NCRB Crime Report : देशात दर तासाला 3 आणि दर 20 मिनिटाला एका महिलेवर अत्याचार, महाराष्ट्रात परिस्थिती कशी?

सुधीर काकडे

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) या केंद्र सरकारच्या एजन्सीच्या आकडेवारीवरून असं दिसून येतं की, भारतात दरवर्षी चार लाखांहून अधिक महिला अत्याचाराशी संबंधीत गुन्हे नोंदवले जातात. या गुन्ह्यांमध्ये फक्त बलात्कारच नाही तर विनयभंग, हुंडाबळी, अपहरण, तस्करी, ॲसिड हल्ला यांसारख्या गुन्ह्यांचाही समावेश आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दिल्लीतील निर्भया प्रकरणाला 12 वर्ष

point

देशात कोणत्या राज्यात होतात सर्वाधिक अत्याचाच्या घटना?

NCRB Crime Report : राजधानी दिल्लीत 16 डिसेंबर 2012 च्या रात्री चालत्या बसमध्ये एका विद्यार्थिनीवर अत्याचार करत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या होत्या. बसमध्ये सहा जणांनी तिच्यावर अत्याचार करुन नंतर तिला व तिच्या मित्राला अर्धमेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून देऊन तिथून निघून गेले होते. काही दिवसांनी पीडितेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणानंतर देशभरातून संताप व्यक्त केला गेला होते. या घटनेला आज बारा वर्ष पूर्ण झालीत. त्यानंतर केले गेलेले कठोर कायदे किती प्रभावी ठरले? देशात महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये किती घट झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न NCRB च्या आकड्यांमधून करण्यात आला आहे.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) या केंद्र सरकारच्या एजन्सीच्या आकडेवारीवरून असं दिसून येतं की, भारतात दरवर्षी चार लाखांहून अधिक महिला अत्याचाराशी संबंधीत गुन्हे नोंदवले जातात. या गुन्ह्यांमध्ये फक्त बलात्कारच नाही तर विनयभंग, हुंडाबळी, अपहरण, तस्करी, ॲसिड हल्ला यांसारख्या गुन्ह्यांचाही समावेश आहे.

हे ही वाचा >> Maharashtra Cabinet : शपथविधी घेताच वाढवली मंत्र्यांची धाकधूक? शिंदे-फडणवीसांनी अडीच वर्षाबद्दल केलं सूचक वक्तव्य

कठोर कायदे करुनही या घटनांमध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही. आकडेवारी सांगते की, 2012 पूर्वी दरवर्षी सरासरी 25 हजार बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद होत होती. मात्र त्यानंतर हा आकडा 30 हजारांच्या वर पोहोचला.  2013 या एकाच वर्षात 33 हजारांहून अधिक गुन्हे दाखल झाले. 2016 मध्ये हा आकडा 39 हजारांच्या जवळ पोहोचला होता.

महिला अत्याचाराशी संबंधीत गुन्ह्यांची आकडेवारी भयावह आहे. 2012 मध्ये महिलांवरील 2.44 लाख गुन्ह्यांची नोंद झाली होती. तर 2022 मध्ये 4.45 लाखांहून अधिक प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. म्हणजेच दररोज 1200 हून अधिक केसेस दाखल होतात.

हे वाचलं का?

    follow whatsapp