AIMIM leader abdul salam alias aslam mukhiya : एआयएमआयएमच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. अब्दुल सलाम ऊर्फ अस्लम मुखिया असे हत्या झालेल्या नेत्याचे नाव आहे. या घटनेनंतर पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी संताप व्यक्त केला आहे. (AIMIM Leader Shot dead in Bihar)
ADVERTISEMENT
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. जळगावमध्येही भाजपच्या माजी नगरसेवकाची हत्या करण्यात आली. त्याचबरोबर कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केला. या घटनांमुळे महाराष्ट्राचा बिहार झाला, अशी टीका विरोधकांकडून होत असतानाच आता बिहारमध्ये ही घटना घडली आहे.
एमआयएमच्या नेत्याची हत्या
बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यात ही घटना घडली. एमआयएमचे प्रदेश सचिव अब्दुल सलाम ऊर्फ अस्लम मुखिया असे गोळ्या घालून हत्या करण्यात आलेल्या नेत्याचे नाव आहे. गोपालगंजमधील नगर पोलीस ठाणे हद्दीत एनएच ५३१ रस्त्यावर कार अडवून हत्या करण्यात आली.
मयत अस्लम मुखिया यांनी नोव्हेंवर २०२३ मध्ये गोपालगंज विधानसभा पोटनिवडणूक लढवली होती. ते गोपालगंज मदरसा इस्लामियाचे सचिवही होते. मुखिया हे त्यांचे मित्र फैसल इमाम मुन्ना यांच्यासोबत लखनौला निघाले होते. रेल्वे स्टेशनकडे जात असतानाच मोटारसायकलवर आलेल्या हल्लेखोरांनी त्यांची कार थांबवली. त्यानंतर त्यांच्या गोळीबार केला.
मुखिया यांची हत्या केल्यानंतर हल्लेखोर शस्त्र दाखवत घटनास्थळावरून फरार झाले. दरम्यान, मुखिया यांना परिसरात असलेल्या लोकांनी रुग्णालयात दाखल केले. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक स्वर्ण प्रभात यांनी एसआयटी नेमली आहे.
असदुद्दीन ओवेसी संतापले
या घटनेनंतर असदुद्दीन ओवेसी यांनी बिहार सरकारला लक्ष्य केलं आहे. त्यांनी म्हटले आहे की, "गोपालगंज पोटनिवडणुकीतील एमआयएमचे उमेदवार राहिलेले पक्षाचे प्रदेश सचिव अब्दुल सलाम ऊर्फ अस्लम मुखिया यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. प्रेषिताकडे प्रार्थना करतो की, त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो."
"गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आमचे सिवानचे जिल्हाध्यक्ष आरिफ जमाल यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. नितीश कुमार, तुम्हाल खुर्ची वाचवा स्पर्धेतून वेळ मिळाला तर थोडं कामही करा? फक्त आणच्या नेत्यांनाच का लक्ष्य केलं जात आहे. त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळेल का?", असा सवाल ओवेसींनी केला आहे.
ADVERTISEMENT