नवी दिल्ली: 'पहलगाम हल्ल्याचा शोधून-शोधून बदला घेतला जाईल. हा नरेंद्र मोदींचा भारत आहे.' असं मोठं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी (1 मे) दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना केलं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर पावले उचलली आहेत.
ADVERTISEMENT
अमित शाह म्हणाले, 'आज कोणीही असे समजू नये की आपल्या 27 लोकांना मारून त्यांनी ही लढाई जिंकली आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की प्रत्येक व्यक्तीला उत्तर मिळेल. जर कोणी भ्याड हल्ला केला आणि त्याला वाटत असेल की हा आपला विजय आहे, तर त्याने हे समजून घेतले पाहिजे की शोधून-शोधून बदला (चुन-चुन कर बदला लिया जायेगा) घेतला जाईल. हा नरेंद्र मोदींचा भारत आहे.'
'जगातील सर्व देश आज भारतासोबत उभे आहेत'
गृहमंत्री म्हणाले, 'आज पुन्हा एकदा मी या संकल्पाची आठवण करून देऊ इच्छितो की दहशतवादाविरुद्धची आपली लढाई सुरूच राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, डाव्या विचारसरणीचा अतिरेकीपणा असो किंवा काश्मीरचा मुद्दा असो, जर कोणी भ्याड कृत्य केले तर कोणालाही सोडले जाणार नाही.'
अमित शाह म्हणाले की, 'प्रत्येक जमिनीच्या प्रत्येक इंचावरून दहशतवादाचा नायनाट केला जाईल. जगातील सर्व देश दहशतवादाविरुद्ध भारतासोबत एकत्र आले आहेत आणि उभे राहिले आहेत. दहशतवाद संपेपर्यंत त्यांना शिक्षा दिली जाईल.'
पाकिस्तानवर भारताची कडक कारवाई
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध सतत कठोर निर्णय घेत आहे. सरकारने बुधवारी पाकिस्तानी विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी, हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी, 23 एप्रिल रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक झाली. या बैठकीत पाकिस्तानविरुद्ध अनेक मोठे निर्णय घेण्यात आले.
भारताने प्रथम अटारी सीमा तपासणी नाका बंद करून पाकिस्तानी नागरिकांना आपल्या भूमीतून बाहेर काढलं. जेणेकरून कोणताही पाकिस्तानी नागरिक भारतीय व्हिसा असूनही देशात प्रवेश करू शकणार नाही. यासोबतच, सीसीएस बैठकीत पाकिस्तानमधील भारतीय दूतावास बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, भारतात उपस्थित असलेल्या सर्व पाकिस्तानी राजदूतांना 48 तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आणि पाकिस्तानी नागरिकांना भारतीय व्हिसा न देण्याचा कठोर निर्णय घेण्यात आला.
याशिवाय, भारताने पाकिस्तानला दिलेली सार्क व्हिसा सूट योजना देखील तात्काळ प्रभावाने बंद करण्यात आली आहे. याअंतर्गत, पाकिस्तानी नागरिकांना आता भारतात येण्याची परवानगी राहणार नाही. या बैठकीत भारताने घेतलेला सर्वात मोठा निर्णय म्हणजे सिंधू पाणी करार स्थगित करणे.
ADVERTISEMENT
