भारतात लवकरच बुलेट ट्रेन, 48 मिनिटांत मुंबई-पुणे अंतर कापणार

मुंबई तक

India's First Bullet Train : भारतात बुलेट ट्रेनची सुरूवात झाली नसून देशात आधीच सात कॉरिडोरचं प्लानिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी 2026-27 या वर्षासाठी 4 हजार किमी अंतरासाठी हाय स्पीड रेल कॉरिडोरची घोषणा केली. केंद्र सरकार आता या सातही मार्गांचे बांधकाम लवकरच करणार आहे.

ADVERTISEMENT

India's first bullet train
India's first bullet train
Google CTA

बातम्या हायलाइट

point

भारतातील बुलेट ट्रेनचे मार्ग 

point

मुंबई-पुणे 48 मिनिटांत अंतर कापणार

India's Bullet Train : भारतात बुलेट ट्रेनची सुरूवात झाली नसून देशात आधीच सात कॉरिडोरचं प्लानिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी 2026-27 या वर्षासाठी 4 हजार किमी अंतरासाठी हाय स्पीड रेल कॉरिडोरची घोषणा केली. केंद्र सरकार आता या सातही मार्गांचे बांधकाम लवकरच करणार आहे. कमी खर्चात उत्तम प्रकारे आराखडा विकसित करणार आहे. 

हे ही वाचा : सांगली: 4 वर्षाच्या मुलीवर 46 वर्षीय पुरूषाकडून अत्याचार, खून करत पेटीत भरला मृतदेह

भारतातील बुलेट ट्रेनचे मार्ग

भारतातील प्रस्तावित असलेल्या नवीन बुलेट ट्रेनच्या कॉरिडर मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद, हैदराबाद-बंगळुरू, हैदराबाद-चेन्नई, चेन्नई-बंगळुरू, दिल्ली-वाराणसी आणि वाराणसी-सिलीगुडी, देशाच्या उत्तर पश्चिमहून उत्तर-पश्चिमपर्यंत पसरला आहे. हा मार्ग आर्थिकदृष्ट्या जोडला जाणार आहे. 

मुंबई ते पुण्याचा प्रवास 48 मिनिटांपर्यंत

या कॉरिडोरच्या निर्मितीमुळे प्रवासासाठी एक क्रांतिकारी बदल घडणार आहे. मुंबई ते पुण्याचा प्रवास आता फक्त 48 मिनिटांपर्यंत, पुणे ते हैदराबाद 1 तास मिनिटे, हैदराबाद ते बंगळुरू अंदाजे 2 तास, चेन्नई ते बंगळुरू 1 तास 13 मिनिटे, हैदराबाद ते चेन्नई 2 तास 55 मिनिटे, दिल्ली ते वाराणसी 3 तास 50 मिनिटांची संभावणा आहे.  तर वाराणसी ते सिलिगुडी हे अंतर पाटणामार्गे 2 तास 55 मिनिटांचा कालावधीची शक्यता आहे. 

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, या कॉरिडोरमुळे नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई अहमदाबाद प्रकल्पातून मिळालेल्या धड्यांचा आधार घेऊन उड्डाणपूल, पूल, बोगदे आणि स्थानिकांसाठी एक प्रामाणिक डिझाईन केलेली लायब्ररी विकसित करत आहेत. सिद्ध मॉड्युलर डिझाइनचा वापर केल्याने प्रत्येक कॉरिडोरसाठी पायाभूत सुविधांची पुनर्रचना करण्याची अधिकची गरज नाहीशी होतेय. परिणामी अधिक जलद अंमलबजावणी, कमी खर्च सातत्याने गुणवत्ती आणि सुलभ देखभालीची शक्यता आहे.