विधान परिषद 2023: मी नॉट रिचेबल का होते ते वेळ आल्यावर..: शुभांगी पाटील

मुंबई तक

16 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:16 AM)

नाशिक: नाशिक (Nashik) पदवीधर विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) प्रचंड चुरस पाहायला मिळत आहे. खरं तर या मतदारसंघात एकाही पक्षाचा अधिकृत उमेदवार नाही. येथील सर्वच उमेदवार हे अपक्ष आहेत. मात्र, असं असूनही अवघ्या महाराष्ट्राचं (Maharashtra) लक्ष या निवडणुकीकडेच लागून राहिलं आहे. कारण की आता बलाढ्य उमेदवार समजले जाणारे सत्यजीत तांबे (Satyajeet) यांना अपक्ष शुभांगी […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

नाशिक: नाशिक (Nashik) पदवीधर विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) प्रचंड चुरस पाहायला मिळत आहे. खरं तर या मतदारसंघात एकाही पक्षाचा अधिकृत उमेदवार नाही. येथील सर्वच उमेदवार हे अपक्ष आहेत. मात्र, असं असूनही अवघ्या महाराष्ट्राचं (Maharashtra) लक्ष या निवडणुकीकडेच लागून राहिलं आहे. कारण की आता बलाढ्य उमेदवार समजले जाणारे सत्यजीत तांबे (Satyajeet) यांना अपक्ष शुभांगी पाटील (Shubhangi Patil) या टक्कर देणार आहेत. (vidhana parishad election 2023 why i was not reachable when the time came shubhangi patil)

हे वाचलं का?

सत्यजीत तांबे यांना सहजपणे विजय मिळवता यासाठी त्यांनी आणि भाजपने अप्रत्यक्षरित्या बरेच प्रयत्न केले. शुभांगी पाटील यांनी आपला निवडणूक अर्ज मागे घ्यावा यासाठी बरेच प्रयत्न केले गेले. मात्र, शुभांगी पाटील या निवडणूक लढवण्यावर ठाम होत्या. म्हणून आजच्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत नॉट रिचेबल (not reachable) होत्या. पण याचबाबत नंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी एक मोठा दावा केला आहे.

‘मी आज नॉट रिचेबल का होते ते वेळ आल्यावर सांगेन. काही तरी असल्याशिवाय व्यक्ती नॉटरिचेबल नसतो. हे तुम्हालाही माहिती आहे.’ असं शुभांगी पाटील यावेळी म्हणाल्या. त्यामुळे आता त्यांच्या नॉटरिचेबल असण्याबाबत उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या आहेत.

विधान परिषद: सत्यजीत तांबेंना भिडणारी ‘वाघिण’; कोण आहेत शुभांगी पाटील?

पाहा शुभांगी पाटील नेमकं काय म्हणाल्या:

‘मी नॉट रिचेबल का होते हे तुम्ही समजू शकता.. मी माघार घेतलेली नाही. धनशक्ती की जनशक्ती हे जनता ठरवणार आहे. मला विश्वास आहे जनतेवर आणि महाविकास आघाडीवर. 2 तारखेला आम्ही नक्कीच विजय मिळवू.’

‘मी माझ्या उमेदवारीवर ठाम आहे. पण मी आज नॉट रिचेबल का होते ते वेळ आल्यावर सांगेन. काही तरी असल्याशिवाय व्यक्ती नॉटरिचेबल नसतो. हे तुम्हालाही माहिती आहे. मला पूर्ण विश्वास आहे उद्धव ठाकरे, नाना पटोले, अजित पवार किंवा जयंत पाटील या सगळ्या पक्षश्रेष्ठींवर माझा विश्वास आहे.’

‘महाराष्ट्रातील एकमेव महिला उमेदवारावर त्यांनी विश्वास टाकला आहे. मी सगळ्यांशी संपर्क साधला आहे. ठाकरे साहेबांकडे जाऊन आले तेव्हा त्यांनी मला त्यांचे आशीर्वाद दिले आहेत. मी नाना पटोले, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याशीही संपर्क साधला आहे.’

Shubhangi Patil : ठाकरेंची ताकद मिळताच शुभांगी पाटलांनी फुंकलं रणशिंग!

‘काम करणाऱ्या व्यक्तीबाबत भाजपने वेगळा विचार केला असेल. म्हणून भाजपने मला संधी दिली नाही. पण महाविकास आघाडी नक्कीच मला संधी देईल.’

‘मी तीन महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये गेले होते. मला भाजपने शब्द दिला होता म्हणून मी पक्षात गेले होते. नाहीतर तीन महिन्यांसाठी कोणी गेलं नसतं. काही तरी शब्द दिला असेल म्हणूनच तर मी गेले होते ना पक्षात. तुम्ही पक्षात या आम्ही विचार करु असं ते त्यावेळी म्हणाले होते.’

‘मी बऱ्याच शिक्षक संघटनांशी चर्चा केली आहे. ते मला पाठिंबा देतील. उमेदवारी अर्ज आता कायम झाला आहे. त्यामुळे लढण्यासाठी मला शिक्षक संघटनाच पाठबळ देतील.’

‘महाविकास आघाडीचे वरिष्ठ चांगलाच निर्णय घेतील. असा मला विश्वास आहे. मी अपक्ष उमेदवार आहे. महाविकास आघाडीकडे पाठिंबा मागते आहे.’ असं म्हणत शुभांगी पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

    follow whatsapp