कुणी चहा घेत होतं, कुणी गप्पा मारत होतं... कार आली आणि सर्वांना चिरडून गेली, सदाशिव पेठेत काय घडलं?
हा अपघात सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलजवळील एका चहाच्या टपरीवर घडला. जयराम मुळे (वय 27) हा तरुण आपला वाढदिवस साजरा करून परतत असताना त्याने आपली कार अत्यंत वेगानं चालवत अनेकांना उडवलं.
ADVERTISEMENT

पुणे : कुणी चहा घेत होतं, तर कुणी मित्रांशी गप्पा मारत होतं, तर कुणी रस्त्यावरुन चालत जात होतं. शुक्रवारी संध्याकाळीही सदाशिव पेठ रोजच्या सारखीच MPSC च्या विद्यार्थ्यांनी गजबजलेली होती. एवढ्यात एक भरधावर कार आली आणि काही क्षणात हे चित्र बदललं. काही क्षणांनंतर सदाशिवपेठ आरडा-ओरडा आणि किंकाळ्यांनी हादरली. नशेत धुंद असलेल्या एका कार चालकानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांना चिरडलं. या अपघातात 13 विद्यार्थी जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.
सदाशिव पेठेत काय घडलं?
हे ही वाचा >> शरीर संबंधाला विरोध, वादानंतर संतापलेल्या पत्नीने अंगावर रॉकेल ओतलं, पतीने थेट गॅसवरुन...
हा अपघात सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलजवळील एका चहाच्या टपरीवर घडला. जयराम मुळे (वय 27) हा तरुण आपला वाढदिवस साजरा करून परतत असताना त्याने आपली कार अत्यंत वेगानं चालवत अनेकांना उडवलं. यावेळी चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी जमलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना त्यानं जोरदार धडक देत फरफटत नेलं. प्रत्यक्षदर्शींनुसार, कारने काही विद्यार्थ्यांना फरफटत नेलं, ज्यामुळे ते गंभीर झालेत. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने संचेती रुग्णालय आणि मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
चालकाकडे लायसन्सही नव्हतं
हे ही वाचा >> मंत्री प्रताप सरनाईक म्हणतात, 'हिंदी आमची लाडकी...'
पोलिस सूत्रांनुसार, चालक जयराम मुळेकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते. तो नशेत असल्याने कारवरील नियंत्रण गमावून त्याने ही दुर्घटना घडवली. पोलिसांनी जयरामला ताब्यात घेतले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे.
डीसीपी काय म्हणाले?
DCP (क्राईम) निखिल पिंगळे यांनी या घटनेची माहिती दिली. ते म्हणाले, "चालक जयराम मुळे नशेत होता, हे स्पष्ट झालं आहे. या प्रकरणाला गांभीर्यानं घेतलं असून, मोटर वाहन कायदा आणि भारतीय न्याय संहिता (BNS) यांच्या संबंधित कलमांनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल."