कोल्हापूर: नव्यानेच लग्न झालेल्या पती-पत्नीचा बाथरूममध्ये एकाच वेळी मृत्यू, असं घडलं तरी काय?

मुंबई तक

बुरुडे गावचे रहिवासी असलेले सागर करमलकर (वय 32) आणि सुषमा (वय 26) यांचा विवाह 20 मे रोजी झाला होता. रविवारी हे जोडपं अम्बोलीमध्ये फिरायला गेलं होतं.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गॅस गिझर लिक झाल्यानं दाम्पत्याचा मृत्यू?

point

कोल्हापूरमधील आजऱ्यात काय घडलं?

point

बाथरूममध्ये मृतदेगह सापडल्यावर हादरलं कुटुंब

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील अजरा शहरात सोमवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. एका नवविवाहित जोडप्याचा मृतदेह त्यांच्या घरात आढळल्यानं सगलेच हादरले. त्यानंतर प्राथमिक तपासात बाथरूममधील गॅस गीझरच्या गळतीमुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय अजरा पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमकं कारण स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा >> मुंबईत 'या' भागात कोसळणार मुसळधार पाऊस! आजचा हवामानाचा अंदाज वाचून थरकापच उडेल

फोन लागत नसल्यानं कुटुंबीयांना शंका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुरुडे गावचे रहिवासी असलेले सागर करमलकर (वय 32) आणि सुषमा (वय 26) यांचा विवाह 20 मे रोजी झाला होता. रविवारी हे जोडपं अम्बोलीमध्ये फिरायला गेलं होतं. रविवारी रात्री घरी परतल्यानंतर सागरचा फोन लागला नाही. काही वेळाने फोन थेट बंद येऊ लागला. त्यानंतर कुटुंबीय आणि मित्रांना काळजी वाटू लागली.

हे ही वाचा >> राजा रघुवंशीच्या हत्येच्या काही मिनिटांआधीचा Video आला समोर, सोनमच्या हातात काय होतं?

घरात शिरताच आला गॅसचा वास

सोमवारी सकाळी मित्र आणि कुटुंबीयांनी त्यांच्या भवेश्वरी कॉलनीतील घरात जाऊन पाहणी केली. घराचा सुरक्षा दरवाजा कुलूपबंद होता, मात्र मुख्य दरवाजा उघडा होता. आत शिरताच घरात गॅसचा वास येत होता आणि सागर व सुषमा बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले. सहायक पोलिस निरीक्षक नागेश यमगर म्हणाले, "फॉरेन्सिक पथकाने नमुने गोळा केले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजेल." या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कुटुंबीय, नातेवाईक, गावकरी हादरले

कुटुंबासाठी ही घटना हादरवून सोडणारी होती. कुटुंबीय जेव्हा घरी दाखल झाले, तेव्हा जेवणासाठी हॉटेलातून मागवलेले पदार्थ टेबलवरुन पडून होते. नव्यानं मांडलेला संसार असा अचानक आणि भयावह पद्धतीनं उध्वस्त होताना पाहून गावातही हळहळ व्यक्त होतेय. या घटनेची माहिती मिळताच, गावातील लोकांनी आणि नवविवाहित दाम्पत्यांच्या नातेवाईकांनी घरासमोर गर्दी केली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp