Nashik Bus Fire : अपघाताबाबत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक, मृतांच्या वारसांना २ लाखांची मदत

मुंबई तक

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक नाशिकमध्ये झालेल्या बस अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घनटेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांविषयी मला सहवेदना वाटते आहे. त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसंच या अपघातात जे जखमी झाले आहेत त्यांना लवकर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये झालेल्या बस अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घनटेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांविषयी मला सहवेदना वाटते आहे. त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसंच या अपघातात जे जखमी झाले आहेत त्यांना लवकर आराम मिळो अशी प्रार्थना मी देवाच्या चरणी करतो या आशयाचं ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसंच मृतांच्या वारसांना २ लाख रूपयांची मदतही केंद्राकडून जाहीर करण्यात आली आहे.

नेमकी काय घडली घटना?

यवतमाळहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसला नाशिक जवळ भीषण अपघात झाला. ही खासगी बस चिंतामणी ट्रॅव्हल्सची होती असं समजतं आहे. धुळ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेलरची बसला धडक लागली त्यानंतर या बसने पेट घेतला. ही खासगी बस यवतमाळहून मुंबईच्या दिशेने चालली होती. या बस अपघातात ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेतील जखमींना अग्नीशमन दलाकडून शासकीय रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. या अपघातात ३८ जण जखमी झाले आहेत.

नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर झाला अपघात

नाशिक औरंगाबाद रस्त्यावर ही घटना घडली आहे. नाशिक औरंगाबाद रस्त्यावरच्या हॉटेल मिरची चौकात ही घटना आज पहाटे घडली. पहाटे ४.३० च्या सुमाराला ही घटना घडली आहे. अपघात इतका भीषण होता की संपूर्ण बस जळून खाक झाली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp