PM Modi LIVE: Ceasefire कराराच्या 2 दिवसांनी PM मोदी देशाशी काय बोलणार? उरले अवघे काही तास...

मुंबई तक

12 May 2025 (अपडेटेड: 12 May 2025, 06:12 PM)

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या शस्त्रसंधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता देशाला संबोधित करणार आहेत. 12 मे रात्री 8 वाजता त्यांचं संबोधन सुरू होईल.

Mumbai Tak
Google CTA

नवी दिल्ली: 'ऑपरेशन सिंदूर' सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (12 मे) रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. दोन्ही देशांनी जमीन, हवाई आणि समुद्रावरील सर्व लष्करी हल्ले थांबवण्यासाठी परस्पर करार केल्यानंतर दोन दिवसांनी पंतप्रधानांचे हे भाषण करणार आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर हा शस्त्रसंधीचा करार झाला होता.

हे वाचलं का?

100 दहशतवादी ठार, 40 पाकिस्तानी लष्करी जवान ठार

भारताने 7 मे रोजी सकाळी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. या कारवाईदरम्यान, किमान 100 दहशतवादी ठार झाले आणि 40 पाकिस्तानी लष्करी सैनिक मारले गेले. 'ऑपरेशन सिंदूर' मध्ये, लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदशी संबंधित तळांना विशेषतः लक्ष्य करण्यात आलं होतं.ॉ

हे ही वाचा>> युद्धामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं, शेअर बाजारावर दुष्काळ, तब्बल...

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमधील नियोजित चर्चेपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. बैठकीला उपस्थित असलेल्यांमध्ये एनएसए अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आणि तिन्ही दलांचे प्रमुख होते.

22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताच्या राजनैतिक आणि लष्करी प्रतिसादाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी वरिष्ठ सरकारी आणि संरक्षण अधिकाऱ्यांसोबत नियमित बैठका घेत आहेत.

हे ही वाचा>> "पापाचा घडा भरला होता, पाकिस्तानला धडा शिकवणं गरजेचं होतं...", लेफ्टनंट जनरल म्हणाले आरपारची तयारी होती

पाकिस्तानने केले शस्त्रसंधीचे उल्लंघन

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी शुक्रवारी, 9 मे रोजी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दोन्ही बाजू भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 5 वाजल्यापासून जमीन, हवाई आणि समुद्रावरील सर्व गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवतील. तथापि, त्याच दिवशी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.