Asia Cup 2022, IND vs SL: आज जिंकावंच लागणार! टीम इंडीया करणार श्रीलंकेशी दोन हात

Asia Cup 2022: आशिया चषक 2022 च्या सुपर-फोर सामन्यात टीम इंडियाचा सामना आज (6 सप्टेंबर) श्रीलंकेशी होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर भारतासाठी ही करो या मरोची लढत आहे. अशा स्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. कोहलीसाठी फॉर्म ही टीम इंडीयासाठी जमेची […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:06 AM • 06 Sep 2022

follow google news

Asia Cup 2022: आशिया चषक 2022 च्या सुपर-फोर सामन्यात टीम इंडियाचा सामना आज (6 सप्टेंबर) श्रीलंकेशी होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर भारतासाठी ही करो या मरोची लढत आहे. अशा स्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे.

हे वाचलं का?

कोहलीसाठी फॉर्म ही टीम इंडीयासाठी जमेची बाजू

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात चांगली गोष्ट म्हणजे टॉप-3 फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. रोहित, केएल राहुल आणि विराट कोहली या तिघांनीही आक्रमक फलंदाजी केली. कोहली भलेही त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नसेल, पण रविवारी त्याने त्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. आशिया चषकात सलग दुसरे अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने आपल्या टीकाकारांनाही आपल्या बॅटने उत्तर दिलं आहे.

ऋषभ पंत की दिनेश कार्तिक यांच्याबाबत संघात चर्चा सुरू आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दिनेश कार्तिकच्या जागी दीपक हुड्डाला खेळवण्यात आले. कार्तिकला पहिल्या दोन सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली असली तरी त्याला बाहेर ठेवल्याने चाहते आश्चर्यचकित झाले होते. भारताला आपल्या मधल्या फळीबाबत योग्य विचार करावा लागणार आहे.

दुखापतग्रस्त रवींद्र जडेजा, हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराह यांच्या अनुपस्थितीत भारताकडे गोलंदाजीत खेळण्यासाठी फारसे पर्याय नाहीत. भारत रविवारी पाकिस्तानविरुद्ध पाच गोलंदाज घेऊन मैदानात उतरला होता. भुवनेश्वर कुमारला आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवता आली नाही त्यामुळं संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

अक्षर पटेलला मिळू शकते संघात संधी

पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात विजयाचा नायक ठरलेला हार्दिक पांड्या मागच्या सामन्यात चांगलाच महागात पडला होता. त्याचबरोबर युझवेंद्र चहललाही चांगलाच मार पडला होता. पाच गोलंदाजांमुळं हार्दिकची चार षटके अत्यंत महत्त्वाची ठरतात. जडेजाच्या जागी संघाला समतोल राखण्यासाठी अक्षर पटेलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी आवेश खानची तब्येत खराब होती. अशा परिस्थितीत तो तिसरा स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज म्हणून संघात पुनरागमन करतो का हे पाहावं लागेल. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी भारताने विश्वचषकापूर्वी त्यांच्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह खेळण्याचा निर्णय घेतला होता, परंतु रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ प्रत्येक सामन्यात आपला संघ बदलत आहे.

श्रीलंकेचे फलंदाज जबरदस्त फॉर्मात

तिसर्‍या क्रमांकावरील चरित असलंका वगळता, श्रीलंकेच्या फलंदाजांनी प्रभाव पाडला आहे, ज्यात बांगलादेशविरुद्ध कर्णधार दासून शनाका आणि कुसल मेंडिस आणि अफगाणिस्तानविरुद्ध धनुष्का गुनाथिलक आणि भानुका राजपक्षे यांनी चमकदार कामगिरी केली आहे.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग-११

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुडा, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, दिनेश कार्तिक, आवेश खान, अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन.

श्रीलंका: दासुन शनाका (कर्णधार), दनुष्का गुणतिलक, पथुम निसांका, कुसल मेंडिस, चरित अस्लंका, भानुका राजपक्षे, अशेन बंदारा, धनंजय डी सिल्वा, वनिंदू हसरंगा, महेश टीक्ष्णा, जेफ्री वांडर्से, प्रवीण जयविक, नुकारान्ना, नुस्कान, पटुना, नुस्का, नुकारा, धनंजय डी सिल्वा. फर्नांडो आणि दिनेश चंडिमल.

    follow whatsapp