आंतरजातीय विवाहानंतर नाशिक जात पंचायतीने लिहून घेतलेल्या ‘त्या’ पत्राची होणार चौकशी

मुंबई तक

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक आंतरजातीय विवाह केल्याने शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही असं पत्र सरपंचासह नाशिकमध्ये जातपंचायतीने विवाहाच्याच दिवशी मुलीकडून लिहून घेतलं होतं. त्या प्रकरणाची बातमी मुंबई तकने दिली आणि या प्रकरणी जात पंचायतीला दणका बसला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयातून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. BDO आणि विभागीय महसूल कार्यालयातून प्रांत गावात गेले […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक

आंतरजातीय विवाह केल्याने शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही असं पत्र सरपंचासह नाशिकमध्ये जातपंचायतीने विवाहाच्याच दिवशी मुलीकडून लिहून घेतलं होतं. त्या प्रकरणाची बातमी मुंबई तकने दिली आणि या प्रकरणी जात पंचायतीला दणका बसला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयातून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. BDO आणि विभागीय महसूल कार्यालयातून प्रांत गावात गेले होते, त्यांनी चौकशी केली , अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देतील. या प्रकरणानंतर सरपंचांनी सांगितले की माझी चूक नाही मी जातपंचायत दबावात काम केलं. आपण जाणून घेऊ हे सगळं प्रकरण काय आहे?

आंतरजातीय विवाहामुळे सवलती बंद करण्याचा प्रयत्न नाशिकच्या एका गावात करण्यात आला. विवाहाच्या दिवशीच तसं पत्र जात पंचायतीने लिहून घेतलं. आंतरजातीय विवाह केल्याने यापुढे अनुसूचित जमातीच्या योजनांचा लाभ मी घेणार नाही असं पत्र या मुलीकडून लिहून घेण्यात आलं. या पत्रावर सरपंचासह इतर लोकांचे सही आणि शिक्के आहेत. इगतपुरी तालुक्यातील रायांबे गावात हा धक्कादायक प्रकार घडला.

समीर वानखेडेंची जात पडताळणी झालीच नाही, माहिती अधिकारात समोर आली माहिती

हे वाचलं का?