…तर मी नरेंद्र मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात टाकेन -प्रकाश आंबेडकर

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

prakash Ambedkar targets Rss chief mohan Bhagwat and Narendra Modi.
prakash Ambedkar targets Rss chief mohan Bhagwat and Narendra Modi.
social share
google news

Prakash Ambedkar Mohan Bhagwat : विजयादशमी निमित्त नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात शस्त्र पूजन कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी संबोधित केले. मोहन भागवत यांच्या भाषणावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी टीकास्त्र डागलं. इतकंच नाही, तर मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांना अटक करु, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघाच्या विजयादशमी उत्सवात आज मुख्य भाषण केलं. या भाषणात डॉ. भागवत यांनी 2024 च्या निवडणुकीसाठी लोकांना भडकावून मत घेतले जाण्याची शक्यता वर्तवली आहे. डॉ. भागवतांच्या याच भाषणावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली. “मोहन भागवतांचे भाषण म्हणजे चोराच्या मनात चांदणं”, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली.

हे ही वाचा >> ‘पुढचं येणारं सरकार एका पक्षाचं नको…’, उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण

“लोकांची मन खराब करणारे तेच आहेत. मोहन भागवतांचे भाषण म्हणजे चोराच्या मनात चांदणं. त्यांनी मणिपूरमध्ये तेच केलं. मुसलमानांच्या संदर्भात त्यांनी तेच केलं. औरंगजेबाचं स्टेट्स ठेवल्यानंतर कारवाई करणारे तेच आहेत. दंगा माजवणारे आरएसएस आहे. त्यामुळे आरएसएसने लोकांना आधीच सांगितलं की आम्ही दंगली माजवून मतं घेणार आहोत”, असे प्रकाश आंबेडकर मोहन भागवतांच्या भाषणावर बोलताना म्हणाले.

मोदी, भागवतांना तुरुंगात पाठवू; आंबेडकरांनी सांगितलं कारण

आंबेडकर पुढे म्हणाले की, “ही निवडणुकीसाठीची सावरासावर आहे. संघ आणि भाजप एकच आहेत. मोहन भागवत म्हणजे मोदी आणि मोदी म्हणजे मोहन भागवत. आपण सत्तेत आल्यास बेकायदेशीर शस्त्र पूजन करणाऱ्या नरेंद्र मोदी आणि मोहन भागवतांना तुरूंगात टाकू”, असे विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> “भाजप मला तुरुंगात टाकायला निघालं होतं”, हसन मुश्रीफांच्या विधानाने ‘खळबळ’

“नागपुरातला संघाचा दसरा मेळावा, शस्त्रांची पूजा करणारा मेळावा. कारखानदार यंत्रांची अन लष्कर शस्त्रांची पुजा करते. परंतु संघ शस्त्र पूजन का करते, हे स्पष्ट व्हावं”, असेही आंबेडकर म्हणाले.

रावण दहन प्रथा बंद करावी…

प्रकाश आंबेडकर रावण दहनाच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले की, “रावण दहनाला आदिवासींचा विरोध आहे. भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाकडे पहायला हवे. पूर्वी दक्षिणेत राम दहनाचे कार्यक्रम व्हायचे. नेहरूंनी मध्यस्थी केल्याने ही प्रथा थांबली. आदिवासींची ही मागणी हिंदुत्ववादी संघटनांना आवाहन की त्यांनी ही प्रथा थांबवावी. रावणदहन कार्यक्रम थांबविण्यासाठी संघानं पुढाकार घ्यावा. धर्म सकारात्मक बाबींवर चालावा, नकारात्मक बाबींवर नव्हे”, असे आवाहन आंबेडकरांनी आरएसएसला केले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT