Lok Sabha Election 2024: भाजप खासदार ठाकरेंच्या शिवसेनेत आल्याने जळगावात कोणाचा होणार गेम?

मुंबई तक

ADVERTISEMENT

उन्मेश पाटलांमुळे भाजपला फटका बसणार?
उन्मेश पाटलांमुळे भाजपला फटका बसणार?
social share
google news

Unmesh Patil join Shiv Sena: निलेश झालटे, मुंबई: भाजपची यादी जाहीर झाली आणि काही विद्यमान खासदारांचं तिकिट कापत नव्या चेहऱ्यांना संधी दिली. यात एक महत्त्वाच नाव होतं जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांचं. जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचं तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे अर्थातच उन्मेश पाटील नाराज असून त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत  यांची भेट घेतली आणि नंतर त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. 

उन्मेष पाटील यांच्या या धक्क्यामुळं भाजपसाठी सोपी असलेली ही लढाई आता अवघड होऊन बसलीय. एकीकडे उन्मेश पाटलांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय तर दुसरीकडे ठाकरेंनी तेथील चर्चेत असलेले उमेदवार करण पवार यांना उमेदवारी देत भाजपसाठी कडवं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे भाजपचं बनलेलं गणित उन्मेश पाटलांमुळं कसं बिघडणार आहे हेच आपण पाहणार आहोत.

जळगाव मतदारसंघाचं नेमकं गणित काय?

जळगाव लोकसभा मतदारसंघ. फार इन्ट्रेस्टिंग मतदारसंघ आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ. पण प्रत्येक वेळी विद्यमान खासदारांना, जाहीर केलेल्या उमेदवाराला धक्का देण्याचं भाजपचं धक्कातंत्र फार चर्चेत असतं. म्हणजे बघा 2019 मध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपने तत्कालीन खासदार ए.टी. पाटलांचा पत्ता कापला होता. ए.टी. पाटील हे दोनदा जळगाव लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. त्यांना पक्षाने तिसऱ्यांदा संधी नाकारुन त्यांच्या जागी उन्मेश पाटलांना संधी दिली होती. इथे उन्मेश पाटलांच्या आधी सध्याच्या उमेदवार स्मिता वाघांना आधी तिकीट दिलेलं, मात्र ते नंतर कापलं आणि उन्मेश पाटलांना संधी मिळाली होती. अर्थातच या संधीचं सोनं करत उन्मेश पाटील हे राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकरांचा पराभव करत विक्रमी मतांनी जिंकत लोकसभेत पोहोचले होते. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

2014 मध्ये चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून ते आमदार झाले होते. तेव्हा उन्मेष पाटलांनी राष्ट्रवादीच्या राजीव देशमुखांचा पराभव केला होता. मात्र आता पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे त्यांचा पत्ता कापण्यात आला असल्याचं बोललं जात आहे. 2024 मध्ये भाजपने दुसऱ्यांदा खासदारकीची संधी नाकारली. यामुळंच पाटील नाराज झाले आणि आता ठाकरेंच्या सेनेत दाखल झाले आहेत.

हे ही वाचा>> 'मविआ'त सांगलीचा वाद चिघळला! राऊत म्हणाले, "आम्ही निर्णय घेतलाय"

तसं पाहिल तर सध्या सहापैकी सहा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. त्यामुळं उन्मेश पाटील जर मैदानात उभे राहिले तर आव्हान नक्कीच अवघड असणार आहे. 

ADVERTISEMENT

जळगाव शहर- सुरेश भोळे भाजपचे आमदार आहेत. त्यांचा प्रभाव असला तरी ठाकरे, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचीही मतं या मतदारसंघात आहेत. 

ADVERTISEMENT

जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील शिवसेना शिंदे गट, ग्रामीणमध्ये गुलाबराव देवकरांचाही प्रभाव दिसून येतो. 

अमळनेर - अनिल पाटील मंत्री, अजितदादा राष्ट्रवादी, शरद पवार साहेबराव पाटील. शिरीष चौधरी माजी आमदार यांचीही ताकद.

पारोळा-एरंडोल- शिंदे गटाचे चिमणराव पाटील यांचा प्रभाव आहे. करण पवार यांची इथं ताकद चांगली आहे.

चाळीसगाव- मतदार संघात भाजपाचे खासदार उन्मेश पाटील यांचा प्रभाव आहे. आमदार मंगेश चव्हाण यांचंही इथं वजन आहे. मंगेश चव्हाणांच्या मागे गिरिश महाजनांची ताकद असल्याचं बोललं जातं आहे.

पाचोरा-भडगाव - आमदार किशोर पाटील शिंदे गट यांचा प्रभाव असं असलं तरी वैशाली सूर्यवंशी यांनी ठाकरेंच्या बाजूनं आपला चांगला जम बसवला आहे.

हे ही वाचा>> "सुनील तटकरेंचं 'ते' प्रकरण उद्धव ठाकरेंपर्यंत जात होतं", सोमय्यांचा मोठा स्फोट

स्मिता वाघ यांच्यामागे महायुतीची संपूर्ण ताकद असणार आहे. स्थानिक पातळीवर संपूर्ण मतदारसंघात संपर्क जास्त न ठेवल्याचा फटका उन्मेश पाटलांना बसला असल्याचं बोललं जात आहे. 2019 ला प्रचार सुरु असताना स्मिता वाघांचं जाहीर झालेलं तिकीट कापण्यात आलं होतं. मात्र, मूळ भाजपच्या कार्यकर्त्या असलेल्या स्मिता वाघ यांनी जास्त नाराजी न व्यक्त करता पक्षाचं काम आपल्या परीने कायम ठेवलं. त्याच्याच फायदा त्यांना झाला आणि आता उन्मेश पाटलांचं तिकीट कापत त्यांना पुन्हा संधी मिळाली आहे. 

उन्मेश पाटील हे महाराष्ट्रातील पहिले भाजपचे खासदार आहेत ज्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत ठाकरेंच्या सेनेत दाखल होण्याचा निर्णय घेतलाय. जळगावातून स्मिता वाघांच्या विरोधात माजी महापौर कुलभूषण पाटील, भाजपतून ठाकरे गटात प्रवेश केलेल्या अमळनेरच्या ललिता पाटील इच्छुक होत्या. मात्र, आता उन्मेश पाटलांमुळे जळगावचं तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. उन्मेष पाटलांना शरद पवार-उद्धव ठाकरेंप्रतीची सहानुभूती शिवाय एकनाथ खडसे आणि काँग्रेसची साथ योग्य पद्धतीनं मिळाली तर हा सामना चुरशीचा होणार यात वाद नाही.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT