ठाकरे बंधू आणि मविआच्या निवडणूक आयोगाविरोधातील 'सत्याचा मोर्चा'ला सुरुवात; पण मागण्या कोणत्या?

Satyacha Morcha, Mumbai : ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीचा निवडणूक आयोगाविरोधात 'सत्याचा मोर्चा'; पण मागण्या कोणत्या?

Satyacha Morcha Thackeray

Satyacha Morcha Thackeray

मुंबई तक

01 Nov 2025 (अपडेटेड: 01 Nov 2025, 01:28 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

ठाकरे बंधू आणि मविआचा निवडणूक आयोगाविरोधात 'सत्याचा मोर्चा'

point

मनसे आणि महाविकास आघाडीच्या मागण्या कोणत्या?

Satyacha Morcha, Mumbai : मतदारयाद्यांतील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात आज महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र येत आहेत. दोन्ही पक्षांनी निवडणूक आयोगाविरोधात “सत्याचा मोर्चा” (Satyacha Morcha Mumbai) काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांची उपस्थिती राहणार आहे. शिवाय महाविकास आघाडीतील इतर नेतेही या मोर्चासाठी उपस्थित राहणार आहेत.

हे वाचलं का?

निवडणूक आयोगाच्या निष्काळजीपणामुळे मतदारयाद्यांमध्ये घोळ, मतचोरी आणि निवडणुकीतील गैरव्यवहार वाढल्याचा आरोप करत हा मोर्चा काढण्यात येत आहे. जनतेसमोर सत्य यावं आणि आयोगाच्या कारभारातील अनियमितता उघड व्हावी, या उद्देशाने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चाची सुरुवात दुपारी 1 वाजता मुंबईतील फॅशन स्ट्रीट येथून होणार असून, तो मेट्रो सिनेमा मार्गे पुढे जात मुंबई महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचेल. राज ठाकरे लोकल ट्रेनने चर्चगेटपर्यंत प्रवास करून मोर्चात सहभागी झाले असून, सध्या ते वेस्ट एंड हॉटेलमध्ये थांबले आहेत.

हेही वाचा : आईच्या अंत्यदर्शनासाठी बंगळुरुहून निघाला, पण सांगलीला येत असताना तरुणाला मृत्यूने कवटाळले

विरोधकांच्या मागण्या कोणत्या?

मतदारयाद्या त्वरित अद्ययावत करण्यात याव्यात.

मतदारयाद्यांमधील दुबार नावे काढून टाकावीत.

याद्या पूर्णपणे दुरुस्त होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलाव्यात.

मतदार नोंदणीसाठीची मुदत 7 नोव्हेंबरपर्यंत वाढवावी.

मोर्चाचा मार्ग कसा असेल?

हा मोर्चा दुपारी एक वाजता फॅशन स्ट्रीटवरून सुरू होईल आणि मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत जाईल. महापालिकेच्या समोर उभारलेल्या व्यासपीठावर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील आणि शेकापचे नेते यांसारखे प्रमुख नेते भाषण करतील.

राज्य निवडणूक आयोगाला मतदारयाद्यांतील त्रुटी, दुबार मतदार आणि मतचोरीसंबंधी ठोस पुरावे सादर करूनही योग्य प्रतिसाद न मिळाल्याने हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. विरोधकांचे म्हणणे आहे की, मतदारयाद्या पूर्णपणे सुधारित होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत. मोर्चानंतर या विषयावर पुढील रणनीती ठरवण्यासाठी आणि अधिकृत भूमिका जाहीर करण्यासाठी महाविकास आघाडी व मनसेचे प्रमुख नेते उद्या एकत्र येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादी शरद पवारांची तर शिवसेना ठाकरेंची म्हणून ओळखली जाते, मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य; महायुतीत ठिणगी पडणार?

    follow whatsapp