लिव्ह-इन-पार्टनरसोबत ‘त्या’ कारणावरून वाद पेटला! आधी निर्घृण हत्या, नंतर मृतदेह सुटकेसमध्ये भरून नदीत...
प्रेयसीला आपल्या प्रियकराबद्दल ती माहिती कळताच त्या दोघांमध्ये मोठं भांडण झालं आणि त्यानंतर रागाच्या भरात प्रियकराने त्याच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

लिव्ह-इन-पार्टनरसोबत ‘त्या’ कारणावरून वाद पेटला!

नंतर मृतदेह सुटकेसमध्ये भरून नदीत फेकला...
Murder Case: उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक तरुण त्याच्या प्रेयसीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. पण त्याचे दुसऱ्या महिलेसोबतही प्रेमसंबंध होते. प्रेयसीला आपल्या प्रियकराबद्दल ही माहिती कळताच त्या दोघांमध्ये मोठं भांडण झालं आणि त्यानंतर रागाच्या भरात प्रियकराने त्याच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या केली.
त्यानंतर आरोपींनी मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला आणि मित्राच्या मदतीने तो सुमारे 100 किलोमीटर अंतरावर यमुना नदीत फेकून दिला. प्रकरणातील तपासादरम्यान, पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. मात्र, मृतदेह अद्याप सापडलेला नाही. पोलिसांनी सांगितले की, कानपूर देहातच्या सुजनीपूर गावातील रहिवासी असलेली 20 वर्षीय मुलगी आकांक्षा उर्फ माही बारा येथील एका रेस्टॉरंटमध्ये काम करत होती. काही काळापूर्वी, तिची फतेहपूर जिल्ह्यातील हरिखेडा गावाचा रहिवासी सूरज उत्तमशी इन्स्टाग्रामद्वारे मैत्री झाली. हळूहळू, त्यांच्यात जवळीक वाढली आणि तीन महिन्यांपूर्वी, आकांक्षा बारा रेस्टॉरंट सोडून सूरजच्या सांगण्यावरून हमीरपूर रोडवरील कान्हा रेस्टॉरंटमध्ये जॉइन झाली. त्यानंतर, त्यांनी हनुमंत विहारमध्ये एक घर भाड्याने घेतलं आणि एकत्र राहू लागले.
दुसऱ्या महिलेशी असलेले संबंध कळले
21 जुलै रोजी आकांक्षाला सूरजचे दुसऱ्या महिलेशी असलेले संबंध कळले. त्यामुळे दोघांमध्ये मोठा वाद झाला. रात्री 10:30 च्या सुमारास ते त्यांच्या खोलीत परतले तेव्हा हा वाद शारीरिक हाणामारीपर्यंत पोहोचला. यादरम्यान, सूरजने आकांक्षाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने जाफरगंज येथील रहिवासी असलेल्या त्याचा मित्र आशिषला बोलावलं. त्यांनी मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला आणि तो दुचाकीवर नेत चिल्ला पुलावरून यमुना नदीत फेकून दिला.
हे ही वाचा: अनैतिक संबंधातून जीवघेणा खेळ! जावई सासरी गेला अन् पत्नीसह ‘त्या’ लोकांना सुद्धा... नेमकं काय घडलं?
फोन सुद्धा ट्रेनमध्ये सोडला
पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, घटनेनंतरही सूरजने आकांक्षाच्या मोबाईलवरून मेसेज पाठवून तिच्या कुटुंबाची दिशाभूल करणं सुरूच ठेवलं. पकडल्या जाण्याच्या भीतीने त्याने तिचा फोन सुद्धा ट्रेनमध्ये सोडला. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या मुलीचा काही पत्ता न लागल्याने कुटुंबियांनी सूरजशी संपर्क साधला. पण त्याने आपल्या प्रेयसीबद्दल काही माहिती असण्यास नकार दिला. अखेर, यामुळे वैतागून कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली, परंतु सुरुवातीला कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. नंतर, 1090 महिला हेल्पलाइनवर तक्रार दाखल केल्यानंतर, 8 ऑगस्ट रोजी हनुमंत विहार पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.