Lok Sabha election 2024 : ठाकरेंची लढाई शिंदेंच्या नेत्याने केली सोपी; भाजपची झाली अडचण?

भागवत हिरेकर

Gajanan Kirtikar on Amol Kirtikar and lok Sabh election 2024 : गजानन कीर्तिकर यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे अमोल कीर्तिकर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर प्रश्न उपस्तित झाले आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai North West Lok Sabha constituency : लोकसभा निवडणुकीत राजकारण बदलणार?
उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील राजकारण काय?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४

point

गजानन कीर्तिकर यांच्यामुळे अमोल कीर्तिकर यांना दिलासा

point

महायुतीची प्रचार करताना होणार पंचाईत?

Amol Kirtikar, Mumbai North West Lok Sabha Constituency Latest News : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अमोल कीर्तिकरांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या नावाची घोषणा होताच ईडीचे समन्स त्यांना आले आणि अमोल कीर्तिकर खिचडी घोटाळ्यात फसणार अशी चर्चा सुरू झाली. पण, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांनी अमोल कीर्तिकर यांना क्लिनचीट देत ठाकरेंची लढाई सोपी केली आहे. ती कशी समजून घ्या... (Big Relife to Gajanan Kirtikar Revealed facts of Khichadi scam)

शिवसेनेत फूट पडली. खासदार गजानन कीर्तिकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले. पण, त्यांचे सुपूत्र अमोल कीर्तिकर हे उद्धव ठाकरे यांच्याच पक्षात राहिले. अमोल कीर्तिकर यांचे नाव कथित खिचडी घोटाळ्यात जोडण्यात आले. 

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अमोल कीर्तिकर सूरज चव्हाण यांच्यावर आरोप करण्यात आले. उद्धव ठाकरेंनी कीर्तिकरांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर ईडीने या प्रकरणात कीर्तिकरांना समन्स बजावले आणि त्यांची आठ तास चौकशीही केली. याच प्रकरणात उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले संजय निरुपम यांनीही अमोल कीर्तिकरांवर खिचडीचोर, लाचखोर असे आरोप केले. पण, या सगळ्यात गजानन कीर्तिकर यांनी केलेल्या खुलाशाने भाजप आणि महायुतीच अडचणीत आली आहे. 

कीर्तिकर काय म्हणाले ते आधी बघा...

खिचडी घोटाळ्यात पैसे घेतल्याचा आरोप अमोल कीर्तिकरांवर आहे. त्याबद्दल गजानन कीर्तिकर म्हणाले, "आता अमोलवर काय आरोप आहे? अमोलवर आरोप असा आहे की खिचडी पुरवठा करणारी जी कंपनी आहे, त्याची स्थापना केली आहे संजय माशेलकरने. कोविड काळात ते लोकं सामाजिक कार्य करत होते."

हेही वाचा >> संजय राऊतांपर्यंत पोहोचलेला खिचडी घोटाळा नेमका आहे तरी काय?

"ज्यावेळी जम्बो हॉस्पिटलची संकल्पना आली तेव्हा अनेक व्हेंडर लागले. त्यात डॉक्टर, मेडिक सप्लाय कॉर्ड, बेडशीट. तेव्हा तिथल्या पेशंट्सना खिचडीचीही गरज होती. तेव्हा संजय माशेलकर यांनी कंपनी स्थापन केली. ज्यामध्ये अमोल आणि सूरज पण नाही. त्यांनी फक्त सप्लाय चेनमध्ये मदत केली."

"संजय माशेलकरांच्या कंपनीला प्रॉफिट (नफा) झाला. आणि प्रॉफिट (नफा) शिवाय कोणी धंदा करत नाही. त्यात स्कॅम (घोटाळा) वगैरे काही नाही. त्यांचं मानधन दिलं. त्याचा चेक दिला. त्यावर इन्कम टॅक्स (प्राप्तीकर परतावा) लागला आहे."

हेही वाचा >> Raj Thackeray यांना पहिला धक्का! मोदींना पाठिंबा देताच 'या' नेत्याने सोडली साथ! 

"चौकशी चौकशी म्हणजे काय.... मनी लाँड्रि्ंग केलं का? अमोल कीर्तिकर यांना त्रास देण्याचं कारण म्हणजे ते ज्या शिवसेनेत आहेत... भाजप नेते सांगतात म्हणून स्कॅम (घोटाळा) झाला म्हणून चौकशी होते."

"ईडीचे अधिकारीही सांगतात की, यात नाही दम नाही. इन्क्वायरी (चौकशी) सगळी झालेली आहे. कस्टोडियल इन्क्वायरीची गरज नाही, कारण क्रिमिनल केस नाही."

अमोल कीर्तिकरांचं पारड होणार जड?

गजानन कीर्तिकर हे एकीकडे अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. भाजपही अमोल कीर्तिकर यांच्याविरोधात आक्रमक झालेली आहे. त्याचबरोबर काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले संजय निरुपमही आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. 

अशातच गजानन कीर्तिकर यांनी केलेल्य या खुलाशाने भाजप, शिवसेनेसह महायुतीची कोंडी झाली आहे. कारण "अमोल कीर्तिकर यांना त्रास देण्याचं कारण म्हणजे ते ज्या शिवसेनेत आहेत... भाजप नेते सांगतात म्हणून स्कॅम (घोटाळा) झाला म्हणून चौकशी होते", असे सांगत अमोल कीर्तिकर का ईडीच्या रडारवर आलेले आहेत. हेच गजानन कीर्तिकरांनी सांगितले आहे.

हेही वाचा >> "काँग्रेस नेत्यांनी कठोर भूमिका घ्यायला हवी होती"; गायकवाडांनी सोडलं मौन

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत म्हणजेच सत्ताधारी पक्षात असलेल्या गजानन कीर्तिकरांनीच अमोल कीर्तिकर यांनी कुठलाही घोटाळा केला नाही. मिळालेल्या नफ्यातून त्यांना पैसे मिळाले आणि त्यांनी प्राप्तीकरही दिलाय, असे म्हणत क्लीनचिट दिली आहे. 

इतकंच नाही तर कीर्तिकर म्हणतात, "ही जी पद्धती आणि संस्कृती आणलेली आहे भाजपने ती घातक आहे. आता चारशे पार ते (भाजप) करतायेत. मोदींना पंतप्रधान करू आम्ही, पण भाजपची ही जी वृत्ती आहे, ही त्यांना फार अडचणीत आणणारी आहे." त्यामुळे आरोप आणि चौकश्या राजकीय असल्याचेच कीर्तिकरांनी अप्रत्यक्षपणे अधोरेखित केले आहे. त्यामुळे प्रचार करताना ठाकरेंची लढाई सोपी झाल्याचे दिसत आहे. तर भाजप आणि शिवसेना बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp