अण्णा हजारेंनी पिळले केजरीवालांचे कान; दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलं खरमरीत पत्र

नवी दिल्ली: दिल्लीतील दारू धोरणात घोटाळे झाल्याच्या बातम्यांवरून सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात अण्णा हजारे यांनी दारू धोरणावर केजरीवाल यांना फटकारले आहे. अण्णा हजारे म्हणाले की, तुमच्या सरकारने महिलांवर परिणाम करणारे दारू धोरण तयार केले, लोकांचे जीवन उद्ध्वस्त केले. तुमच्या कथणी आणि करणीमध्ये फरक आहे. अण्णा […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 08:22 AM • 30 Aug 2022

follow google news

नवी दिल्ली: दिल्लीतील दारू धोरणात घोटाळे झाल्याच्या बातम्यांवरून सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात अण्णा हजारे यांनी दारू धोरणावर केजरीवाल यांना फटकारले आहे. अण्णा हजारे म्हणाले की, तुमच्या सरकारने महिलांवर परिणाम करणारे दारू धोरण तयार केले, लोकांचे जीवन उद्ध्वस्त केले. तुमच्या कथणी आणि करणीमध्ये फरक आहे.

हे वाचलं का?

अण्णा हजारेंनी आपल्या पत्रात काय म्हटले आहे?

अण्णांनी अरविंद केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, टीम अण्णाच्या सदस्यांची 10 वर्षांपूर्वी 18 सप्टेंबर 2012 रोजी दिल्लीत बैठक झाली, त्यावेळी तुम्ही राजकीय मार्ग स्वीकारण्याबाबत बोलले होते. पण राजकीय पक्ष काढणे हे आमच्या आंदोलनाचे उद्दिष्ट नव्हते हे तुम्ही विसरलात. त्यावेळी जनतेच्या मनात टीम अण्णांबद्दल एक विश्वास निर्माण झाला होता. म्हणूनच टीम अण्णाने देशभर फिरून लोकशिक्षण, जनजागृतीचे काम करणे गरजेचे आहे, असे मला त्यावेळी वाटले. या दिशेने काम झाले असते, तर दारूबाबत असे चुकीचे धोरण कुठेही केले नसते.

आम आदमी पार्टीही दुसऱ्या पक्षांसारखी- अण्णा हजारे

सरकार कोणत्याही पक्षाचे असो, सरकारला जनहिताचे काम करण्यास भाग पाडण्यासाठी समविचारी लोकांचा दबावगट असणे गरजेचे असल्याचे अण्णा हजारे म्हणाले. तसे झाले असते तर देशात परिस्थिती वेगळी असती आणि गरिबांना फायदा झाला असता. पण दुर्दैवाने तसे झाले नाही. त्यानंतर आप, मनीष सिसोदिया आणि अन्य सहकाऱ्यांनी मिळून पक्ष स्थापन केला. ऐतिहासिक चळवळ उद्ध्वस्त करून स्थापन झालेला पक्षही इतर पक्षांच्या वाटेवर जाऊ लागला. हे अत्यंत दुःखद आहे.

अण्णा पुढे आपल्या पत्रात म्हणतात ”भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी ऐतिहासिक आणि लोकनियुक्त आंदोलन केले त्यात लाखो लोक आले. त्यावेळी तुम्ही लोकायुक्तांची गरज असल्याबद्दल मंचावरून मोठमोठी भाषणं दिलीत. आदर्श राजकारण आणि व्यवस्थेचे विचार तुम्ही लोकांसमोर ठेवले. पण दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही लोकपाल आणि लोकायुक्त कायदा विसरलात. तुमच्या सरकारने महिलांवर परिणाम करणारे, लोकांचे जीवन उद्ध्वस्त करणारे दारू धोरण केले. यावरून तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात तफावत असल्याचे दिसून येते.

महाराष्ट्रात 252 तालुक्यांत संघटना स्थापन झाली.

महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यांतील 252 तालुक्यांमध्ये संघटना स्थापन केली. भ्रष्टाचाराविरुद्ध आणि व्यवस्था परिवर्तनासाठी सातत्याने आंदोलने झाली. त्यामुळे महाराष्ट्रात 10 कायदे करण्यात आले. सुरुवातीला आम्ही गावात सुरू असलेल्या 35 दारूच्या अड्डे बंद केले. लोकपाल आंदोलनामुळे तुम्ही आमच्यात सामील झालात. तेव्हापासून तुम्ही आणि मनीष सिसोदिया यांनी राळेगणसिद्धी गावाला अनेकदा भेट दिली आहे. ग्रामस्थांनी केलेले काम तुम्ही पाहिले आहे. मागील 35 वर्षांपासून गावात दारू, बिडी, सिगारेट विक्रीसाठी नाही. हे पाहून तुम्हाला प्रेरणा मिळाली. याचेही तुम्ही कौतुक केले. मात्र तुम्ही सत्ता आणि सत्तेतून पैसा या दुष्टचक्रात अडकलेले दिसतात. एका मोठ्या चळवळीतून जन्माला आलेल्या राजकीय पक्षाला हे शोभत नाही, असे त्यांनी केजरीवालांना सुनावले.

    follow whatsapp