“हे लोक मला वेड्यात काढायचे”, देवेंद्र फडणवीस नगरच्या सभेत असं का बोलले?
Devendra Fadnavis Karjat Speech : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर पलटवार केला. “आपल्याच तिजोऱ्या भरण्याचा प्रयत्न केला, तर पैशांची कमतरता पडते”, असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांना पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून डिवचलं. तसेच समृद्धी महामार्गाबद्दलचा अनुभव सांगताना फडणवीसांनी विरोधकांनी केलेल्या टीकेचा उल्लेख केला. कर्जत येथे झालेल्या शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना देवेंद्र […]
ADVERTISEMENT

Devendra Fadnavis Karjat Speech : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर पलटवार केला. “आपल्याच तिजोऱ्या भरण्याचा प्रयत्न केला, तर पैशांची कमतरता पडते”, असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांना पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून डिवचलं. तसेच समृद्धी महामार्गाबद्दलचा अनुभव सांगताना फडणवीसांनी विरोधकांनी केलेल्या टीकेचा उल्लेख केला.
कर्जत येथे झालेल्या शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जनतेच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात युतीचं सरकार आलं आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पातून समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन सगळ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचं काम केलं. शेतकरी केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्यांवर सातत्याने संकट येताहेत. सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना 700 हजार कोटी मदत म्हणून दिले.”
साडेचार कोटी दिलेत, 1000 कोटींची तरतूद केलीये -देवेंद्र फडणवीस
मेळाव्यात देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कधी कधी असं म्हणतात की, लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही. मागच्या सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार देऊ अशी दोनदा घोषणा केली, पण पूर्ती केली नाही. आपलं सरकार आल्यानंतर साडेबारा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 50-50 हजार रुपये दिले. साडेचार हजार कोटी रुपये दिले. अजून अडीच लाख शेतकरी बाकी आहेत, 1000 कोटींची तरतूद केली आहे. त्यांच्याही खात्यात आपण पैसे देणार आहोत.”
BJP चा विश्वासघात केला म्हणणारे बच्चू कडू
उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात गेलेच का होते?