'त्या' नादात महिलेने गमावला स्वत:चा जीव... नेमकं काय घडलं?
मेरठचे भाजप महानगर सरचिटणीस अरविंद गुप्ता मारवाडी यांच्या लहान बहिणीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात सर्जरी केली अन् असह्य वेदनेमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात जीव गमावला

वजन कमी करण्यासाठी केली बेरिएट्रिक सर्जरी

असह्य वेदना अन् मृत्यू
मेरठचे भाजप सरचिटणीस अरविंद गुप्ता मारवाडी यांची लहान बहीण रजनी गुप्ता यांच्या मृत्यूची बातमी समोर आली. रजनी लठ्ठपणाच्या समस्येने ग्रासलेल्या होत्या. त्यांनी बारीक म्हणजेच सडपातळ व्हायचं होतं. वजन कमी करण्यासाठी त्या बरेच उपाय करत होत्या. मात्र, वेट लॉसच्या प्रयत्नात घेतलेला एक निर्णय त्यांच्या जीवावर बेतला. रजनी यांच्या या निर्णयामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला.
नेमकं काय घडलं?
सध्या वजन कमी करण्यासाठी लोक बेरिएट्रिक सर्जरी करत असल्याचं पाहायला मिळतं. रजनी गुप्ता यांनी सुद्धा वजन कमी करण्यासाठी ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. खरंतर, रजनी यांची लहान मुलगी सुद्धा लठ्ठपणाच्या समस्येमुळे त्रस्त होती. अशातच, आई आणि मुलीने ही सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया करण्यासाठी 3 लाख 70 हजार रुपये चार्ज केले.
मेरठच्या न्यूटीमा या खाजगी रुग्णालयात रजनी यांची बेरिएट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी 55 वर्षीय रजनी यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचं नाव ऋषि सिंघल असल्याची माहिती समोर आली.
दुसऱ्याच दिवशी पोटात वेदना
मिळालेल्या माहितीनुसार, 11 जुलै रोजी रजनी यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, सर्जरी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 12 जुलै रोजी रजनी यांच्या पोटात असह्य वेदना होऊ लागल्या. डॉक्टरांना याबद्दल सांगितले असता त्यांनी रजनी यांना वेदना कमी होण्यासाठी औषधे सुद्धा दिली. परंतु, रजनी यांना त्या ओषधांचा काहीच फायदा झाला नाही.
हे ही वाचा: Narendra Jadhav Mumbai Tak Baithak 2025: '...तर जास्त भाषा सुरुवातीपासून मुलांवर न लादलेल्या बऱ्या', नरेंद्र जाधवांनी मांडलं रोखठोक मत
असह्य वेदनेमुळे मृत्यू
औषधे घेऊन सुद्धा वेदना कमी न झाल्यामुळे त्यांचा एक्स-रे काढण्यात आला. एक्स रे काढल्यावर सर्जरीदरम्यान चुकीच्या पद्धतीने स्टिचिंग केल्याचं आढळून आलं. अशा स्टिचिंगमुळे रजनी यांच्या शरीरातील नसांमध्ये लीकेज झालं. यामुळे संपूर्ण शरीरात संसर्ग पसरला आणि इंफेक्शनमुळे रजनी यांचा मृत्यू झाला.
डॉक्टरांवर केले आरोप
रजनी यांच्या नातेवाईकांच्या मते, डॉक्टरांनी रजनी यांची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना आरोग्यासंबंधी त्रास उद्भवू लागला. डॉक्टरांनी सर्जरी करताना चुकीच्या पद्धतीने टाके घातल्यामुळे संपूर्ण शरीरात इंफेक्शन पसरला आणि त्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
हे ही वाचा: अंघोळ करताना काढले व्हिडीओ अन् घरी जाऊन तिच्यासोबत... त्या महिलेसोबत नेमकं काय घडलं?
रजनी यांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्यामुळे नातेवाईकांमध्ये डॉक्टरांबद्दल संताप पाहायला मिळत आहे. रजनी यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून डॉक्टरांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या हे प्रकरण चर्चेचा विषय ठरत आहे.