शिंदे-फडणवीस सरकार 2019 मध्येच यायला हवं होतं, पण… : एकनाथ शिंदे यांंचं मोठं विधान

मुंबई तक

नंदुरबार येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं. 2019 मध्येच शिंदे-फडणवीस सरकार यायला पाहिजे होतं, असं एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच नंदुरबारमध्ये आले होते. नगर परिषदेच्या नूतन इमारतीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत कृषीमंत्री अब्दुल सत्तार, […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नंदुरबार येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं. 2019 मध्येच शिंदे-फडणवीस सरकार यायला पाहिजे होतं, असं एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच नंदुरबारमध्ये आले होते. नगर परिषदेच्या नूतन इमारतीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत कृषीमंत्री अब्दुल सत्तार, दादा भुसे हे नेते उपस्थित होते.

नंदुरबार नगर परिषद इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “2019 मध्येच हे शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत यायला पाहिजे होतं. पण तसं झालं नाही. त्यामुळे काही दिवसांआधी आम्ही हा निर्णय घेतला.”

मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले, “आमच्या सरकारनं सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलं. एनडीआरएफच्या निकषांपलीकडे जात आम्ही शेतकऱ्यांना मदत केली. शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मदत तीन महिन्याच्या आत आम्ही केली.”

चंद्रकांत रघुवंशींची विनंती अन् एकनाथ शिंदेंचा वायुवेग; नंदुरबारला ३ मिनिटात ७ कोटी मंजूर

हे वाचलं का?

    follow whatsapp