श्रद्धा वालकर हत्या: आफताबचा नार्को टेस्टमध्ये खळबळजनक खुलासा, म्हणाला…

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हत्या प्रकरणातील आरोपी आफताबची (Aftab) गुरुवारी (1 डिसेंबर) दिल्लीतील रोहिणी येथील शासकीय रुग्णालयात नार्को चाचणी करण्यात आली. FSL चे सहायक संचालक संजीव गुप्ता यांनी सांगितले की, आफताबने नार्को टेस्टमध्येही श्रद्धाच्या हत्येची (Shaddha Murder) कबुली दिली आहे. एवढेच नाही तर आफताबने नार्को टेस्टमध्ये सांगितले की, त्याने श्रद्धाचा मोबाइल आणि कपडे नेमके कुठे फेकले. यासोबतच आफताबने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी कोणत्या शस्त्रांचा वापर केला आणि ते शस्त्र कुठे फेकलं हे देखील सांगितले आहे. आता दिल्ली पोलीस पुन्हा एकदा आफताबने सांगितलेल्या ठिकाणी हे पुरावे शोधणार आहेत.

Shraddha Murder: नॉनव्हेज खाण्यासाठी श्रद्धाला भाग पाडत होता आफताब, जीव वाचावा म्हणून…”

FSL चे सहायक संचालक संजीव गुप्ता काय म्हणाले?

FSL चे सहायक संचालक संजीव गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबची नार्को चाचणी पूर्ण झाली आहे. तब्बल दोन तास ही नार्को टेस्ट सुरू होती. यावेळी एक ज्येष्ठ भूलतज्ज्ञ, FSL चे एक मानसशास्त्रीय तज्ज्ञ, एक OT अटेंडेंट आणि FSL चे 2 फोटो तज्ज्ञ उपस्थित होते. आफताबच्या नार्को टेस्टनंतर एक पोस्ट FSL मध्ये होणार आहे. यामध्ये त्याचे समुपदेशन करण्यात येणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोर्टात नार्को चाचणीचा अहवाल महत्त्वाचा नाही

जरी आफताबने नार्को टेस्टमध्ये श्रद्धाच्या हत्येशी संबंधित रहस्य उघड केले असले तरी ते पुरावे म्हणून न्यायालयात सादर करता येणार नाहीत. मात्र, पॉलिग्राफी आणि नार्को टेस्टच्या माध्यमातून पोलिसांना आणखी पुरावे शोधण्यास मदत होऊ शकते. आफताबने सांगितलेल्या ठिकाणाहून पोलिसांनी श्रद्धाचा मोबाइल आणि कपडे जप्त केले तर या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळू शकतं.

Shraddha Murder: एक होती श्रद्धा वालकर! प्रेमाच्या ३५ तुकड्यांची आक्रंदणारी कहाणी

ADVERTISEMENT

चौकशी आणि पॉलीग्राफ चाचणीतही दिली हत्येची कबुली

आफताबने पोलीस चौकशीत आपणच श्रद्धाची हत्या केल्याचे मान्य केले होते. आफताबने 18 मे रोजी श्रद्धाची हत्या केल्याचे सांगितले होते. यानंतर त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. जे ठेवण्यासाठी त्याने 300 लिटरचा फ्रीज विकत घेतला होता. आफताब दररोज श्रद्धाच्या मृतदेहाचा एक तुकडा मेहरौलीच्या जंगलात टाकण्यासाठी जात असे.

ADVERTISEMENT

श्रद्धाच्या हत्येनंतरही आफताब त्याच फ्लॅटमध्ये राहत होता. श्रद्धाचा मृतदेह फ्लॅटमध्ये असतानाही त्याने इतर मुलींनाही तिथे आणले होते. हत्येचा संशय कुणालाही येऊ नये म्हणून आफताबने हत्येनंतर काही दिवस श्रद्धाचे सोशल मीडिया अकाउंटही वापरले होते. आफताबने श्रद्धाच्या बँक खात्यातून काही पैसेही ट्रान्सफर केले होते.

दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण उघडकीस येताच पोलिसांनी आफताबला 12 नोव्हेंबरला अटक केली होती.

पॉलीग्राफ चाचणीत आफताबने श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली होती. एवढेच नाही तर श्रद्धाच्या मृत्यूनंतर अनेक मुलींशी संबंध असल्याचेही आफताबने कबूल केले होते.

आफताबने श्रद्धाला का मारले?

श्रद्धाने आफताबसोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे. आफताबच्या अत्याचाराने ती त्रस्त झाली होती. अशा परिस्थितीत तिने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. पण आफताबला हे आवडले नाही म्हणूनच त्याने श्रद्धाची हत्या केली. मात्र, आफताबने पोलीस चौकशीत सुरुवातीला सांगितले होते की, श्रद्धा लग्नासाठी दबाव टाकत होती. यावरून 18 मे रोजी दोघांमध्ये भांडण झाले होते. यानंतर त्याने श्रद्धाची हत्या केलेली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT