महाराष्ट्रात 2 कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं, कोरोनामुक्तांची संख्या जास्त आहे… ही आकडेवारी सुखावणारी जरी असली तरी महाराष्ट्रासमोरचं कोरोनाचं संकट अजून मिटलेलं नाही. हे सांगण्याचं कारण म्हणजे. महाराष्ट्रात 12 कोटींहून अधिक लोकसंख्या असताना केवळ 2 कोटी नागरिकांना लसीचं कवच मिळालंय. अशात उरलेल्या 10 कोटी म्हणजेच जवळपास 80 टक्के जनतेला अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. अशाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा विस्फोट होईल का, असा प्रश्न आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT