National Games : स्टेडियमध्ये पाणी अन् खोलीत गळती; राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत चिखल

मुंबई तक

• 12:32 PM • 09 Nov 2023

गोव्यात होत असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पावसामुळे मैदानात चिखल झाला असून, खेळाडूंना मात्र त्रासाला सामोरं जावं लागत आहे.

The Campal Games Village experienced waterlogging, causing difficulties for participants, spectators.

The Campal Games Village experienced waterlogging, causing difficulties for participants, spectators.

follow google news

National Games goa 2023 : गोव्यात सध्या राष्ट्रीय खेळ 2023 सुरू आहे, मात्र याच्या आयोजनात गोवा सरकारचं नियोजन कमी पडल्याचं दिसत आहे. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमची काही दृश्यं समोर आली आहेत, त्यामध्ये भिंती गळताना दिसतायेत. एवढंच नाही तर अॅथलेटिक स्टेडियममध्ये तर चक्क पाणी भरलं आहे. यावरून काँग्रेस गोवा सरकारला खडेबोल सुनावले आहेत. ‘राष्ट्रीय खेळ स्पर्धेसाठी 750 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यातील बहुतांश निधी हा पायाभूत सुविधांवर खर्च करण्यात आला. मात्र तरीही जर खेळाडूंची इतकी गैरसोय होणार असेल तर याची चौकशी झाली पाहिजे’, अशी मागणी गोवा काँग्रेसनं केली आहे.

हे वाचलं का?

गोव्यात 25 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. पण, या स्पर्धेत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचं चित्र आहे. यावरूनच गोवा सरकारवर आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर मोठी टीका विरोधकांकडून होत आहे.

स्टेडियममध्ये भरले पाणी

गोव्यात सुरू असलेल्या 37व्या राष्ट्रीय खेळांना पायाभूत सुविधांमध्ये बिघाड आणि लॉजिस्टिक समस्यांचा फटका बसल्याचा सूर उमटला आहे. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये थोड्याशा पावसात गळती सुरू झाली. बांबोलीम येथील अॅथलेटिक स्टेडियम पाण्याने भरून गेले.

राष्ट्रीय खेळांसाठी अंदाजे 750 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले होते. यापैकी बहुतेक निधी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि नूतनीकरणासाठी देण्यात आला आहे.

हे ही वाचा >> “मविआला 31 ते 33, तर महायुतीला 15 ते 17 जागा मिळणार”

गोवा काँग्रेसचे सरचिटणीस कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या तयारीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. ‘या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी स्थळे पुरेशा प्रमाणात तयार आहेत याची खात्री करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे’, असा आरोप करत त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

सुरक्षेला गंभीर धोका निर्माण

विरोधी पक्षाने या प्रकरणी भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. इनडोअर स्टेडियममधील कमानी (आधार खांब) कोसळणे, खांब तुटणे आणि पावसात छताला गळती यांसारखी उदाहरणे या कार्यक्रमातील कथित भ्रष्टाचाराचा पुरावा आहेत. या घटनांमुळे राज्य सरकारच्या प्रतिष्ठेला नुकतेच ठेच पोहोचली नसून सहभागी खेळाडू आणि अधिकारी यांच्या सुरक्षेलाही गंभीर धोका निर्माण झाला आहे, असं काँग्रेसने म्हटलं आहे.

‘गोवा सरकारकडे दूरदृष्टीचा अभाव’

पायाभूत सुविधांच्या समस्यांव्यतिरिक्त गोव्यातील G20 बैठकीसाठी खरेदी केलेल्या दहाहून अधिक नवीन इलेक्ट्रिक बसेस राष्ट्रीय खेळांदरम्यान खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या वाहतुकीसाठी वापरता आल्या असत्या. पण त्याचा वापर न होता त्या तशाच पडून असल्याने सरकारकडे नियोजनाचा आणि दूरदृष्टीचा अभाव असल्याचं लक्षात येतंय, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

    follow whatsapp