महाराष्ट्रातल्या कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातीन अनेक छोटी-मोठी गावं, शहरं पुराच्या विळख्यात सापडली आहेत. चिपळूण, खेड, महाड या भागाला या पावसाचा सर्वात जास्त फटका बसला आहे. सध्या या भागात पावसाचा जोर ओसरला असला तरीही अनेक भागांमध्ये पुराचं पाणी अजून कायम आहे. NDRF आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणेच्या सहाय्याने या भागात रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT