लग्नाच्या पहिल्याच रात्री पतीला म्हणालेली जवळ येऊ नकोस, नाहीतर... आता भलत्याच मुलाची एन्ट्री!

मुंबई तक

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कप्तान आणि सिताराच्या लग्नानंतर हनीमूनच्या रात्री त्यांच्यात वाद सुरू झाला. त्यावेळी सिताराने कप्तानला जवळही येऊ न देता चाकू दाखवून धमकी दिल्याचा आरोप कप्तानने केला. याबद्दल आता एक नवीन माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

हनीमूनच्या रात्री पतीला चाकू दाखवून धमकी... कप्तान आणि सिताराच्या प्रकरणात प्रकरणात भलत्याच मुलाची एन्ट्री!
हनीमूनच्या रात्री पतीला चाकू दाखवून धमकी... कप्तान आणि सिताराच्या प्रकरणात प्रकरणात भलत्याच मुलाची एन्ट्री!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याला चाकू दाखवून धमकी

point

प्रयागराजमध्ये कप्तान आणि सिताराची चर्चा

point

प्रकरणात भलत्याच मुलाची एन्ट्री

UP News: सध्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्हा कप्तान आणि सिताराच्या प्रकरणामुळे चर्चेचं केंद्र बनलं आहे. दोघांच्या लग्नानंतर हनीमूनच्या रात्री त्यांच्यात वाद सुरू झाला. त्यावेळी सिताराने कप्तानला जवळही येऊ न देता चाकू दाखवून धमकी दिल्याचा आरोप कप्तानने केला. तसेच, सिताराने हे सगळं तिचा प्रियकर अमनसाठी केलं असल्याचा देखील आरोप कप्तानने केला. दुसरीकडे, सितारा अमनला ओळखत नसल्याचं सिताराने सांगितलं. नेमकं काय खरं? सविस्तर जाणून घ्या. 

कोण आहे अमन? 

सितारा आणि कप्तानच्या प्रकरणासंदर्भात यूपी Tak च्या टीमने अमनच्या नातेवाईकांशी संवाद साधला. त्यावेळी अमनबद्दल विचारले असता, त्याच्या नातेवाईकांनी तो गुजरातमधील प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला असून तो दोन महिन्यांपासून घरी आला नसल्याचं सांगितलं. 

अमनच्या आईने काय सांगितलं?

अमनच्या घरच्यांना सितारा आणि कप्तानबद्दल विचारल्यानंतर त्यांनी त्या दोघांना ओळख नसल्याचं सांगितलं. आपल्यावर खोटा आरोप लावत असल्याचं अमनच्या घरच्यांनी सांगितलं. त्यावेळी अमनची आई म्हणाली की एके दिवशी अमनचा मित्र संतोषने घरी येऊन अमन कोणत्या तरी मुलीसोबत पळून गेला असल्याचं सांगितलं. मात्र, यावर अमनच्या आईने अमनला फोन केला आणि त्यावेळी अमनने संतोषच्या बोलण्याला पूर्णपणे नकार दिला. 

हे ही वाचा: हिंदी भाषा सक्ती: राज ठाकरेंची मोठी घोषणा, आषाढीच्या मुहूर्तावर मुंबईतून फुंकणार रणशिंग!

गावात अमनची चर्चा

अमन खूप साधा मुलगा असून त्याची केवळ बदनामी केली जात असल्याचं गावातील एका महिलेने सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून अमन गावातच असल्याची चर्चा होती. सितारा तिच्या सासरहून पळून जाण्याआधी अमन गावातच असल्याचं गावातील लोकांचं म्हणणं आहे. अमन एके दिवशी त्याच्या मित्राच्या बाईकवरुन कोणासोबत तरी निघून गेल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे, मात्र याबद्दल खरी माहिती समोर आली नाही. 

सितारा आणि अमनमध्ये खरंच प्रेमाचं नातं होतं का? कप्तानने सितारावर केलेले आरोप खरे आहेत का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. 

हे ही वाचा: 7 जुलैला आझाद मैदानावर आंदोलन, हिंदी सक्ती होऊ देणार नाही... मराठीसाठी ठाकरेंनी रणशिंग फुंकलं

दोन्ही कुटुंबांमधील समझोता करार पाहता अमन आणि सितारा यांच्यातील प्रेमसंबंधाचा उल्लेख केला गेला आहे. त्या समझोता करारावर दोन्ही कुटुंबांच्या आणि साक्षीदारांच्या सह्या आहेत. मुलाच्या घरच्यांकडून जवळच्या नैनी पोलिस ठाण्यात दिलेल्या अर्जासोबत समझोता करार देखील जोडला आहे, जो DCP यमुनापार यांनी दिलेल्या निवेदनात देखील नमूद केला आहे. या प्रकरणा संदर्भात कप्तानच्या घरच्यांनी सगळे पुरावे दिले आहेत मात्र मुलीच्या कुटुंबियांकडून कोणतेच पुरावे गेले गेले नाहीत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp