Narendra Jadhav Mumbai Tak Baithak 2025: '...तर जास्त भाषा सुरुवातीपासून मुलांवर न लादलेल्या बऱ्या', नरेंद्र जाधवांनी मांडलं रोखठोक मत
Narendra Jadhav: मुलांच्या विचारक्षमतेवर परिणाम होत असेल अधिक भाषा मुलांवर सुरुवातीपासूनच लादू नये. असं स्पष्ट मत त्रिभाषा सूत्र समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी मुंबई Tak बैठकमध्ये बोलताना व्यक्त केलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबई Tak बैठकीत त्रिभाषा सूत्र समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव

पाहा नरेंद्र जाधव नेमकं काय म्हणाले

त्रिभाषा सुत्रावर नरेंद्र जाधव यांचं नेमकं मत काय?
Mumbai Tak Baithak 2025 Narendra Jadhav: मुंबई: 'पहिलीपासून एवढा ताण टाकायचा का? यावर आता विचार करायची गरज आहे. जर मुलांच्या विचारक्षमतेवरच परिणाम होणार असेल तर जास्त भाषा सुरुवातीपासून न लादलेल्या बऱ्या.' असं रोखठोक मत त्रिभाषा सूत्र समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी मुंबई Tak बैठक या विशेष कार्यक्रमात मांडलं.
त्रिभाषा सूत्र याला राज्यभरात जोरदार विरोध झाला. ज्यानंतर राज्यातील फडणवीस सरकारने जीआर मागे घेतला. त्यानंतर या मुद्द्यावर नेमकं काय करता येईल यासाठी नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली त्रिभाषा सूत्र समितीचं गठन करण्यात आलं.
दरम्यान, याच समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी मुंबई Tak बैठकीत त्रिभाषा लागू केली गेली पाहिजे की नाही यावर अगदी स्पष्टपणे आपलं मत व्यक्त केलं.
पाहा मुंबई Tak बैठकीत नरेंद्र जाधव नेमकं काय म्हणाले
'डॉक्टर माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती, अशी माहिती नरेंद्र जाधव यांनी दिली. इयत्ता पहिली ते चौथी या वर्गात इंग्रजी आणि मराठीत भाषेत हिंदी सक्तीचं करावं, असं माशेलकरांनी अहवालात सांगितलं. मध्यंतरी सरकार बदललं गेल्याने माशेलकरांचा अहवाला तसाच ठेवला आणि त्याच अहवालावर जीआर काढण्यात आला होता.'