शिवसेनेला नवी मुंबईत झटका! शिवसेनेतील राज्यमंत्री दर्जा असलेले बडे नेतेच शिंदेंच्या गटात

मुंबई तक

आमदारांच्या बंडखोरींनतर एकनाथ शिंदेंचं प्रस्थ असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील माजी नगरसेवकही उद्धव ठाकरेंची साथ सोडताना दिसत आहे. ठाणे महापालिकेच्या ६६ माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाल्यानंतर आता नवी मुंबईतही शिवसेनेला झटका बसला आहे. शिंदे गटात सहभागी झालेल्यांमध्ये राज्यमंत्री दर्जाचं पद असणाऱ्यांचाही समावेश आहे. सुमारे ५० आमदारांना घेवून वेगळा गट बनवत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

आमदारांच्या बंडखोरींनतर एकनाथ शिंदेंचं प्रस्थ असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील माजी नगरसेवकही उद्धव ठाकरेंची साथ सोडताना दिसत आहे. ठाणे महापालिकेच्या ६६ माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाल्यानंतर आता नवी मुंबईतही शिवसेनेला झटका बसला आहे. शिंदे गटात सहभागी झालेल्यांमध्ये राज्यमंत्री दर्जाचं पद असणाऱ्यांचाही समावेश आहे.

सुमारे ५० आमदारांना घेवून वेगळा गट बनवत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. त्यानंतर तातडीने राज्यमंत्री दर्जा असणाऱ्या नवी मुंबई शहरातील दोन नेत्यांच्या नेतृत्वात नवी मुंबई शहरातील दिग्गज नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या तंबूत दाखल होत सेनेला झटका दिला.

महाराष्ट्र राज्य वडार समन्वय समितीचे अध्यक्ष आणि मनपाचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांना राज्य मंत्री दर्जा असून ऐरोली परिसरात त्यांचे वर्चस्व आहे. त्यांच्या समवेत तूर्भेमध्ये वर्चस्व असलेले स्थायी समिती माजी सभापती सुरेश कुलकर्णी, माजी नगरसेवक ममित विजय चौगुले यांच्या सकट सुमारे तीसपेक्षा अधिक माजी नगरसेवक आणि स्थानिक सेना नेत्यांची मोट बांधणारे राज्यमंत्री दर्जाचं पद असलेले मुंबई झोपडपट्टी महामंडळ अध्यक्ष विजय नाहटा यांनीही एकनाथ शिंदे यांची भेट घेवून शिंदे गटात सामील होण्याचे संकेत दिले आहेत.

नाहटा हे नवी मुंबई मनपाचे आयुक्त होते. निवृत्तीनंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर त्यांना उपनेतेपद देण्यात आलं. याचबरोबर भाजप आणि शिवसेनेची सत्ता आल्यावर त्यांना मुंबई म्हाडा संलग्न मुंबई झोपडपट्टी प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून दिलेली नेमणूक उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर कायम ठेवण्यात आले. त्यांनी बेलापूर विधानसभा निवडणूक गणेश नाईक व विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांच्या विरोधात लढवल्यावर अवघ्या तीन हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp