अबब! रुग्णाच्या पोटातून काढला तब्बल 1 किलोचा किडनी स्टोन; शस्त्रक्रियेनंतर डॉक्टर म्हणाले…
रोहिणी ठाकूर धुळे: धुळ्यातील नामांकित डॉ. आशिष पाटील यांनी शेतकऱ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली असून शेतकऱ्याच्या पोटातून तब्बल एक किलोचा मुतखडा काढून शेतकऱ्याला जीवनदान दिले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल इंडिया बुक व आशिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असून त्याची नोंद केली आहे. भारतातील मुतखड्यावरील ही आतापर्यंतची सर्वात मोठी शस्त्रक्रिया असल्याची माहिती डॉ. आशिष पाटील दिली […]
ADVERTISEMENT

रोहिणी ठाकूर
धुळे: धुळ्यातील नामांकित डॉ. आशिष पाटील यांनी शेतकऱ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली असून शेतकऱ्याच्या पोटातून तब्बल एक किलोचा मुतखडा काढून शेतकऱ्याला जीवनदान दिले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल इंडिया बुक व आशिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असून त्याची नोंद केली आहे. भारतातील मुतखड्यावरील ही आतापर्यंतची सर्वात मोठी शस्त्रक्रिया असल्याची माहिती डॉ. आशिष पाटील दिली आहे.
रमण चौरे वय 50, रा. नंदुरबार असे शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांना अनेक महिन्यापासून मुतखड्याचा त्रास असल्याने अनेक ठिकाणी जाऊन ही त्यांचे निदान न झाल्याने शेतकऱ्यावर धुळ्यातील डॉ. आशिष पाटील यांनी तेजनक्ष हॉस्पिटल मध्ये 1 तासाच्या अथक परिश्रमातुन शेतकऱ्याच्या कंबरेतुन मुतखड्याला बाहेर काढण्यात डॉ आशिष पाटील यांना यश आले आहे.
शस्त्रक्रियेनंतर डॉ. आशिष पाटील काय म्हणाले?
डॉ. आशिष पाटील म्हणाले की जर तुम्हाला मुतखड्याचा त्रास जाणवू लागला तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. मुतखडा एवाढा मोठा होईपर्यंत वाट पाहू नका त्याने तुम्हाल इतर आजार होऊ शकतात. तुम्ही मुतखड्याचा आजार जास्त काळ अंगावर काढला तर किडनी फेल होऊ शकते, कर्करोग होऊ शकतो त्याचबरोबर किडनीचे अन्य आजार होऊ शकतात असे डॉक्टर म्हणाले आहेत.