Gudhi Padwa 2025: गुढीपाडव्याची नेमकी कहाणी काय.. तुम्हाला माहितीए का मराठमोळ्या सणाचा इतिहास?

मुंबई तक

Gudhi Padwa History: गुढीपाडवा हा सण साडे तीन मुहूर्तापैकी एक आहे. त्यामुळे या सणाचा नेमका इतिहास, कहाणी काय हे आपण जाणून घेऊया. तसंच सांस्कृतिक महत्त्व देखील आपण समजून घेऊया.

ADVERTISEMENT

गुढीपाडव्याची नेमकी कहाणी काय? (फोटो सौजन्य: Mandar Deodhar)
गुढीपाडव्याची नेमकी कहाणी काय? (फोटो सौजन्य: Mandar Deodhar)
google news

Story of Gudhi Padwa Festival: मुंबई: गुढीपाडवा, हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी एक, यंदा 30 मार्च रोजी साजरा होणार आहे. विजय, समृद्धी आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक मानला जाणारा हा सण घराघरांत गुढी उभारून, पुरणपोळीचा बेत आखून आनंदाने साजरा केला जातो. पण या सणामागची नेमकी कहाणी काय आणि त्याचा नेमका इतिहास काय? हे आपण आज जाणून घेऊया.

गुढीपाडव्याचा पौराणिक उगम

गुढीपाडवा हा चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या दिवशी साजरा होतो. हिंदू पुराणांनुसार, या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली आणि काळाची गणना सुरू झाली. म्हणूनच हा दिवस नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. याशिवाय, रामायणाशीही या सणाचा संबंध जोडला जातो. असं मानलं जातं की, भगवान रामाने रावणाचा वध करून अयोध्येत परत येण्याचा मुहूर्त हा गुढीपाडव्याचाच होता. विजयाचं प्रतीक म्हणून लोकांनी गुढ्या उभारल्या आणि आनंद साजरा केला.

फोटो सौजन्य: Mandar Deodhar

हे ही वाचा >> Gudi Padwa 2025: PM नरेंद्र मोदी गुढीपाडव्याच्या दिवशी नागपूरलाच का येणार?

ऐतिहासिक संदर्भ आणि शिवाजी महाराजांचा वारसा

गुढीपाडव्याला ऐतिहासिकदृष्ट्याही मोठं महत्त्व आहे. मराठ्यांचा इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी या सणाचा थेट संबंध आहे. मुघल आणि इतर परकीय सत्तांविरुद्ध लढताना शिवाजी महाराजांनी अनेक विजय मिळवले. असं सांगितलं जातं की, एखाद्या मोठ्या विजयानंतर शिवाजी महाराज परतले की, गडावर गुढी उभारून विजयोत्सव साजरा केला जात असे. ही परंपरा पुढे जोपासली आणि गुढी हे विजयाचं प्रतीक बनलं. त्यामुळे गुढीपाडवा हा फक्त नववर्षाचं स्वागत नसून, शौर्य आणि स्वाभिमानाचंही प्रतीक बनला.

गुढीचं प्रतीकशास्त्र

गुढी म्हणजे काय? गुढी ही बांबूच्या काठीवर रंगीत कापड, फुलांचा हार, साखरेच्या गाठी आणि त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या ठेवून तयार केली जाते. ही रचना विजयध्वजाचं प्रतीक मानली जाते. बांबू हे सामर्थ्य आणि उंची दर्शवतो, तर रंगीत वस्त्रं समृद्धी आणि आनंदाचं प्रतिनिधित्व करतात. साखरेच्या गाठी जीवनातील गोडवा आणि तांब्या संपन्नतेचं प्रतीक मानलं जातं. घराच्या अंगणात किंवा छतावर उभारली जाणारी ही गुढी म्हणजे नव्या संकल्पांची सुरुवात आणि वाईटावर चांगल्याचा विजय असं मानलं जातं.

हे वाचलं का?