आमच्याच लोकांचं रक्त सांडवायचं नाही, आम्ही मार्ग काढू; संजय राऊत नाशिकमध्ये काय म्हणाले?
शहरातील असो की जिल्ह्यातील शिवसेना जागेवरच आहे. एक-दोन लोक पळून गेले असतील, त्यांच्याबरोबर शिवसेना गेलेली नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मला इथे येऊन पाहण्याची अजिबात गरज नव्हती. तरी मला पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी वाटली. मी कालपासून आलोय असंही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट केलं. मालेगाव, नांदगाव या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकारी […]
ADVERTISEMENT

शहरातील असो की जिल्ह्यातील शिवसेना जागेवरच आहे. एक-दोन लोक पळून गेले असतील, त्यांच्याबरोबर शिवसेना गेलेली नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मला इथे येऊन पाहण्याची अजिबात गरज नव्हती. तरी मला पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी वाटली. मी कालपासून आलोय असंही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट केलं. मालेगाव, नांदगाव या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकारी मला भेटून गेले आहेत. उद्या परत भेटणार आहेत. उद्या काही नवीन लोक शिवसेनेशी जोडले जाणार आहेत.
नाशिक राजकीयदृष्ट्या चर्चेचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. नाशिक शहर, महापालिका आणि जिल्हा नेहमीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी राहिलेला आहे. सगळे माजी नगरसेवक मला भेटले. महापालिकेची तयारी सुरूये. कधीही निवडणुका झाल्या तरी महापालिकेवर शिवसेनेचीच सत्ता येईल. तिकडे काय घडतंय, यांच्याशी नाशिकचा संबंध नाही,” असं राऊत म्हणाले.
“हा जो धुरळा उडाला आहे, ते कृत्रिम वादळ आहे. ती वावटळ आहे, ती दूर होईल आणि शिवसेना पुन्हा जोमाने कामाला लागली आहे. ती पुढे गेलेली दिसेल,” असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेच्या नव्या निवडणूक चिन्हाबद्दल बोललं जात आहे, यावर राऊत म्हणाले, “पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यासंदर्भात मातोश्रीवर पत्रकार परिषद घेणार आहेत. तिथे ते बोलणार आहेत. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचं आहे आणि शिवसेनेचंच राहिल.”