Maharashtra Weather: राज्यभरात पावसाचा हाहाकार, कोकणात वरूणराजाचं रौद्र रुप.. नागरिकांनो काळजी घ्या!

मुंबई तक

Maharashtra Weather Today: भारतीय हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी 19 ऑगस्ट रोजी  हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

ADVERTISEMENT

maharashtra weather (grok)
maharashtra weather
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यभरात पावसाचं थैमान

point

19 ऑगस्ट रोजी या भागांना येलो अलर्ट जारी

Maharashtra Weather : भारतीय हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी 19 ऑगस्ट रोजी  हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः मुंबई, रायगड, ठाणे, आणि पालघर या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांसाठी हवामान विभागाने ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे. 

हे ही वाचा : राज्यभरात पावसाचा हाहाकार, मुंबईत सलग तीन दिवस धो धो सुरूच, लोकल वाहतुकीवर परिणाम

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र :

कोकण भागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरही हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. सांगलीत पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे, कारण किनारपट्टीवर 50 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे.

मराठवाडा आणि विदर्भ :

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाता पाऊस अपेक्षित असेल. तर विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp