शांत का?

परमबीर सिंग यांचा लेटरबॉम्ब

परमबीर सिंग यांची बदली झाल्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच २० मार्चला त्यांनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं. या पत्रामध्ये त्यांनी सचिन वाझेंवर आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. गृहमंत्र्यांनी सचिन वाझेंना मुंबईतील बारमधून महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप त्यांनी आपल्या पत्रात केला. एवढंच नाही तर मुंबई पोलिसांच्या निर्णयांमध्ये अनिल देशमुख ढवळाढवळ करत होते असाही आरोप करण्यात आला.

या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या तमाम नेत्यांकडून मागणी करण्यात आली ती अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची. देवेंद्र फडणवीस यांनी तर पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख यांच्यावर इतर काही आरोपही केले. तसंच अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला पाहिजे ही देखील आग्रही मागणी करण्यात आली. मात्र अनिल देशमुख यांचा काही राजीनामा झाला नाही.

    follow whatsapp