कुणबी प्रमाणपत्र आणि OBC आरक्षण, जरांगे-पाटलांची नेमकी मागणी काय? जाणून घ्या 10 प्रश्नांची उत्तरं
राज्यात मराठा आरक्षणावरुन आता रान उठले आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असतानाही राज्य सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे मराठा नेमके कोण, त्यांची सध्याची स्थिती काय आणि आरक्षणाचा नेमका फायदा कोणाला आणि किती होणार असा आता सवाल उपस्थित केला जात आहे.
ADVERTISEMENT

Maratha Reservation : महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरुन राजकारण तापले आहे. त्यानिमित्ताने आता मराठा आरक्षणाचे आंदोलनही आता आणखीन पेटले आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी या वर्षीच्या सप्टेंबरपासून आंदोलन (agitation) पुकारले होते. त्यांच्यामुळे राज्यातील मराठा समाज पुन्हा एकदा एकत्र आला. हे आंदोलन तापलेले असतानाच काही दिवसांनी मात्र त्याला हिंसक वळण लागले. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर राज्य सरकारने (Government of Maharashtra) त्यांच्याबरोबर चर्चा सुरु केली. त्यानंतर सरकारनेही त्यांना आरक्षणाचे आश्वासन दिले. आश्वासनानंतरही सरकारने निर्णय घेण्यासाठी वेळ मागितला त्यामुळे जरांगे पाटील यांचे आरक्षणासाठी चाललेल्या आंदोलन काही दिवस थांबवण्यात आले.
…म्हणून आंदोलनाचा मार्ग
मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सरकारने वेळ मागितल्यानंतर त्यांना सरकार वेळकाढूपणा करु लागले आहे असं वाटू लागले. मराठा आरक्षणासाठी सरकार कोणत्याही पातळीवर ठोस पाऊलं उचलत नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर मात्र त्यांनी ऑक्टोबर महिन्यात पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग पत्करला आणि आंदोलन टोकदार बनले.
हे ही वाचा >> Maratha Reservation: ‘साहेब याचे परिणाम बघा कसे भोगायला लागतील..’, जरांगे-पाटलांचा कोणाला थेट इशारा?
आत्महत्यांचा सत्र सुरुच
सरकारने चर्चा केल्यानंतर सुरु झालेल्या आंदोलनाला मात्र आता वेगळं वळण लागले. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवरुन सुरु झालेले आंदोलनाने आत्महत्यांच्या सत्रात बदलत गेले. आत्महत्येचं सत्र इतकं चालू झाले की, एका पाठोपाठ एक अशा 5 लोकांनी आत्महत्या केल्या. मात्र त्यानंतर वेगवेगळ्या माध्यमांच्या अहवालानुसार 7 ते 10 जणांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचे उघड झाले. तर त्यानंतर बुधवारीही 4 नागरिकांनी कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्यावर वेळीच उपचार केल्याने त्यांचा जीव वाचला होता.
जरांगे-पाटलांचा पुन्हा इशारा
यापूर्वी परभणीत एका 35 वर्षाच्या तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. तर मंगळवारी एका तरुणाने पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. आत्महत्या वाढत गेल्या नंतर मात्र मनोज जरांगे यांच्याकडूनही तरुणांना आवाहन करण्यात येऊ लागले. कोणीही हिंसाचार करू नका आणि आत्महत्येसारखे गंभीर पाऊल उचलू नका असं वारंवार आवाहन त्यांच्याकडून करण्यात येऊ लागले. सरकारकडून बुधवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, त्यानंतरही मनोज जरांगे यांनी सरकारला सांगितले की, मी आता पाणीही घेणार नाही असं त्यांनी सांगितले.