Narendra Modi on Ajit Pawar death : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त करत भावनिक ट्वीट केलं आहे. बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येताच देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्या कार्याविषयी भाष्य करत अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
ADVERTISEMENT
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “श्री. अजित पवार जी... जनतेचे नेते होते. त्यांचा तळागाळातील लोकांशी घट्ट संपर्क होता. महाराष्ट्रातील जनतेची सेवा करताना ते नेहमीच अग्रभागी होते आणि कष्टाळू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा मोठा सन्मान होता. प्रशासनिक विषयांची सखोल जाण तसेच गरीब व वंचित घटकांना सक्षम करण्याची त्यांची आस्था विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आणि असंख्य चाहत्यांना मनापासून संवेदना. ओम शांती.”
यासोबतच बारामतीतील विमान अपघाताबाबतही पंतप्रधानांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. “महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघाताने मन अत्यंत व्यथित झाले आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्या सर्वांच्या मी विचारांत आहे. या कठीण प्रसंगी शोकाकुल कुटुंबीयांना धैर्य आणि शक्ती मिळो, अशी प्रार्थना करतो,” असं मोदी यांनी म्हटलं आहे.
अजित पवार यांच्या अचानक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. एक तळागाळाशी जोडलेला, प्रशासनावर मजबूत पकड असलेला आणि जनतेसाठी झटणारा नेता महाराष्ट्राने गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
रिनोवेशनचे काम सुरु असताना पाऊस आला, मजूर पडीक खोलीत आश्रयाला गेले, अन् दोन वर्ष सडलेला मृतदेह आढळला
ADVERTISEMENT











