अहमदनगरमध्ये ऑनर किलिंग, मुस्लिम मुलीशी लग्न करणाऱ्या हिंदू मुलाचं अपहरण आणि हत्या

मुंबई तक

मुस्लिम तरूणीशी विवाह केल्याने एका हिंदू मुलाचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात असलेल्या भोकर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. एवढंच नाही तर मुलीच्या घरातल्यांनी या मुलाचा मृतदेह नदीत फेकला. आरोपींनी ही कबुली दिल्यानंतर आता पोलीस मृतदेहाचा शोध घेत आहेत. अहमदनगरच्या भोकर गावात ही ऑनर किलिंगची घटना घडली आहे. नेमकं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुस्लिम तरूणीशी विवाह केल्याने एका हिंदू मुलाचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात असलेल्या भोकर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. एवढंच नाही तर मुलीच्या घरातल्यांनी या मुलाचा मृतदेह नदीत फेकला. आरोपींनी ही कबुली दिल्यानंतर आता पोलीस मृतदेहाचा शोध घेत आहेत. अहमदनगरच्या भोकर गावात ही ऑनर किलिंगची घटना घडली आहे.

नेमकं काय आहे हे प्रकरण?

अहमदनगरमधल्या भोकर या गावात राहणाऱ्या दीपक बर्डे नावाच्या तरूणाची त्याच्याच गावात राहणाऱ्या मुस्लिम तरूणीसोबत ओळख झाली. त्यानंतर या दोघांची मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. एक महिन्यापूर्वी या दोघांनी लग्नही केलं. या मुलीच्या घरी जेव्हा हे कळलं की हिंदू तरूणाशी आपल्या मुलीने लग्न केलंय तेव्हा या मुलीच्या घरातल्यांनी दीपकचं अपहरण केलं. त्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणावर मारहाण करण्यात आली. दीपकची हत्या करण्यात आली आणि त्याचा मृतदेह गोदावरी नदीच्या वाहत्या पाण्यात मुलीच्या कुटुंबीयांनी फेकला.

३१ ऑगस्ट २०२२ ला पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करून घेतली होती. आरोपींची कसून चौकशी करण्यात आली तेव्हा आरोपींनी हत्येची कबुली दिली. अहमदनगरमधल्या भोकर गावात हा ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार घडला.

मृतदेहाचा शोध सुरू

आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार दीपक बर्डेचा मृतदेह शोधणं सुरू आहे. पोलीस, एनडीआरएफ आणि पाणबुड्यांकडून दीपकच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. मात्र त्याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. या प्रकरणी पोलिसांनी इम्रान शेख, मजनू शेख, राजू शेख, समीर शेख आणि अन्य दोघांना अटक केली आहे. मुस्लिम तरूणीशी आपल्या मुलाने लग्न केलं आणि त्यामुळे त्याची हत्या झाली हे कळल्याने मुलाच्या घरच्या सगळ्यांना मानसिक धक्का बसला आहे.

३१ ऑगस्टला बेपत्ता झाला होता दीपक

३१ ऑगस्टला दीपक बर्डे बेपत्ता झाला होता. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. मात्र भाजप आमदार नितेश राणे यांनी या ठिकाणी जनआक्रोश मोर्चाही काढला. हिंदू संघटना आणि आदिवासी बांधवांनी या मोर्चात सहभाग घेतला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp