ind vs wi 2nd t20 : रोमहर्षक सामन्यात भारताचा विजय; टी20 मालिका खिशात

मुंबई तक

• 03:16 AM • 19 Feb 2022

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने रोमहर्षक विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने एकदिवसीय मालिकेबरोबर टी20 चषकही खिशात टाकला. विराट कोहलीला गवसेला सूर, ऋषभ पंतने केलेली निर्णायक खेळी आणि अखेरच्या षटकात हर्षल पटेलने केलेल्या गोलंदाजीच्या बळावर भारताने वेस्ट इंडिजला पराभवाची धुळ चारली. त्यामुळे निकोलस पूरनने केलेली अर्धशतकी खेळी निष्फळ ठरली. नाणेफेक जिंकल्यानंतर वेस्ट इंडिजने प्रथम […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने रोमहर्षक विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने एकदिवसीय मालिकेबरोबर टी20 चषकही खिशात टाकला. विराट कोहलीला गवसेला सूर, ऋषभ पंतने केलेली निर्णायक खेळी आणि अखेरच्या षटकात हर्षल पटेलने केलेल्या गोलंदाजीच्या बळावर भारताने वेस्ट इंडिजला पराभवाची धुळ चारली. त्यामुळे निकोलस पूरनने केलेली अर्धशतकी खेळी निष्फळ ठरली.

हे वाचलं का?

नाणेफेक जिंकल्यानंतर वेस्ट इंडिजने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात मात्र, निराशाजनक झाली. संघाच्या अवघ्या १० धावा झालेल्या असताना सलामीवीर ईशान किशन (१० चेंडूत २ धावा) तंबूत परतला. ईशांत किशन तंबूत परल्यानंतर खेळण्यास आलेल्या विराट कोहलीच्या साथीने रोहित शर्माने डाव सावरला. पहिल्या सामन्यात झटपट धावा करणाऱ्या रोहित शर्माला आज १९ धावा करून बाद झाला.

सूर्यकुमार यादवला मोठी खेळी करता आली नाही. धावसंख्या ७२ असताना सूर्यकुमार यादव अवघ्या ८ धावांवर झेलबाद झाला. भारताने तीन गडी गमावलेले असताना दुसऱ्या बाजूने विराट कोहलीने ४१ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने अर्धशकत साकारलं. ऋषभ पंत कोहलीची जोडीचा जम बसल्याचं वाटत असताना कोहलीही बाद झाला.

त्यानंतर ऋषभ पंतने व्यंकटेश अय्यरच्या मदतीने डाव सावरला. ऋषभ पंतने २८ चेंडूत नाबाद ५२ धावा केल्या, तर व्यंकटेश अय्यरने झटपट ३३ धावा फटकावल्या. विराट कोहली, ऋषभ पंत आणि व्यंकटेश अय्यरच्या खेळीच्या बळावर भारताने २० षटकात ५ बाद १८६ धावा केल्या.

१८७ धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर आलेल्या वेस्ट इंडिजच्या फलदाजांनी सावध सुरूवात केली. ६ षटकांत ३८ धावा झालेल्या असताना वेस्ट इंडिजला पहिला झटका बसला. सलामीवीर माइल मेयर्सला युजवेंद्र चहलने झेलबाद केलं. त्यानंतर दुसरा आंतरराष्ट्रीय रवी बिश्नोईने ब्रॅडन किंगला बाद करत भारताला दुसरं यश मिळवून दिलं. ९ षटकांत २ गडी गमावत वेस्ट इंडिजने ६० धावांपर्यंत मजल मारली.

मात्र, रोवमॅन पॉवेल आणि निकोलस पूरनने झटपट खेळपट्टीवर जम बसवत वेस्ट इंडिजच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. पूरन-पॉवेल जोडीने १८ व्या षटका अखेरीस संघांची धावसंख्या १५८ पर्यंत नेली. वेस्ट इंडिजला १२ चेंडूत २९ धावांची गरज असतानाच भुवनेश्वर कुमारने निकोसल पुरनला तंबूत पाठवलं आणि सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला.

अखेरचं षटक हर्षल पटेलने टाकलं. अखेरच्या षटका वेस्ट इंडिजला विजयासाठी ६ चेंडूत २५ धावांची गरज होती. तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर पॉवेलने दोन षटकार खेचण्याचा प्रयत्न केला. पाचव्या चेंडूवर एकच धाव करता आली आणि वेस्ट इंडिजच्या विजयाच्या आशाही संपल्या.

    follow whatsapp