मुंबईला येणाऱ्या एअर इंडिया विमानात बिघाड, डाव्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर कोलकातामध्येच...
विमानात कोलकातामध्ये थांबा घेताना हा तांत्रिक बिघाड झाला. विमानाने पहाटे 12:45 वाजता नियोजित वेळेत कोलकात्यात लँडिंग केलं, पण...
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सॅन-फ्रॅन्सिस्कोहून मुंबईला येणाऱ्या फ्लाईटमध्ये बिघाड

कोलकातामध्ये थांबा घेतल्यावर विमानाला विलंब
Air India Flight : एअर इंडियाचं विमान आणि त्यातले तांत्रिक बिघाड हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानं जगाला हादरवलेलं असतानाच, बिघाडाच्या घटना मात्र अजूनही सुरूच आहेत. मंगळवारी पहाटे, सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट AI180 ला कोलकाता विमानात तांत्रिक बिघाड झाला.
विमानात कोलकातामध्ये थांबा घेताना हा तांत्रिक बिघाड झाला. विमानाने पहाटे 12:45 वाजता नियोजित वेळेत कोलकात्यात लँडिंग केलं, पण डाव्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं पुढील प्रवासाला विलंब झाला. सकाळी 5:20 वाजता कॅप्टनने प्रवाशांना विमानातून उतरण्याचे निर्देश दिले. हा निर्णय उड्डाण सुरक्षिततेसाठी घेतल्याचं कॅप्टनने सांगितलं.
हे ही वाचा >> "तर मी राजकारण सोडेल राजकारण...", अंबानींबद्दलच्या 'त्या' वक्तव्यावरुन काय म्हणाले अजित पवार?
मुंबई अहमदाबाद फ्लाईटही रद्द
सोमवारी सुद्धा एअर इंडियाच्या मुंबई ते अहमदाबाद फ्लाइट AI2493 ला तांत्रिक कारणांमुळे रद्द करण्यात आलं. एअरबस A321-211 (VT-PPL) या विमानाला विलंब झाला आणि त्याचवेळी वैमानिकाने त्यांच्या फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशन (FDTL) ची मर्यादा ओलांडली, त्यामुळे उड्डाण रद्द करावं लागलं.
दिल्ली रांची विमानही टेक ऑफनंतर परत उतरवलं
दुसरीकडे, दिल्लीहून रांचीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला सोमवारी तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफनंतर काही वेळातच दिल्लीला परतावं लागलं. बोइंग 737 मॅक्स 8 हे विमान रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावर संध्याकाळी 6:20 वाजता उतरणार होते. तपासणी आणि परवानगीनंतर विमानाने पुन्हा नियमित उड्डाणे सुरू केली, असं प्रवक्त्यानं सांगितलं.
हाँगकाँगहून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे फ्लाइटमध्येही बिघाड
त्याच्या आधी हाँगकाँगहून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे फ्लाइट AI315, बोइंग 787-8 ड्रीमलाइनर, तांत्रिक बिघाडामुळे मध्येच हाँगकाँगला परतलं. हे विमान दुपारी 12:20 वाजता दिल्लीत उतरणार होते. सर्व प्रवासी सुखरूप उतरले असून विमानाची सध्या सुरक्षा तपासणी सुरू आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले, “तांत्रिक बिघाडामुळे आमच्या एका विमानाला दिल्लीला परतावे लागले. तपासणीनंतर विमानाने नियमित उड्डाणे सुरू केली. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.” या सलग घटनांमुळे प्रवाशांचे हाल झाले असून विमान कंपन्यांच्या तांत्रिक तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.