Uttar Pradesh : हनिमूनच्या रोमान्सवेळी झाला कहर, नवरा-नवरीचा बेडवरच गेला जीव!

मुंबई तक

Honeymoon Couple Death: उत्तर प्रदेशमध्ये एका नवविवाहित दाम्पत्याचा हनिमूनवेळी रोमान्स करतानाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय.

ADVERTISEMENT

bride and groom died together due heart attack honeymoon uttarpradesh romance
bride and groom died together due heart attack honeymoon uttarpradesh romance
social share
google news

Marathi News: लखनऊ: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बहराइच शहरात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. येथे दोन कुटुंबातील लग्नाचा आनंद एका क्षणात शोकसागरात विरून गेला आहे. त्याचं झालं असं की, एका 22 वर्षाच्या मुलाचं 20 वर्षांच्या मुलीशी नुकतंच लग्न झालं होतं. त्यामुळे दोन्ही घरात आनंदाचे वातावरण होतं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी वधू-वर त्याच्या खोलीत गेले.. पण दुसऱ्या दिवशी बराच वेळ झाला तरी त्यांच्या खोलीतून कोणीही बाहेर आलं नाही. कडी वाजवूनही दोघांनीही दरवाजा काही उघडला नाही. तेव्हा नवऱ्या मुलाच्या लहान भावाने खिडकीतून खोलीत उडी मारली. जेव्हा त्याने आतील दृश्य पाहिलं तेव्हा त्याचा प्रचंड मोठा धक्का बसला… (bride and groom died together due heart attack honeymoon uttarpradesh romance)

त्याने पाहिलं की, नवरा-नवरी हे त्यांच्या बेडवर अगदी निपचित अवस्थेत पडले होते. त्यामुळे नवरदेवाच्या भावाने पटकन दरवाज्याची कडी उघडली. त्यानंतर कुटुंबातील इतर लोक आत आले आणि त्यांनी दोघांनाही उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे शरीर थंड पडले होते. त्यामुळे लग्न घरात एकच हाहाकार झाला. दोघांनाही तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. तसंच दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. त्यानंतर त्यांच्या मृत्यूचं जे कारण समोर आलं त्याने सर्वांनाच धक्का बसला.

शवविच्छेदन अहवालानुसार, दोघांना एकाच वेळी हृदयविकाराचा झटका आला होता. जेव्हा ही गोष्ट समोर आली तेव्हा अनेक सवाल उपस्थित केले जाऊ लागले. दोघांना एकाच वेळी हृदयविकाराचा झटका कसा काय आला? एवढ्या लहान वयात दोघांच्या बाबतीत असं कसं घडलं? असे सवाल आता विचारले जात आहे. याचबाबत aajtak.in ने हृदयरोग तज्ज्ञ आणि फोर्टिस रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. अजय कौल यांच्याकडून या मृत्यूच्या प्रकारावर सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

काय कारण असू शकते?

डॉ. कौल म्हणतात की, कोरोना महामारीनंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आपण गेल्या काही दिवसांपासून अशा बातम्या वाचत असाल की, ज्यामध्ये लोकांना चालता-बोलता हृदयविकाराचा झटका येत आहे. हा सायलेंट हृदयविकाराचा झटका सर्व वयोगटातील लोकांना आपला बळी बनवत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp