तडीपार नवऱ्याला दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन संपवले, कोणताच पुरावा ठेवला नाही; तरीही पोलिसांनी बायकोला कसे पकडले?
सुरुवातीला ही घटना नैसर्गिक मृत्यूची वाटत होती. मृताला दारू पिण्याचे व्यसन होते. मात्र, जेव्हा मृतदेहाचे पोस्ट मार्टम करण्यात आले, तेव्हा त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
हद्दपार नवऱ्याला दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन संपवले
कोणताच पुरावा ठेवला नाही
तरीही पोलिसांनी बायकोला कसे पकडले?
Crime News : कानपूरमधील चकेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 एप्रिल रोजी 50 वर्षीय आशिष शर्मा यांचा मृतदेह घरात आढळून आला होता. सुरुवातीला ही घटना नैसर्गिक मृत्यूची वाटत होती. मृताला दारू पिण्याचे व्यसन होते. मात्र, जेव्हा मृतदेहाचे पोस्ट मार्टम करण्यात आले, तेव्हा त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. आशिष शर्मा हे हमीरपूरचे रहिवासी होते. हद्दपार ठरवल्यानंतर ते कानपूरमध्ये राहत होते.
हमीरपूरमध्ये राहणारा मृताचा मुलगा लवकुश याने पोलिसांना माहिती दिली होती की, त्याचे वडील फोन उचलत नाहीत. जेव्हा तो पोलिसांसह घरी पोहोचला तेव्हा वडिलांचा मृतदेह घरात पडलेला दिसला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवला. त्या अहवालात आशिष शर्मा यांची हत्या झाल्याचे समोर आले. यानंतर मुलाने वडिलांच्या हत्येप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
कोणताही स्पष्ट पुरावा नव्हता
पोलिसांसमोर मोठे आव्हान हे होते की हत्येचा कोणताही स्पष्ट पुरावा मिळत नव्हता. तसेच त्यांची पत्नी आरती हमीरपूरमध्ये राहत असल्याने संशयही कमी होता. तपास पुढे नेत पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली. सुमारे 200 हून अधिक कॅमेऱ्यांच्या तपासणीनंतर पोलिसांना एक महत्त्वाचा पुरावा मिळाला. एका फुटेजमध्ये दिसले की, मध्यरात्री एक महिला एका तरुणासोबत मृताच्या घरात प्रवेश करते आणि काही वेळाने तिथून निघून जाते.
हे ही वाचा : रिक्षा चालकावर जीव जडला, पत्नीने भयंकर कट रचला, बँक अधिकारी असलेल्या पतीला संपवलं
ती महिला कोण?
पोलिसांनी त्या महिलेची ओळख पटवण्यासाठी एक पथक हमीरपूरला पाठवले. तिथे स्थानिक लोकांकडे चौकशी केल्यानंतर समजले की ती महिला दुसरी कोणी नसून मृताची पत्नी आरतीच आहे. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत आरोपी पत्नीने जो खुलासा केला तो अत्यंत धक्कादायक होता. तिने सांगितले की, तिचे हमीरपूरचा रहिवासी असलेल्या सबलू नावाच्या तरुणासोबत गेल्या अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. त्याच्यासोबत मिळूनच तिने पतीला वाटेतून हटवण्याचा कट रचला होता.









