PM Modi : मंगळसूत्र ते मुस्लीम... 32 प्रश्न अन् पंतप्रधान मोदी; वाचा खास मुलाखत

मुंबई तक

ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आजतक'ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी मंगळसूत्र ते मुस्लीम आणि जम्मू काश्मीरपासून ते केरळ... विरोधकांच्या प्रत्येक आरोप आणि निवडणुकीतील मुद्द्यांवर भूमिका मांडली. इंडिया टुडे ग्रुप न्यूजचे संचालक राहुल कंवल, व्यवस्थापकीय संपादक अंजना ओम कश्यप, व्यवस्थापकीय संपादक श्वेता सिंग आणि सल्लागार संपादक सुधीर चौधरी यांच्या प्रश्नांना पंतप्रधानांनी उत्तरे दिली.

32 प्रश्न, चार संपादक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी! संपूर्ण मुलाखत वाचा जशीच्या तशी....

अंजना,
नमस्कार, आपण पाहात आहात आज तक.. मी आहे अंजना ओम कश्यप..
वो जो मेरे सामने मुश्किलो का अंबार है.. उसीसें होसलों की मिनार है.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, आपणच लिहिलेल्या कवितेच्या या दोन ओळी आहेत. तुम्ही 400 पार करण्याचं ध्येय असलेलं स्वप्न पाहिलं आहे. यावरच बोलण्यासाठी माझे तीन सहकारी माझ्यासोबत आहेत. श्वेता सिंह, राहुल कंवल आणि सुधीर चौधरी.. आम्ही चौघं तुमच्याशी प्रश्नउत्तरं विचारणार आहोत. 

मोदी – आपल्या सर्वांचं स्वागत.. आज तकच्या प्रेक्षकांना माझा नमस्कार.. मला आनंद होतो की, संपूर्ण निवडणुकीत आज तकच्या लोकांना मला भेटण्याचा योग आला. पण चार जण एकत्र आले की, काही प्रकारच्या म्हणी आहेत. पण चांगली म्हण म्हणू शकेल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रश्न – प्रधानमंत्रीजी, लोक निवडणुकीची तयारी करतात तेव्हा उमेदवारांची यादी तयार करतात. कोण स्टार प्रचारक असणार.. आणि जाहीरनामा तयार करतात. पण तुम्ही पुढील 100 दिवसांचा अजेंडा तयार करत आहात. यावरच माझा प्रश्न आहे की, 2014 मध्ये तुम्ही सत्तेत आल्यावर 100 दिवसांच्या आत काळ्या पैश्यांवर एसआयटी स्थापित केली. 2019 मध्ये 62 व्या दिवशी ट्रिपल तलाक पासून मुक्ती दिली आणि 66 व्या दिवशी काश्मिरमध्ये कलम 370 रद्द केलं. 2024 तुम्ही सत्तेत आलात तर 100 दिवसांमध्ये काय करणार? आणि कोणते कठोर निर्णय घेणार?

मोदी – एक तर हा माझ्या कार्यशैलीचा भाग आहे. मी गोष्टी आधीच चांगल्या पद्धतीनं करतो. मी जेव्हा संघटनेचं काम करायचो तेव्हा पण मी आधीच ठरवायचो की, मला यावेळी हे करायचं आहे.. त्यावेळी ते करायचं आहे. त्यामुळे मी वेळेचा योग्य वापर करतो आणि प्राधान्यक्रम पण सहजतेनं ठरवतो. मी कोणत्या मॅनेजमेंट स्कुलचा विद्यार्थी नाही पण, काम करत करत या गोष्टी डेव्हलप होत गेल्या. मी जेव्हा गुजरातमध्ये होतो तेव्हा गुजरातमध्ये पण जे क्रिटिक्स असतात, ऑब्जर्वर्स असतात ते पहिल्यांदा काय घडतं ते पाहतात. सुन पण जेव्हा लग्न करुन घरी येते तेव्हा पहिल्या सात आठ दहा दिवसांत सुन पाय कशी ठेवते, हे पाहिलं जातं. हे स्वाभाविक आहे. हा दुनियेचा नियम आहे. मला वाटलं की मला अड्रेस पण करावं. मी त्या दिशेनं चाललो. मी आता एक इंटरेस्टिंग घटना सांगतो. 26 जानेवारीला गुजरातमध्ये भूकंप झाला. हा भूकंप भयंकर होता. तेव्हा मी पार्टीचं काम करायचो. ऑक्टोवर सेवनला मला अचानक मुख्यमंत्री व्हावं लागलं. सीएमचा ताफा घेवून मी थेट भूकंपग्रस्त भागात गेलो. दोन तीन रात्र मी तिथेच राहिलो आणि काही गोष्टी पाहिल्या. आधी मी वॉलिटेंरच्या रुपात पाहायचो आता सीएम म्हणून मी पाहत होतो. पुन्हा मी येऊन मी माझ्या अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली. सर्वांनी सांगितलं की मार्च महिन्यापर्यत हे होईल. मी त्यांना सांगितलं की सर्वात आधी तुम्ही तुमचं बजेटचं मार्चवालं कॅलेंडर बाजूला ठेवा. मी म्हणालो, की तुम्ही मला सांगा की, 26 जानेवारीच्या आधी तुम्ही काय करणार? जग 26 जानेवारीला येऊन पाहिल की एका वर्षात तुम्ही काय केलं? सर्व प्रिपॉन करा आणि मला सांगा.. पुन्हा मी सर्व मशीनरींना मोबिलाईज केलं आणि मी इथं दिल्लीत येऊन 24 जानेवारीला दिल्लीत येऊन प्रेस घेतली होती. आणि माझ्या देशाला रिपोर्ट कॉर्ड दिलं होतं. तेव्हा माझा अनुमान होता की मोठ्या प्रमाणात मीडिया गुजरातमध्ये पोहोचला होता. जो मीडिया आम्हाला पर्दाफाश करण्याची वाटच पाहत होता. पण तुम्ही मजा पाहा.. 24,25,26 जानेवारीचे रिपोर्ट पाहा. त्यात कौतुकाशिवाय काही नव्हतं. त्याचं एक कारण होतं की, मी मार्चच्या डेडएन्डला प्रीपोन केलं. माझ्या टीमचा उत्साह वाढला की यार देखिए आपलं यश रिक्नाईझ होत आहे. मी ही ताकद समजतो. त्यामुळे दुसरं मी हे नाही चिंतत की सरकार चालतं. आणि यार काही चांगली गोष्ट येईल. आणि पाहून घेऊ. सरकार मला चालवायचं आहे. सरकार चालतं म्हणून मला लोकांनी इथं बसवलं नाही. मला देशात काही गोष्टी चालवायच्या आहेत. आणि काही गोष्टी बदलायच्या आहेत. त्यामुळे माझ्याजवळ .. मी काय केलं की 2014 ला 100 दिवसांचा विचार केला. पाच वर्षांसाठी मॅनिफेस्टो होता. 2019 मध्ये मी हे पाहिलं की.. सोबत सोबत मी ग्लोबल दृष्टीकोनाविषयी माझं लक्ष केंद्रीत केलं. 2024 मध्ये माझा विचार थोडा मोठा आहे. मी मागील पाच वर्षांपासून 2047 वर काम करतोय. हे मागील 5 वर्षापासून सुरु आहे. देशाच्या 20 लाखांपेक्षा जास्त लोकांकडून मी इनपूट घेतले आहेत. मी याच्या आधारे 47 चे एक व्हिजन डॉक्युमेंट बनवलं. दोन अधिकाऱ्यांची याच्यावर काम करत करत रिटायर्ड झाली असेल. पण काही नवीन लोक आले आहेत. पण आता म्हणालो की, निवडणूक घोषित होण्याच्या आधी एक महिना माझ्या पूर्ण मोठ्या काऊंसिल आणि सचिवांची समिट केली होती. मी म्हणालो हे 2047 आहे ना.. तुम्ही मला 5 वर्षात प्रायोरिटी सांगा..पाच वर्षाचा मी मॅप बनवला. पुन्हा मी सांगितलं की मला यातील 100 दिवसांचा मॅप काढून द्या... एक्सल पॉईंट.. पुन्हा मी सांगतो की, माझी प्रायोरिटी वन ही असेल.. प्रायोरिटी बी ही असेल.. प्रायोरिटी 1 सी ही असेल आणि प्रायोरिटी 2 ए ही असेल आणि प्रायोरिटी 2 बी ही असेल. याच्याआधारावर तुम्ही काही करा. तर यावर ते काम करत आहेत. त्यांनी तयार केलं आहे. माझी त्यांच्यासोबत अजून बैठक झाली नाही. मी काही वेळ काढून नक्की बैठक करेल. तर हे माझं तयार आहे. पण आता माझ्या मनात काम करत असताना नवीन विचार आला आहे. जो की पहिल्यांदाच मी तुमच्यासमोर सांगत आहे. जेव्हा मी 100 दिवसांचा विचार करत होतो पण आता मी 125 दिवसांचा विचार करत आहे. आणि मी उत्साहित पण झालो आहे. मी या सर्व कॅम्पेनमध्ये पाहिलं की फर्स्ट टाईम वोटर असेल, युवा पिढी असेल. यांच्यात मी वेडेपणा पाहतोय. मी त्यांच्या एस्पिरेंशन्स फील करतोय. मी आजकाल अनाउंस करणार आहे. की, मी आता 125 दिवसांवर काम करु इच्छित आहे. 100 दिवसांचा प्लान मी केला आहे. मी 25 दिवस आणखी जोडू पाहत आहे. मी त्यात प्युअरली युथ ना चिंतत आहे की, तुम्ही मला आयडियाज द्या. तुम्ही मला तुमची प्रायोरिटी सांगा. तर मी 25 दिवस देशातील युवकांसाठी टोटली डेडिकेट करु इच्छित आहे. मी आता 125 दिवसांचं काम करणार आहे. मी आता 25 दिवसांसाठी पुढे जात आहे. 

प्रश्न – सर आमचा कार्यक्रम पाहिल्यावर होऊ शकतं की, युथ आपल्या आपण...
मोदी – मी पहिल्यांदा तुमच्यासमोर सांगितलं आहे म्हणल्यावर सांगू इच्छितो युथना
प्रश्न – जी, तुम्ही सांगू शकता युथला..

मोदी – लोकांना खूपच चांगलं वाटेल.

ADVERTISEMENT

प्रश्न – सर, ही किती मोठी गोष्ट आहे की, निवडणूक अजून संपली नाही तरी आपण सर्व तुमच्या पुढच्या टर्मवर बोलतोय. तुम्ही 100 दिवसांत, 125 दिवसांत.. यापेक्षा असं वाटत आहे की, ही निवडणूक स्टेटस को ची आहे. लोकांना विश्वास वाटत आहे की, तुम्ही परत सत्तेत याल. पण जेव्हा बीजेपीचे टिकीट वाटप होत होतं..तेव्हा लोक म्हणत होते की, ही उमेदवारी नसून निवडणूक आयोगाचे विजयी सर्टिफिकेट आहे. सर्व जागेवर बीजेपीचं मोठं एसेट आहे की, तुमचा चेहरा.. आणि तुमचं काम.. पण तुम्हाला कधी असं वाटलं का? या तिसऱ्या टर्मला.. कॅन्डिडेटंसनं पण असा विचार केला आहे की, भाई...तुमच्या नावावरच जिंकून यायचं आहे. तुम्ही इतकं चांगलं काम करुन ठेवलंय. आणि त्यांना जास्त मेहनत करायची गरज नाही. तुम्ही या विचारानं असं पाहत आहात का लॅक ऑफ पार्टिसिपेशन आणि गरजेपेक्षा कॅन्डिडेटसमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये श्युरिटी आहे..

मोदी – एक तर.. ही निवडणूक जिंकणार आहोत आणि आमचं सरकार बनणार आहे. या अनुमानापर्यंत पोहोचण्यापर्यंत तुम्ही खूप लेट आहात. मला राष्ट्रपती पुतीन यांचा सप्टेंबरच्या मीटिंगसाठी निमंत्रणाचा फोन आला होता. मला जी 7 च्या निमंत्रणासाठी पण फोन आला होता. तर जगाला पूर्ण विश्वास आहे की, आमचं सरकार सत्तेत येत आहे. तुम्ही खूप लेट आहात. पण तरी देर आए दुरुस्त आए.. जो पर्यंत निवडणुकीचा प्रश्न आहे तो पर्यंत मी पार्टीला मोठ्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं की, कॅन्डिडेटची वाट पाहू नका. तुमचा कॅन्डिडेट घोषित झाला आहे. आणि तो आहे कमळ... कमळ ही तुमचा कॅन्डिडेट असून दुसरा कोणताही कॅन्डिडेट नाही. एक वर्षापासून मी कमळासाठी काम करण्याचं ठरवलं होतं. त्याप्रकारे मी माझ्या पार्टीला गल्वनाईज केलं होतं. आपण सर्वजण कमळासाठी काम करत आहोत. मी पण कमळासाठी काम करतोय. माझे सहकारी पण कमळासाठीच काम करत आहेत. आणि आमचे अपोनेंट पण कमळासाठीच काम करत आहेत. कारण ते जितका चिखल करतील तितकंच कमळ जास्त उगवेल. ते काम विरोधक करत आहेत. आणि कमळची गोष्ट पोहोचवत आहोत. 

ADVERTISEMENT

प्रश्न – सर, तुम्हाला असं वाटतं का? की तुमची ही सर्वात जास्त कंफर्टेबल निवडणूक आहे?

मोदी – असं आहे की, आपण कधीच कंफर्ट झोनमध्ये नाही गेलं पाहिजे. जर हे कंफर्टेबल असेल तर मी स्वत:च आव्हान तयार करेल. तुम्ही पाहा ना.. तो स्ट्रेट हायवे असतो ना.. तिथं एक्सीडेंट जास्त होतात आणि जिथं कर्व असतात तिथं एक्सीडेंट कमी होतात. मी माझ्या टीमला जागृत ठेवू इच्छितो. आणि कार्यशील ठेवू इच्छितो. मला कंफर्ट झोनवालं जग आवडत नाही. 

प्रश्न – सर, लोक पण हे म्हणतात की, सर्व सोपं आहे तर तुम्ही एवढी मेहनत का घेतात?

मोदी – मी याला मेहनत मेहनत.. मी याला संधी समजत आहे. माझ्यासाठी ही अपॉर्चुनिटी आहे. लोकांची आशीर्वाद घ्यायचे आणि त्यांच्या भावनांना समजून घेणं हीच तर माझी प्राण शक्ती आहे. हीच माझी उर्जा आहे. आणि दुसरं लोकशाहीमध्ये निवडणुकीला हार आणि जिंकण्यापूरतं सिमीत नाही घेता कामा नये. एक ही मोठी ओपन युनिवर्सिटी असते. तुमच्यापर्यंत कारण असतं की लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि तुम्ही जेव्हा लोकांपर्यंत डायरेक्ट विचार घेऊन जाता तेव्हा डायलुजन येत नाही ना डायवर्जन येत नाही. म्हणजे परफेक्टली मैसेजिंग तुम्ही करु शकता. जसं की मी काशीला गेलो तेव्हा माझा काशीचा स्वभाव वेगळा होता. मी जेव्हा कोडरमाला गेलो तेव्हा तेथील चित्र पाहिल्यावर मी माझ्य़ा भाषणाचा विषय बदलला. आधी जायचो तेव्हा मी रस्त्यात काही वेगळा विचार करायचो. कारण मला वाटलं की हे जे लोक आहेत ना.. त्यांच्याशी मला काही बोलायचं आहे. मी मानतो की सर्व राजकीय पक्षांचं कर्तव्य आहे की, ते निवडणुकीचा भरपूर वापर करावा. त्यांनी मतदारांना एज्युकेट करावं. त्यांच्या आईडियोलॉजीनं एज्युकेट करावं. त्यांनी आपल्या वर्किंग स्टाईलनं एज्युकेट करावं. आपल्या प्रोग्रामनं एज्युकेट करावं. हे जे काही काम आहे ते सर्वांनी करावं. मी तर म्हणतो की आता पण करा.. अजून पण 15-20 दिवस शिल्लक आहेत. आपल्या मतदारांना एज्युकेट करावं.. पण ते करत नाहीत. 


प्रश्न – मोदीजी, याच प्रश्नावरुन पुढे जात मी विचारु इच्छिते की, ती कोणती गोष्ट आहे की, तुम्ही जबाबदारी स्विकारता. मी गुजरातच्या दोन विधानसभा निवडणुका कव्हर केल्या आहेत. ही तिसरी लोकसभा निवडणूक आहे आपली की जी, मी कव्हर करत आहे. मी पाहिलं की, तुम्ही सर्व जागेवर उभं राहता आणि जबाबदारी स्विकारता की, मोदींच्या नावावर वोट द्या. कारण यात एक भिती फेलियरची पण असते पण तुम्ही कधी ती जाणवू देत नाही. तुम्ही 400 पारच्या नाऱ्यासह सुरुवात केली म्हणजे त्यावेळी लोक तुमच्यावर तुटून पडले. की 400 पार कसं होणार.. आज पण तोच मुद्दा आहे आणि ती चर्चा आहे. आप अपना टार्गेट रिवाईज करलें.. 

मोदी – आप तो कुटुंब असणारे लोक आहात. तुम्हाला मुलं असतील. जर तुमचा मुलगा 90 मार्क घेत असेल तर तुम्ही नक्की म्हणत असाल की पुढच्या वेळी 95 मार्क घ्यायचे आहेत. नक्की म्हणत असाल. 99 घेतले तर म्हणत असाल की, 100 घ्यायचं अवघड आहे पण तरी पाहा ना.. नक्की म्हणत असाल. आमच्या जवळ ऑलरेडी 19 पासून 24 पर्यंत 400 होते. एनडीए आणि एनडीए प्लसच्या रुपात...तर माझं कर्तव्य बनतं की अभिभावकच्या रुपात की.. 400 पार.. पुढं जायचं आहे. ही माझी जबाबदारी बनते की निरंतर आपल्याला पुढं जायचं आहे. मी हे तर नाही म्हणू शकत की 90 आले आणि माझ्या मित्राला 90 नाही आले तर 60 आले ठिक चालून जाईल. मी असं नाही म्हणू शकत. मी म्हणेल की, 90 आले आहेत तर 95 घे. तुमच्या दुसऱ्या मित्रांकडे काय आहे याआधारे मी थोडंच विचार करतो. दुसरी गोष्ट आहे की जबाबदारी... हे लीडरशीपचं कर्तव्य आहे. आज देशाचं दुर्दैव्य आहे की, दुसऱ्याच्या नशिबाला दोष दिला जात आहे. नेते पळून जातात आणि स्वत:च रक्षण करतात. ही तर देशासाठी सर्वात दुख:द आणि निराशादायक गोष्ट आहे. कमीत कमी आपण स्वत: एक माणूस आहोत जो की जबाबदारी स्विकारण्यास तयार आहे. जो की पळून जात नाही. जो म्हणतो की, हो हे म्हणतो आणि ते माझे कर्तव्य आहे. आणि देशात राजकीय जीवनात आणि राजकीय पक्षात जबाबदारी स्विकारणारे लोक असले पाहिजेत. अशी लोक नसली पाहिजेत की दुसऱ्यांवर खापर फोडून पळून गेले पाहिजेत. हे त्यांना शोभत नाही. 

प्रश्न - प्रधानमंत्रीजी, 2014 ची निवडणूक सुरु होती. तेव्हा मनमोहन सिंग यांच्या सरकारविरोधात आणि काँग्रेस आणि युपीएच्या विरोधात लोक नाराज होते आणि रोष व्यक्त करत होते. त्यांना बदल हवा होता. 2019 ची निवडणूक झाली पण त्याआधी पुलवामा, बालाकोट झालं आणि देशात राष्ट्रीयत्वाचा भाव होता. देशभरातील नागरिक तुम्हाला आणखी एक संधी देऊ इच्छित होते. यावेळेस विश्लेषक असं म्हणतात की, मागील वेळेस जसा 2019 मध्ये लोकांमध्ये जोश आणि उत्साह होता तसा, आणि यावेळेस वोटिंग परसेंटेज थोडं कमी झालं आहे. वोटिंग परसेंटेज च्या डिक्लाईनकडे तुम्ही कसं पाहता? आणि तुम्हाला असं वाटतं का? वोटर्समध्ये त्याप्रकारचा एंथिजुयिजम नाही, जसा 2014 आणि 2019 मध्ये होता. तुम्ही याकडे कसं पाहता?

मोदी – काही लोकांचं पोट यावर डिपेडेंट आहे. त्यांना स्वत:ला रिलेवंट राहायला काय करायला हवं. काही गोष्टी लोकांवर सोडायला हव्या. नाहीतर वातावरण बनेल की, यार हा तर निवडणूक जिंकलेला आहे. निवडणुकीत नाहीतर एडवर्टाइजमेंट पण नाही मिळणार.. आपण बेरोजगार होऊन जाऊ. तर हे पण एक कारण आहे. मला आठवतं की, मी गुजरातमध्ये पक्षाचं काम करत होतो. कदाचित 95 च्या आधीची निवडणूक असेल. त्याच्या आधी नगरपालिकेची निवडणूक आली होती. आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत आमच्या इथं सिंबालवर लढलं जात नव्हतं. जास्त तर लोक इंडिपेंडेंट लढवत होते. पण भाजपनं सुरु केलं की नाही आपण सिंबल वर निवडणूक लढवू. लोकांना सवय लावली की.. कारण लोकांना जबाबदारी समजावी. लढायचं झालं तर भाजप पण लढत होती आणि कार्यकर्त्ये पण लढत होते. पण आम्ही पार्टी सिंबलवर लढलो. कारण स्वाभाविक आहे की, इंडिपेंडेंट जास्त निवडून आले. दिल्लीतून जे पत्रकार येत होते, ते फाईल घेऊन यायचे. आणि असेंबलीची निवडणूक होती. प्रश्नाला सुरुवात करायचे की, हे पण असेंबली निवडणूक हारले निवडणूक कसं जिंकणार? मी म्हणलं तुमच्या जवळ काही काम नाही का? काही तर होमवर्क करा. ही नगरपालिकेची निवडणूक कशी होते याची स्टडी तर करा. तसंच हे मतदानाचं आहे. मतदानचं पॉलिटिकल पार्टीच्या परफॉर्मेंस वगैरे या गोष्टी यासंबंधी जोडण्यापेक्षा हे पाहिलं पाहिजे की, लोकशाहीत मतदान हे खूप महत्त्वाचं आहे. निराशा ही लोकशाहीसाठी चांगली नाही. आमचा नरेटिव्ह तो पाहिजे की, देशाची लोकशाही मजबूत होईल. ते सोडून आपण यातून रिजल्ट शोधत राहतो. त्याच्यात पण तथ्य नाही फक्त तर्क आहे. मग आता तर्काच्या मागे आपला वेळ वाया घालवून काय करणार आपण?  मी जेव्हा जमिनीवर जातो तेव्हा..मी कधी क्लेम नाही केलं पण माझ्याविरुद्ध सतत एक तक्रार असते की, मी हारणं आणि जिंकण्याचा क्लेम करत नाही. यावेळेस पण क्लेम नाही केला. हाऊस मध्ये.. लोक बोलत होते की 400 पार.. पण मी क्लेम नाही केला. पण मला माहीत तर होतंच ना.. पण मी 100 दिवसांत काय करायचं याची तयारी नक्की करतो. पाच वर्षात काय करायचं, 2047 चं.. मी करणार.. कारण मला माहीत आहे. ही जबाबदारी मला स्विकारायची नाही.

प्रश्न – पण, तुमच्या या आत्मविश्वासाला आणखी काही गोष्टींसोबत जोडलं जातं. संस्थांवर प्रश्न विचारलं जातात. आणि विरोधी पक्ष तुमच्यावर गंभीर आरोप करतं की, तो हा की संस्था या सरकारशी प्रभावित असून यामध्ये इलेक्शन कमिशनचं पण नाव घेतलं जातं. ज्यावर की लोकांचा विश्वास आहे, त्यामुळे या आरोपावर मला तुमच्याकडून तुमचं उत्तर हवंय. की ते म्हणतात, पहिल्या टप्प्याचं मतदान झालं तेव्हा मतदानाची आकडेवारी येण्यास 11 दिवस का लागले? ही आकडेवारी का लपवली जात आहे? या आरोपावर तुम्ही काय म्हणाल?

मोदी – खूप चांगला प्रश्न आपण विचारला. मी कमीत कमी आज तककडून अपेक्षा व्यक्त करतो की, वाटलं तर इंडिया टुडे पण.. दोन्हीकडून.. की जी इलेक्शन कमिशननं चिठ्ठी लिहली आहे. त्या चिठ्ठीवर विद्वान असणाऱ्या लोकांची डिबेट व्हावी. राजकीय लोकांची नाही. जे एक्सपर्ट आहेत, हा विषय त्यांना माहीत आहे त्यांचीच डिबेट व्हावी. कारण त्यांनी बरोबर केलं की चूक केलं.. कारण मी काही कमेंट करु हे ठिक नसेल. दुसरं... इलेक्शन कमिशन ही जी इंस्टिटुट आहे ती जवळपास 50 60 वर्ष सिंगल मेंबर राहिली आहे. आणि मजा ही आहे की यातून जे लोक बाहेर पडले. ते लोक गवर्नर बनले, कधी एमपी बनले, कधी आडवाणींजी समोर पार्लमेंटची निवडणूक लढले. म्हणजे त्यांनी कशा प्रकारच्या लोकांना बसवलं होतं. याचं हे उदाहरण आहे. त्या काळी इलेक्शन कमिशनमधून रिडायर्ड झाले आहेत, ते आज पण त्याच पॉलिटिकल फिलोसॉपीला प्रमोट करतात. ट्विट करतात. ओपिनियन देतात. आर्टिकल लिहतात. याचा अर्थ आता कुठे इलेक्शन कमिशन पुढं जाऊन स्वतंत्र्य झालं आहे. मी आज तककडून अपेक्षा व्यक्त करतो की, मला विश्वास आहे की, आता नाही तर कधी ना कधी तुम्ही लोक भारताच्या इलेक्शन कमिशनचा जो प्रवास आहे, त्यावर एनालिसिस करा. माझं दुसरं असं म्हणणं आहे की, जगात भारताच्या ब्रॅन्डिगसाठी वेगवेगळ्या गोष्टी आहे. जसं मी जगाला म्हणतो की, आमच्या इथं 900 टीव्ही चॅनल आहेत. ते टिव्ही चॅनल माझ्यासोबत काय करतात तो माझा मुद्दा नाही. मी जगाला सांगतो की, हा माझा देश आहे आणि 900 टिव्ही चॅनेल.. ते ऐकून आश्चर्य व्यक्त करतात. 900 टिव्ही चॅनल.. मग मी म्हणतो की इतक्या लॅग्वेजेस मध्ये आहेत तर ते व्यथित होतात. माझ्यासाठी 900 टिव्ही चॅनल दिवसरात्र काय करतात हा वेगळा विषय आहे. पण 900 टिव्ही चॅनेल असणं ही माझ्या देशाची ताकद आहे. तर मी जगाच्या समोर... भारताचं इलेक्शन कमिशन, भारताची इलेक्शन प्रोसेस हे जगासाठी खूप मोठं आश्चर्य आहे. हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की, आपल्या देशाचं ब्रन्डिग करावं. मी तर अपेक्षा करतो की, सर्व जगातून वेगवेगळ्या मीडिया हाऊसेसला इथं निवडणुकीत इनवाईट केलं पाहिजे. त्यांच्यासाठी दोन हेलिकॉप्टर घेतले पाहिजेत. यात काही चूक नाही. 

प्रश्न – तुम्ही चांगली आयडिया दिली आहे.

मोदी – यात काही चूक नाही. यात तुमचं पण ग्लोबल महत्त्व वाढेल. जसे की यावेळेस आमच्या इथं जगभरातून खूप साऱ्या पॉलिटिकल पार्टीचे लोक आले होते. काही ऑब्जर्वरच्या रुपात लोक येतात खरं तर भारताच्या लोकशाहीचा उत्सव आणि भारताच्या सामान्य मानवी लोकशाहीची समज आणि किती मोठं मॅनेजमेंट आहे. लाखो लोक यामध्ये सहभागी होतात. वेळेची सीमा असणं हे खरंच अद्भूत कार्य आहे. मी तर म्हणतो की जगासाठी युनिवर्सिटी केस स्टडी आहे. तुमचे अरुण पुरीजी परदेशात शिकायला गेले तर त्यांना सांगा की, भारताची इलेक्शन प्रोसेस त्यांच्या युनिवर्सिटीमध्ये स्टडी करा. ही हिंदुस्थानची खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आपण आपल्याला गर्व असला पाहिजे.

प्रश्न – तुम्ही आज तकचा हेलीकॉप्टर शॉट पाहिला की नाही?

मोदी – मला वेळ नाही मिळाला, पण इतक्या गरबडीत चांगले हेलीकॉप्टर मिळेल की नाही, लॅन्डिगसाठी जागा मिळेल की नाही.. पण काही व्हीआयपी मुवमेंट असेल तर तुम्हाला उडण्यास बंदी असणार.. वातावरणाचा प्रॉब्लेम असणार.. हे सोपं नाही, खूप कठीण आहे.

प्रश्न – नरेटिव्हची गोष्ट आपण करत होतात सर. जसं की, तुम्ही जेव्हा निवडणूक लढवता, मग गुजरात असो की लोकसभा.. प्रत्येकवेळी लोक म्हणतात की, तुम्ही निवडणूक हारत आहात. पण, तुम्ही निवडून येता. जास्त जागा निवडून येतात. जेव्हापासून तुम्ही युनिफॉर्म सिविल कोडच्या बाबत लोकांना सांगितलं आणि वचन दिलं.. त्यावर दुसरा नरेटिव्ह आहे. आता लोक म्हणतात, हे वन नेशन, वन ड्रेस होणार.. वन नेशन, वन फूड होणार.. वन नेशन, वन लॅग्वेज होणार.. त्यात पुढे हे पण आहे की, वन नेशन, वन लीडर होणार.. आपण त्या दिशेनं जात आहोत.

मोदी – तुम्हाला कधी वेळ मिळाला आहे का? असं जे लोक बोलतात, त्यांना तुम्ही काऊंटर प्रश्न विचारावा. कधीतरी करा.. तुम्ही हा नरेटिव्ह कुठून घेऊन आलात? भाई..तुम्ही गंभीर गोष्ट सांगत आहात. त्यांना विचारा काय युसीसी तुम्ही वाचला आहे का? युसीसी काय असतो? काही तरी तुमची पण जबाबदारी बनते की नाही भाई... मला उत्तर देऊन देशाला सांगणं आणि तुम्ही पण थोडा होमवर्क करा. पण देशवासियांकडे उदाहरण तरी आहे. पण गोव्यामध्ये युसीसी आहे. मला सांगा.. गोव्याची लोक एकाच प्रकारचे कपडे घालतात का?, गोव्याची लोक एकाच प्रकारचे जेवण करतात का? काय चेष्टा करुन ठेवली आहे. युनिफॉर्म सिवील कोडचा आणि याचा काहीच संबध नाही. भारताच्या सुप्रीम कोर्टानं कमीत कमी दोन डझन वेळा सांगितलं आहे की, या देशात युसीसी लागू करावा. मला आठवतं की, मी जेव्हा एकता यात्रेत चालत होतो, तेव्हा कन्याकुमारीपासून काश्मिरला जात होतो. महाराष्ट्रात औरंगाबाद जवळ मोस्ट प्रोबेबली... आमच्या रथाचा संध्याकाळचा कार्यक्रम होता. त्यात चिलीचा बाजार काही बाजार होता. मिरची चा.. आणि डॉक्टर जोशी जी यांना त्याची एलर्जी आहे. ते एकदम आजारी पडले. म्हणजे त्यांची प्रकृती अत्यंत बिघडली. आम्हाला हे पण समजेना झालं की आम्ही तिथं कार्यक्रम करायचा की नाही. हा सर्व मोर्चा मला सांभाळावा लागला. मी तर ज्युनिअर होतो. तर आम्ही पुढं जात होतो. तिथं स्कुल होती आणि काही विद्यार्थी उभे होते. मी म्हणलं रथ थांबवा. मी म्हणलं चिमुकल्यांसोबत बोलू.. त्याचा व्हिडीओ कुठेही उपलब्ध असेल. मी चिमुकल्यांना म्हणालो, मला सांगा.. तुमच्या कुटुंबात पाच लोक आहेत. मोठ्या भावासाठी तुमचे आई वडील एक नियम ठरवतात. दुसऱ्या भावाला दुसरा नियम ठरवतात. तिसऱ्याला... आपलं कुटुंब चालेल का? सर्व मुले.. नाही.. नाही.. असं नाही चालणार...मी म्हणलं देश तर असं म्हणतोय. सर्वांनी 10 प्रश्न विचारले. तर सर्व म्हणाले, युनिफॉर्म सिविल कोड लागू झाला पाहिजे. हे आठवी, नववीच्या वर्गातले मुलं होते. जे माझ्या देशातील महाराष्ट्रातील टियर टू टियर थ्री सिटी चे मुलं समजतात. पण देशातील नेते समजत नाहीत. तर माझ्या मनात प्रश्न येतो की, हे खोटे नरेटिव्ह आणि नरेटिव्हला माणसं नाहीत चालवत. माफ करा...या देशातील मीडिया हाऊसची गैरजबाबदार आहेत. अशा खोट्या नरेटिव्हला एका व्यक्तीची काय ताकद आहे की, जो बोलत राहतो. कोण कोण विचारणार?... हे देशासाठी आहे.. संविधानामध्ये लिहलं आहे. आपल्याला त्या दिशेमध्ये जायला पाहिजे. त्यावेळी आपल्या लोकांना हे वाटलं होतं का? सगळ्यांना आपल्याला गुलाब लावावं लागेल. त्यामुळे युसीसी येणार होतं का? संविधान सभेमध्ये हे आलं होतं..

प्रश्न - नरेटिव्ह.. आता पाहा.. की संविधान आता बदलणार आहेत. आणि अचानक त्यांनी म्हटलं आणि यावर चर्चा होत आहे.

मोदी – पिक केला असं मानत नाही. या देशात असं पण खोटं चालू शकतं. या देशात सर्वात आधी पंडित नेहरुंनी संविधानासोबत खिळवाड केली. त्यांनी जी संविधानात अमेंडमेंट आणली आणि फ्रीडम ऑफ स्पीचला रेस्ट्रिक्ट करणारी होती. म्हणजे लोकशाहीच्या विरोधात ती होती. आणि संविधानाच्या विरोधात देखील होती. दुसरी.. त्यांची मुलगी प्रधानमंत्री असताना कोर्टानं जजमेंट दिलं.. की पार्लमेंट मेंबर नाही राहू शकत तर त्यांनी जजमेंटला बदलून टाकलं. देशात आंदोलन चाललं. त्यांनी देशात आणीबाणी लावून सर्व वर्तमानपत्रांना बंद केले. आणीबाणीचा एक फायदा झाला की, अरुण पुरी यांना.. इंडिया टुडेचा जन्म झाला. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न होता. त्याच्यानंतर त्यांचा मुलगा आला. त्यांनी साहबानोचं जजमेंटच्या विरोधात संविधानाला बदललं. त्यानंतर त्यांनी मीडियावर बंधनं येणारं कलम आणलं. देशभरात विरोधी पक्ष आणि मीडिया वाईब्रंट होत होता. सर्व जण तुटून पडले. सर्व म्हणत आम्ही पुन्हा देशात आणीबाणी येऊ देणार नाही. पुन्हा त्यांना भिऊन ते कलम रद्द करावं लागलं. पुन्हा त्यांच्या मुलासोबत आले. रिमोट कंट्रोलनं सरकार चालत होतं. सरकार मला आवडतं की नाही आवडत हे मला मान्य नाही. पण ते संविधानाच्या नियमापासून बनलेलं असतं. संविधाच्या नियमापासून कॅबिनेट बनली होती. त्या कॅबिनेटनं एक निर्णय घेतला आणि एका व्यक्तीनं त्याची प्रेस घेत निर्णयाच्या चिंधड्या उडवल्या. आणि त्या कॅबिनेटला तो निर्णय़ मागे घ्यावा लागला. या अर्थ त्या कुटुंबाच्या चार लोकांनी संविधानाच्या चिंधड्या उडवल्या. या प्रकारच्या घाणेरड्या हरकती करण्याचा जमाना गेला. मी डंके की चोट पर मी लोकांना सांगतो की, मोदी जीवंत असे पर्यंत संविधानाची जी मुळ भावना आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण नाही लागू होऊ देणार. एक वेळेस धर्माच्या आधारावर देशाला दुफळी निर्माण केली. मी देशाला एज्युकेट करेल. मी माझं जीवन देशासाठी अर्पण करेल.

प्रश्न - हुकुमशाह म्हटलं जातं.

मोदी – जरा त्या इन्स्टिट्युशन्ची नावं सांगा म्हणजे कळेल. पहिली गोष्ट. पहिली गोष्ट म्हणजे पार्लामेंटच्या आत डिबेट करण्यासाठी आम्ही वारंवार सांगतोय की या. पण यांना वाटतंय की आमच्याजवळ सांगण्यासारखं काही नाही. सांगणारी माणसंही नाहीत. यांचे जेवढे नवे एमपी आलेत ना, ते आम्हाला येऊन सांगतात की साहेब आमचे पाच वर्षं वाया गेलीत. आम्ही एक शब्दही बोलू शकलो नाही हाऊसमध्ये. मी ऑपोझिशनविषयी बोलतोय. मी कधी त्यांच्या नेत्यांना बोललो तुम्हाला करायचं तर असं करा एक तास नवे एमपी आहेत, त्यांना संधी द्या. मग डिस्टर्ब करा. नंतर करा. यांना जीवनभर. मी असं म्हटलोय. माझा प्रयत्न राहीलाय की यांनी काही तरी करावं. पण दुर्भाग्य आहे की काँग्रेसच्या परिवारासाठी लोकशाही म्हणजे सत्तेत असणं. ते आज पण हे स्विकारायला तयार नाही आहेत, दोन हजार चौदानंतर देशाने दुसरी सरकार देशासाठी निवडली आहे. दुसरा पंतप्रधान आहे, ज्याला देशाने निवडलंय. मनापासून स्विकारू शकत नाहीत. आणि मग प्रत्येकठिकाणी त्यांचा. त्यांच्या मेनिफेस्टोचे मुद्दे जर तुम्ही इम्पलिमेंट करत असाल तर तेही त्यांना वाईट वाटतं. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही इम्पलिमेंट करत असाल तर त्यांना तर आनंद व्हायला हवा की हेतर आम्ही सांगत होतो, तुम्ही करतायत. चांगली गोष्ट आहे. आम्हाला संधी नाही मिळाली. प्रणव मुखर्जी सांगायचे, तुम्ही त्यांच्या पुस्तकात वाचलं असेल, माझ्यासोबत त्यांनी जे काम केलं, ते किती डेमोक्रॅटीक पद्धतीने केलं आहे. राष्ट्रपती इन्स्टिट्यूशनची किती प्रतिष्ठा आम्ही वाढवली आहे. सुप्रीम कोर्ट. मला सांगा. वरतून लोक सांगतात की या सरकारची तर सुप्रीम कोर्टात काही चालतच नाही. आमच्यावर तर हा आरोप आहे हो. आणि त्यात, आम्हा लोकांना एबीलिटीसाठी प्रश्न विचारला जातोय. याचा अर्थ काही एबल लोक होते, जे ज्युडिसरीला मॅनेज करत होते. आणि ती इन्स्टिट्यूशन योग्य होती का? मी मानतो की मला का मॅनेज करायला हवं. कायदा हा कायद्याचं काम करेल.

प्रश्न – तपास यंत्रणांवरून आरोप होतो

मोदी – असं आहे की असं सांगून या मुद्द्याला टाळू नका. ही पद्धत आहे. जसं मी सांगत असतो की परिवारवादी पार्टी. तर आमचे मीडियाचे लोक मला प्रश्न काय विचारतात, की राजनाथजींचा मुलगा पण तर आहे. दोघांमध्ये फरक आहे. मुद्द्यांना याप्रकारे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न कमीतकमी मीडियाने तरी करू नये. हा माझा आग्रह असेल. मी जेव्हा परिवारवादी पार्टी म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ होतो की, पार्टी ऑफ द फॅमिलि, बाय द फॅमिली, फॉर द फॅमिली.  कुठल्या परिवाराचे दहा लोक पब्लिक लाईफमध्ये येतात तर वाईट आहे, असं मी ही मानत. चार लोक चढाओढीत पुढे जातात तर वाईट नाही मानत. पण ते पार्टी नाही चालवत. पार्टी निर्णय घेत असते. असंच ईडी जे पावलं उचलत असते, ती पावलं, आपण मला सांगा की आजपासून वीस वर्षांपूर्वी बातम्या काय असायच्या? ब्लॅक मार्केटवर सर्च झाली, रेड पडली. इतक्या गोष्टी सापडल्या. इतकी साखर पकडली गेली. आता त्या बातम्या येतात का? नाही येत. का? काऱण त्याकाळात त्या इन्स्टिट्यबटने जे पण काम केलं, कायद्यात बदल झाले. टॅक्सेशनमध्ये बदल झाले. तर ब्लॅक मार्केटचं जग हिंदुस्थानमधून पब्लिक लाईफसे, थिएटरमध्येही आता ब्लॅक मार्केट ऐकायला मिळत नाही. असं नाही की ते आता संसदेत चालले गेले. थिएटरमध्ये पण ऐकायला मिळत नाही ब्लॅक मार्केटवाला. तसंच हे निघून गेलं. भ्रष्टाचारण पण जाऊ शकतो, का? जर त्याच्याजवळ ज्याची जबाबदारी आहे, तो काम करायला लागला तर. खरं तर विचारायला हवं की दहा वर्षांत ईडीला इतका पगार दिला तर काम काय केलं भाई. चारसे दो हजार चौदा काम क्यू नही किया? त्याची ड्यूटी आहे. मला सांगा रेल्वेचा तिकीट चेकर आहे, तो तिकीट चेक नाही करणार तर त्याला ठेवायची काय गरज आहे. त्याच कामासाठी आहे तो. तुम्ही जर मीडियात आहात, तुम्ही जर मोदीचा झेंडा घेऊन भक्तीपुर्वक फिरत राहीला तर कोण आजतकवाला तुम्हाला ठेवेन. तुम्हाला काढून टाकेल. तुमचं काम आहे, दहा गोष्टी शोधून आणा, जे ठिक वाटेल ते जगासमोर घेऊन जा. तुमचं काम आहे आणि करतात तुम्ही ते लोक. तसंच ईडीचं काम आहे त्याने करावं. आकडे काय सांगतात. दोन हजार चारपासून चौदा, व्यवस्था हीच होती, कायदा तोच होता. मी कायदा नाही बदलला. मी ईडी नाही बनवली. त्यांना बिल्कूल निक्कमापण केलं. काही काम केलं नाही. फक्त चौतीस लाख रुपये, पस्तीस लाख चौस्तीस लाख रुपये जप्त केले. दहा वर्षांत, आम्ही तर विरोधी पक्षात होतो. कोणी थांबवलं होतं. माझ्या सरकारने बावीसशे कोटी रुपये पकडले आहेत. नोटांचे ढिगारे आपल्या टीव्हीवाल्यांना दाखवले आहेत. त्या ईडीला आपण कसं काय बदनाम करू शकतात. एमपीच्या घरातून मिळालेत पैसे. तुम्ही कसं काय नकारू शकतात. मला सांगा जर कुठे ड्रग्ज आहेत आणि ड्रग्जचा मोठा साठा मी पकडतो तर तुम्ही कौतुक करणार की नाही. ईडी जर पकडते तर त्याचं कौतुक, त्याला आरोपी म्हणतात ही काय पद्धत. का तर ते राजकीय नेत्यांकडून पकडलं गेलंय. 

प्रश्न - तुमची भूमिका आहे की, सगळ्यांवर समान कारवाई व्हावी? 

मोदी-  कुणीही. कोणतीही पार्श्वभूमी असो, हेच व्हायला हवे. माझी लढाई भ्रष्टाचाराविरुद्ध आहे. देशातून भ्रष्टाचार संपायला हवा. आणि हा देशाचा विनाश करतोय. खूप विनाश करतोय. 

प्रश्न - मोदीजी, काही असे पक्षही आजकाल दिसतात... उदाहरणार्थ ओडिशा, आंध्र प्रदेश... खूप मनापासून निवडणूक लढतात. विधानसभा असो लोकसभा... बीजेडी, वायएसआर काँग्रेस सगळे भाजपच्या विरोधात लढतात. पण, संसदेत जेव्हा असं कुठलं काम असतं... असं कुठलं विधेयक असतं, तेव्हा तुमच्यासोबत उभे राहतात. हे मित्र आणि शत्रूचं नातं कसं आहे. मतदार संभ्रमात नाही का?

मोदी - मी नेहमी सांगतो की, निवडणूक तीन किंवा चार महिन्यांसाठी असायला हवी. पाच वर्ष राजकारण नको. आम्ही चार साडेचार वर्ष मिळून जिथेही सोबत येता येईल, तिथे सोबत येऊन देश चालवला पाहिजे. सहा महिने निवडणूक आहे, लढा. पूर्ण ताकदीनिशी लढा. तुम्ही बघितलं असे की खेळात फ्रेंडली मॅच होतात. पण, जेव्हा खरा सामना होतो, तेव्हा विजय पराभवाची लढाई असते. पूर्वी तर कसोटी सामने व्हायचे. त्यापूर्वी एक तीन दिवसांची फ्रेंडली मॅच असायची. ते असायचं... खेळाडूंना जाणून घेणं वगैरे. खेळात स्पोर्टसमन स्पिरिट तेव्हा निर्माण झालेलं आहे. राजकारणातही ... माझं मत आहे की, चार साडेचार वर्ष मुद्द्यांच्या आधारावर, देशाहितासाठी आम्ही लोकांनी चालायला हवे. 

प्रश्न -मग तुम्ही तिसऱ्या टर्ममध्ये वन नेशन वन ईलेक्शनची करणार आहात का?

मोदी - असं आहे की वन नेशन वन ईलेक्शन हे माझ्या पक्षाचे पहिल्यापासून मत राहिले आहे. आणि हा काही जीन नाहीये. तुम्ही बघा काय परिस्थिती आहे. मी हैराण आहे की, मी यावेळी बोलू की नको बोलू. टिव्हीसमोर... पण, मला गर्व वाटतो की, जेव्हा एका राज्याची निवडणूक होत आहे. आणि देशाचा पंतप्रधान त्या राज्यात जाऊन... कोणत्याही पक्षाचा असो, तिथल्या मुख्यमंत्र्यां च्या विरोधात भाषण करतोय. देश कसा चालेल? माझी मजबूरी आहे की, मला त्या राज्यात जाऊन, बोलावं लागत आहे. राजकीय अपरिहार्यता आहे. चांगलं असेल की, एकत्र निवडणुका व्हाव्यात. मग जे काही बोलायचं असे, ते सगळे लोक बोलतील. त्यातून जे अमृत निघेल, ते घेऊन पुढे निघू. लॉजिस्टिक खर्च किती येतो... मी जेव्हा गुजरातमध्ये होतो... मनमोहन सिंगांचं सरकार... त्यांच्यावेळी निवडणूक आयोग सर्वाधिक अधिकारी माझ्याकडून घेऊन जायचे आणि गरजेच्या काळात. ७०-८० माझे अधिकार जायचे. आणि वर्षातील जवळपास शंभर दिवस कोणत्या न कोणत्या निवडणुकीत लागलेले असायचे. मी म्हणायचो की,माझं राज्य इतकं सक्रिय आहे, तिथून ८० लोक चालले जातात, मी काम कसं करू. हे तुम्ही बंद करा. मी ऑब्झर्व्हर देणार नाही. पण, कायदा असा आहे की, मला द्यावे लागायचे. ही प्रत्येक राज्याची अडचण आहे. इतके ऑब्झर्व्हर जातात... आचारसंहिता ४५ दिवस सुट्ट्या मिळत. सगळे मज्जा करतात. इतका मोठा देश ठप्प होईल. कसा थांबेल. इतक्या मोठ्या देशात खूप मोठं संकट आहे. पूर्वीही आपल्या देशात वन नेशन वन ईलेक्शनच होतं. हे ६७ नंतर आले. आता मी आयोग बसवला आहे. आयोगाचा अहवाल आला आहे. अहवालाचा अभ्यास सुरू आहे. अभ्यास केला जाईल. त्यातून कृती करण्याचे मुद्दे येतील. आमची कमिटमेंट आहे. पॉलिटिकल कमिटमेंट नाहीये. देशासाठी हे खूप गरजेचं आहे. 

प्रश्न - रोजगार विरुद्ध लाभार्थी अशीही एक चर्चा देशात सुरू आहे. काँग्रेस पक्षाने न्याय पत्र जाहीर केले आहे. ३० लाख नोकऱ्या देणार, एक लाख शिकलेल्या तरुणांना देणार, तुमचा फोकस लाभार्थ्यांवर असतो. आता ते म्हणत आहेत की, आम्ही आक्रमकपणे बेरोजगारीच्या मुद्द्याला डील करत आहोत. हा काँग्रेसचा दावा आहे. यावर तुमचं मत काय आहे?

मोदी - जर ते इतके प्रामाणिक आहेत, तर जिथे त्यांचे सरकार आहे, तिथे त्यांच्या तोंडाला कुलुप का लागतं. तिथे का बोलत नाही. दुसरं रोजगार सरकारची जबाबदारी आहे, तर जसे केंद्र सरकारची आहे, तशीच राज्य सरकारचीही आहे. तशीच स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे... सगळ्यांची आहे. मग माझ्या वाट्याला तर खूप कमी जबाबदारी येईल. तरीही तुम्ही जर आश्वासने पूर्ण करण्याबद्दल बोलत आहात, तर आता अलिकडेच रोजगाराचे जे रेकॉर्ड आले आहेत. कालच एक रिपोर्ट आला आहे. दहा वर्षात जे मायक्रो फायनान्स झाले आहे, त्या मायक्रो फायनान्सद्वारे जो रोजगार मिळाला आहे, त्याला तुम्ही रोजगार मानणार नाही का? केंद्राच्या दहा-बारा योजना अशा आहेत, ज्या आधारावर त्यांनी विश्लेषण केले आहे. एक घर तयार होते, तर किती लोकांना किती तास रोजगार मिळत असेल. पूर्वी मॅन अवर्स म्हणायचे, आता जेंडर न्युट्रल जग झाले आहे, तर पर्सन अवर्स बोलतात. वर्षाला पाच कोटी व्यक्तींना मिळाला आहे. म्हणजे नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. आता आकडा खूप मोठा आहे. आता मला सांगा की, पूर्वी शंभर किलोमीटर रस्ता बनत होता आणि आज जर २०० किलोमीटर बनत असेल, तर मॅनपावर लागली असे की नाही. पूर्वी ईलेक्ट्रिकफिकेशन इतकं व्हायचं, आता इतकं होतं. पूर्वी इतकी विमानतळे होती, आता इतकी आहेत. चार कोटी गरिबांची घरे बनली आहेत. ११ कोटी शौचालये बनली आहेत. फाईव्ह जी जगात सगळ्यात जास्त वेगात सुरू झालं. त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर लागते. फाईव्ह जी असेच बनत नाही. त्यासाठी टॉवर लागतात. त्यासाठी छोट्या छोट्या वस्तू बनवणारे लागतात. याचा अर्थ की या सगळ्या गोष्टींना जोडणार... पीएनए प्लसचा आकडा तर वस्तुस्थितीवर आहे. सहा-सात वर्षात सहा कोटी नवे रोजगार हे मिळाले आहेत. आता ईपीएफ... दहा वर्षात कव्हर होणाऱ्या लोकांमध्ये १६७ टक्के वाढ झाली आहे. आता हे स्वीकारणार की नाही? मुद्रा लोन जवळपास ४३ कोटी लोन वेगवेगळे... काही लोक परत असतील. त्यात ७० टक्के ते आहेत ज्यांना पहिल्यांदा रोजगार करत आहेत. आता एक व्यक्ती एकाला तरी रोजगार देत असेल? काही व्यवसाय करून... हे हवेत थोडं होतं. आपल्या देशात भरती प्रक्रिया खूप कठी आहे. जाहिरात निघणार, विभाग मागणार, फायनान्स... म्हणजे त्याची प्रक्रिया... कुणाला माहिती झालं की, भरती निघणार आहे, त्याच्या आधी एक वर्ष लागते. मी याला इतकं छोटं केले आहे की, आज अडीच-तीन महिन्यात फायनल होतं की, भरती करायची आहे. अडीच तीन महिन्यात प्रक्रिया पूर्ण करा. इतकी सुधारणा मी केली. पण, रोजगार हा असा विषय आहे ज्याला हात पाय नाहीच. बोलले... काहीही बोलू शकता. काही लोक असतात... उदाहरणार्थ तुम्हाला इथे काम आहे. पण, मनात असतं की मी मुख्य संपादक असायला पाहिजे. त्याच्या हिशोबाने तो बेरोजगार आहे. कारण ते मुख्य संपादक नाहीये. हाही एक मुद्दा असतो. 

प्रश्न - अलिकडेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अर्थशास्त्रज्ञांचा अहवाल आला.थॉमस पिकेटी यांची त्यात त्यांनी म्हटलं आहे की, भारतात उत्पन्न असमानता वाढत चालली आहे. म्हणजे जे श्रीमंत आहेत, ते आणखी श्रीमंत होत चालले आहेत. जे गरीब आहेत, ते आणखी गरीब होत चालले आहेत. यावेळी भारताची अर्थव्यवस्था के आकारात आहे. वरचे लोक श्रीमंत होत आहेत आणि खाली लोक गरीब होत आहेत. तुम्ही या मुद्द्याकडे कसे बघता?

मोदी - मग काय सर्वच गरीब व्हायला पाहिजे का? एक हा उपाय आहे की, कोणतेही फरक असायला नको. सगळे समान. या देशात पूर्वी असे होते. आता तुम्ही म्हणता की, नाही श्रीमंत असायला हवेत. हळूहळू होतील. जे खाली आहेत, त्यातील काही त्यापेक्षा वर येतील. ते खालच्या इतरांना वर घेऊन येतील. एक प्रक्रिया असते. त्यामुळे आपण एकतर हे ठरवायला हवे की, आपण सगळ्यांनी ठरवावं की गरीब राहायचे आहे. आम्हाला काही गरज नाहीये. प्रत्येकाला दहा रुपये मिळाले. तसंच जगायचं जगा. एकतर हा मार्ग आहे. दुसरा मार्ग आहे की, आपण प्रयत्न करायला हवेत की पुढे जावं. दहा आता पुढे जातील. उद्या शंभर पुढे जातील. परवा पाचशे पुढे जातील. होत आहे. पूर्वी मोजकेच स्टार्टअप देशात होते. आता सव्वा लाख स्टार्टअप आहे. प्रगती होत आहे. पूर्वी विमानात बसणाऱ्यांची संख्या कमी होती. आज एक हजार विमानांची ऑर्डर बूक करावी लागतेय. आज भारतात सरकार आणि खासगी असे सहाशे किंवा सातशे विमाने आहेत. नवीन एक हजार विमाने. म्हणजे प्रॉस्पिरिटी वाढली आहे. आज मला सांगा की, बद्रीनाथ, केदारनाथ यात्रेला लोक जातात. ते पैसे कुठून आणतात. पैसे कमावतात तेव्हाच तर खर्च करतात. ही संख्या आता कोट्यवधींमध्ये गेली आहे. लोक लग्न करण्यासाठी परदेशात जात आहेत. जर पाचच व्यक्ती श्रीमंत असत्या, तर इतके लोक परदेशात लग्न कसे करतात? मी तर म्हणलं आहे की भारतातच लग्न करा. श्रीमंती येतेय, तर लोकांना वाटतं तिथे जावं. त्याने चेन्नई बघितली नाही आणि बोलतोय की, सिंगापूर पाहायचं आहे. त्यामुळे हे आपण योग्य पद्धतीने बघितले पाहिजे.

प्रश्न -भीतीमुळे अनेक लोक भारतातच लग्न करताहेत, मोदीजींकडे रिपोर्ट गेला तर...

मोदी - भीतीमुळे करत आहेत, हे माध्यमांचं म्हणणं स्वाभाविक आहे. पण, वस्तुस्थिती आहे. मला काही लोक पत्र लिहून सांगत आहेत की, साहेब मी बुक केलं होतं. माझा खर्च झाला आहे. पण, कधी विचार केला नव्हता की याचा हाही अर्थ आहे. म्हणाले की मी ठरवलंय भारतात लग्न करायचं. 

प्रश्न -डेस्टिनेशन वेडिंग आता कश्मिरमध्ये होतेय.

मोदी - मी सांगतोय. बद्रीनाथ, केदारनाथमध्ये त्यांचं उत्पन्न वाढलं. पूर्वी धार्मिक पर्यटन होतं. इन्फ्रास्ट्रक्चरही होतं. आता त्यांनी सुविधा वाढवल्या. आता ऑफ सीझनमध्ये लग्नाचं काम मिळत आहे. 

प्रश्न - राहुल, श्रीमंत आणि गरिबीचा मुद्दा मांडला. 

मोदी - कोण राहुल ?

प्रश्न - आमचे राहुल...

मोदी - तर ते (राहुल गांधी) तुमचे नाहीत?

प्रश्न - तुमची जी प्रतिमा आहे, ती गरिबांचा मसिहा अशी आहे. तुम्हाला बघून महिला रडायला लागतात हे आम्ही बघितलं आहे. २५ कोटी लोकांना तुम्ही दारिद्रय रेषेच्यावर आणलं. पण, जे आरोप दुसरे राहुल गांधी करताहेत तुमच्यावर तो हा की, तुमची मोठं मोठ्या उद्योगपतीशी मैत्री आहे. पाच वर्षांपासून तुमच्या प्रतिमेला हे जोडण्याचा प्रयत्न होत आहे. अदाणी-अंबांनींशी मैत्री, यावर तुम्ही काय म्हणता?

मोदी - या कुटु्ंबाचा प्रॉब्लेम हा आहे की, हा ओझ्याखाली दबलेले कुटुंब आहे. नेहरूजींना शिव्या पडायच्या की बिर्ला टाटांचं सरकार. संसदेतील बघाल तर... टाटा बिर्लाचं सरकार. नेहरूजी, सतत ऐकत आले. आता या कुटुंबाचा प्रॉब्लेम हा आहे की, ज्या शिव्या माझ्या पणजोबाल पडल्या, त्या मोदींना पडल्या पाहिजेत. त्यांनी राफेल का आणलं. मुद्दा राफेल नव्हता. त्यांना वाटत होतं की, राफेलमुळे बोफोर्सचं पाप धुतलं जाईल. त्यामुळे त्यांनी आणलं. सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम आहे. त्यांनी या निवडणुकीइतकी मेहनत पूर्वी कधीही केली नाही. का करत आहेत? त्यांना वाटतं की मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, तर माझ्या वडिलांची प्रतिष्ठा राहणार नाही. माझ्या आजीची प्रतिष्ठा राहणार नाही. हे तर नेहरूंच्या बरोबरीचे होऊन जातील. हे प्रत्येक गोष्टीची त्याच्याशी तुलना करत आहेत. त्यामुळे त्यांनी या शिव्या कुठून तरी घेतलेल्या आहेत. दुसरा मुद्दा... मी लालकिल्ल्यावरून बोलतो. लाजत नाही. मी लालकिल्ल्यावरून बोलतो की, या देशात वेल्थ क्रिएटर्सचा सन्मान झाला पाहिजे. माझ्या देशात जे सक्षम लोक आहेत. जे सामर्थ्यवान लोक आहेत, त्यांची प्रतिष्ठा वाढली पाहिजे. मी १५ ऑगस्टची पाहुण्यांची यादी असते, त्यात खेळाडूंना बसवतो. देश अॅचिव्हर्सची पूजा करणार नाही. त्याचं महत्त्व करणार नाही, तर माझ्या देशात पीएचडी करणारे लोक कसे तयार होतील. वैज्ञानिक कसे तयार होतील. प्रत्येक क्षेत्रातील अॅचिव्हर्सचा सन्मान झाला पाहिजे. जर उद्या आज तक ग्लोबल चॅनेल झालं, तर सगळ्यात आधी मी टाळ्या वाजवेन. मला माहितीये की आज तक माझ्यासोबत काय अन्याय करतंय. पण, मी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवेन. कारण माझ्या देशातील आज तक ग्लोबल झाले आहे. मला तर दुःख वाटतं की, सीएनएन, बीबीसी... स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली आणि एक ग्लोबल चॅनेल नाही. अल जजिरा, रातोरात आले आणि ग्लोबल चॅनेल बनले. आता कुणी म्हणेल की, तुम्ही मोठ्या धनपतीची मदत करत आहात. मी धनपतीची मदत करत नाहीये. माझ्या देशाचा गर्व आहे. माझ्या देशाची मल्टिनॅशनल कंपनी आहे, का असायला नको? जगात माझ्या कंपनीची दुकाने का असायला नको. जगभरातील लोक रोजगार... संकोच का करायचा आहे? बेईमानी केली असेल, तर फाशी द्या. चुकीच्या पद्धतीने दिले असेल, तर फाशी द्या. पण, मी माझ्या देशात वेल्थ क्रिएटर्सचा सन्मान करणार. माझ्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी ज्या भावनेने कामगाराच्या घामाची काळजी करतो, त्याच पद्धतीने मी उद्योगपतींच्या पैशाचं महत्त्व समजतो. माझ्या उद्योगपतींचा पैसा, व्यवस्थापन करणाऱ्यांची बुद्धी आणि कष्ट करणाऱ्याचा घाम, या तिन्ही गोष्टींना मी एक कुटुंब म्हणून बघतो. तेव्हा जाऊन विकास होतो. 

प्रश्न - पैशांच्या मुद्द्याबद्दल तुम्ही बोललात, तर मला तुमच्या एका सभेतील गोष्ट आठवली. ईडी जो पैसा जप्त करते, तो जातो कुठे? हे माहिती पडल्यावर वाईट वाटलं की, ते प्रकरण जोपर्यंत चालू असेल, तोपर्यंत तो जप्त राहील. तुम्ही म्हणालेला होतात की, हे जे पैसे भ्रष्टाचाऱ्यांकडून जप्त केले जातील, ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवले जाईल. परत केले जातील. हे कसं शक्य आहे? 

मोदी - तुम्ही खूप मार्मिक मुद्दा उपस्थित केला आहे. मला वाटतं की या माध्यमातून आज तकच्या प्रेक्षकांना या माध्यमातून मदत मिळेल. दोन प्रकारचे भ्रष्टाचार आहेत. एक ते जे मोठंमोठे उद्योग करतात. ज्यात घेणाराही सांगत नाही आणि देणाराही सांगत नाही. हीच अडचण आहे. पण, निर्दोष लोक जास्त आहेत. जसं की बंगालमध्ये शिक्षकांच्या भरतीमध्ये पैसे गेले. त्यांच्याकडे सत्याशिवाय काही नाही. त्याने बिचाऱ्याने कर्ज घेतलेले आहे. जमीन गहाण ठेवली आहे. किंवा घर गहाण ठेवलं आहे. त्यातून अमूक एक रक्कम दिली. ती साखळी आहे. तर आता आम्ही खूप पैसे जप्त केले आहेत. एकूण सव्वा लाख कोटींची संपत्ती जप्त केली आहे. खूप मोठी रक्कम आहे. तर मी या पैशाचे... जसं की केरळमध्ये होतं. कम्युनिस्ट पार्टी एक असं रॅकेट चालवते. हे ईमानदारीचा ठेका घेऊन फिरत आहेत. को ऑपरेटिव्ह नेटवर्क. सहकारामध्ये गरिबाचा पैसे आहेत आणि जास्त करून नोकरदाराचे पैसे आहेत. आणि माणूस फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे ठेवतो की, मुलगी मोठी झाल्यावर तिच्या लग्नासाठी काम येतील. मुलगा मोठा वा खोली मोठी... असे विचार असतात. यांनी काय केलं, हा पैसा आपल्या खासगी बिझनेस पार्टनरशिपच्या नावाखाली वाटला. हजारो कोटींचा घोटाळा त्यांनी केला आहे सहकारी बँकांमध्ये. केरळ फाईल तुम्ही घाबरता पण यावर काम करू शकता. यात साखळी आहे. पैसे याने ठेवला आणि डुबला. मग आम्ही प्रॉपर्टी जप्त करतो. आता माझी इच्छा आहे की, त्या प्रॉपर्टीमधून रोख असेल किंवा संपत्ती यांचा लिलाव करून ते पैसे कसे परत करू? आतापर्यंत मी १७ कोटी रुपये परत केले आहेत. ज्याचं रॅकेट मिळालं. आता लालूजींनी, रेल्वे मंत्री होते. गरीब लोकांना जॉब देण्याच्या बदल्यात जमिनी घेतल्या. तर कनेक्शन मिळत आहे. पण, तो बिचारा भीतीमुळे जबाब नोंदवायला तयार नाही. पुरावे मिळत आहे की, याची जमीन गेली. या तारखेला गेली. या तारखेला नोकरी मिळाली. आता आम्ही जप्त केली आहे. त्याचा लिलाव करून त्या गरिबांना जमिनी परत करण्याचा विचार मी करत आहे. मी यावर खूप विचार करतोय. कारण मला आतून जाणवतंय की, हा गरिबांचा पैसा आहे. या लोकांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून लुटला आहे. त्यांना तो मिळायला हवा. 

प्रश्न -कायदेशीर बदल करावे लागतील.

मोदी - कायदेशीर बदल करायचे असतील, तर ते मी करेन. मी माझ्या लीगल टीमची मदत घेतोय. कायदा प्रक्रियेतील लोकांनाही मी म्हणालो की, मार्ग सांगा. हे पैसे पडून राहण्याला काय अर्थ आहे? आम्ही जी नवीन न्याय संहिता आणली आहे. त्यात काही सुविधा आम्ही आणल्या आहेत. तो कायदा तर असा बनला की, जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा माझ्याकडे भावनगरला काळा गूळ खूप मोठ्या प्रमाणात पकडला गेला. काळ्या गुळाचा वापर अवैध दारू बनवण्यासाठी वापरला जातो. तो पोलीस ठाण्यात ठेवला. पाऊस आला आणि भिजला. मग मच्छर, माशा इतक्या झाल्या की, त्या रस्त्याने जाणं अवघड होऊन बसलं. पण, कायदा हे सांगतो की तुम्ही ते नष्ट करू शकत नाही. तेव्हापासून माझ्या मनात होतं की, कायदा बदलायला हवा. त्यामुळे जी नवीन न्याय संहिता आणली आहे, त्यात हे सगळे उपाय आहेत. 

प्रश्न -लाभार्थ्यांसाठी तुमच्या खूप योजना सुरू आहेत. फायदा मिळतो, तेव्हा कुणीही हिंदू आहे की मुस्लीम बघत नाही. देशात धर्मनिरपेक्ष सरकार आहे. असं आहे, तर मग निवडणूक प्रचारात मंगळसूत्र, घुसखोर, जास्त मूल हे शब्द आणण्याची गरज काय आहे? विरोधक यांच मुद्द्यावरून तुम्हाला घेरतोय. निवडणूक प्रचारात तुम्ही हिंदू-मुस्लीम करता?

मोदी - तुम्ही हा खूप चांगला प्रश्न विचारला आहे. मी व्यवस्थित सांगू इच्छितो, प्रेक्षकांना. होतं काय, ते धार्मिक अजेंड्यावर चालले. मी ते उघडं पाडलं. मी त्याची पोलखोल केली. मी आरोप केले. तर जी मूळ गोष्ट आहे, ती त्यांची इकोसिस्टम हटवते आणि तुम्ही लोक पण या ईको सिस्टीमच्या दबावात असता की, तुम्हीही त्याला हात घालत नाही. मग तुम्ही माझाच मुद्दा चालवता. तेव्हा तुम्हाला वाटतं की, मी मुस्लीम, मुस्लीम करतोय. हा मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे की, त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात लिहिलं आहे की, आता ते कंत्राट पद्धतीमध्येही अल्पसंख्यांकांना आणणार. कंत्राट अल्पसंख्यांकांना दिलं जाईल. मी जर त्या पद्धतीचा विरोध करतोय,तर मी समाजवाद करतोय. पण, मला त्यामध्ये अल्पसंख्याक शब्द वापरावा लागतो. मुस्लीम शब्द वापरावा लागतो. तर तुम्ही त्याचा अर्थ काढता की, मी त्यांच्या हल्ला करतोय. मी त्यांच्यावर हल्ला करत नाहीये. मी त्यांच्यावर हल्ला करतोय, जे राजकीय पक्ष आहेत. जे भारताच्या धर्मनिरपेक्षतेच्या चिंधड्या उडवत आहेत. जे लांगूनचालन करत आहेत. देशाच्या संविधानाबद्दलची भावना नष्ट करत आहे आणि माझ्याकडे पुरावे आहेत की, मी हे करत नाही. मी शंभर टक्के सेक्युलर आहे. आता समजा की, गावात ७०० लोक राहतात. अमूक एका योजनेचे १०० लाभार्थी आहेत. माझं म्हणणं आहे की, त्या शंभर जणांना मिळायला हवं. मग या जातीचा किंवा त्या जातीचा नाही. हा, होऊ शकत की कुणाला सोमवारी मिळेल, कुणाला बुधवारी मिळेल, कुणाला जानेवारीमध्ये मिळेल, कुणाला जुलैमध्ये मिळेल. पण, जितक्यांचा हक्क आहे, त्या सगळ्यांना मिळायला हवा. राबवताना पक्षपात व्हायला नको. धर्मनिरपेक्षता हवी. आता पूर्ण चर्चा बघा. आम्ही कुठेही हिंदू मुस्लीम केलेलं नाही. त्यांचा जाहीरनामा समजावून सांगण्यासाठी आम्ही लोकांना म्हणतोय की, हे असं असं आहे. त्यात आम्ही संकोच करत नाहीये. मुस्लीम म्हटलं तर माहिती नाही काय आपल्या शिक्का बसेल. हे बोलायला नको. मी मुस्लिमांना समजावतोय की, तुम्हाला हे मूर्ख बनवत आहेत. ७५ वर्षांपासून मूर्ख बनवत आहेत. तुम्ही का मूर्ख बनत आहात. मी बुद्धिमान मुस्लिमांना सांगतोय की, हे समजून घ्या. तुम्हाला काय मिळालंय? धर्माच्या आधारावर त्यांनी देश तर घेतला, तो देश मदरशांमधून चालेल का? त्यांना प्रशासन नको का, त्यांना डॉक्टर नकोय का, त्यांना इंजिनिअर नकोय का? डॉक्टर आहात तर तुम्हाला स्टेथसस्कोप घ्यावा लागेल, तुम्ही इंजिनिअर आहात तर कागद पेन घ्यावा लागेल. मी मुस्लिमांना हेच सांगतोय. 

प्रश्न - जे ऐकताहेत, ते भाजपला मतदान करत आहेत का?

मोदी - मतांसाठी करण्याची ही जी सवय आहे ना देशात. ती नष्ट व्हायला हवी. सगळं काही मतांसाठी करणार आहात का? देशासाठी काहीही करणार नाही. सत्ता मिळवण्यासाठी करणार. मी याचा प्रचंड मोठा विरोधक आहे. मी जे काही करेन, ते देशासाठी करेन. मत हे बायप्रोडक्ट असतं. मतांसाठी आपण देशाला डूबवू शकत नाही. मला अशी नकोय, जी माझ्या देशाला उद्ध्वस्त करेन. अशी सत्ता मला नकोय. 

प्रश्न - तर तुम्ही कधीही हिंदू-मुस्लीम करणार नाही?

मोदी - मी कधीही हिंदू-मुस्लीम केलं नाही आणि करतही नाही. पण, तीन तलाक चुकीचं आहे, हे जर मी म्हणत असेल, तर मी मुस्लीम विरोधी आहे, असं लेबल तुम्ही मला लावणार असाल, तर ती तुमची मजबुरी आहे, माझी नाही. 

प्रश्न - असं लेबल लावण्याचा प्रयत्न काश्मीरच्या बाबतीतही केला गेला होता, जेव्हा ३७० कलम हटवलं गेलं होतं. तुम्ही जम्मू काश्मीरच्या लोकांना काही बोलू इच्छिता का?

मोदी - तुम्ही विषय काढला म्हणून या संपूर्ण निवडणुकीत माझ्यासाठी समाधानाची गोष्ट कोणती आहे, तर माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे श्रीनगरमधील मतदान. कारण त्याने यावर शिक्कामोर्तब केले की, माझी धोरण योग्य आहे. मी कोणताही पक्षपात करत नाही. माझे सरकार धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाही. प्रश्न राज्याच्या दर्जाचा, तर आम्ही त्यांना संसदेत वचन दिलेलं आहे. आम्ही त्यासाठी बांधील आहोत. हा, आम्ही यशस्वी होऊ इच्छितो. यशस्वी म्हणजे सत्ता नाही. परिस्थितीत. आधी आम्हाला काय शिव्या पडायच्या की इंटरनेट बंद केलं. इंटरनेट बंद केलं, ही कोणती लोकशाही आहे. शिव्या खाल्ल्या. पण, काश्मीरचे भलं मी केलं आहे. मी दूरचं बघू शकत होतो, तुम्ही २४ तासांच्या चॅनेलसाठी बघत होते. मी देशासाठी बघत होतो. त्यामुळे शिव्या ऐकूनही मी चुकीच्या रस्त्यावर जाण्यापासून तरुणांना वाचवू शकलो. दुसरी गोष्ट दहा वर्षाचं बघा... २००४ ते २०१४, किती मातांनी आपली मुलं गमावली असेल, २०१४ ते २०१४ किती मातांची मुलं वाचली आहेत? जीवनात यापेक्षा मोठे समाधान काय असेल. त्यामुळे राज्यही आमचे वचन आहे. सफल होण्यासाठी जो मार्ग असेल, ते आम्ही करू. माझी इच्छा आहे की, गव्हाची शेती करावी, पण योग्य मोसमात केली तर मला गहू मिळेल. योग्य हंगामात नाही केलं, तर माझे बीजही वाया जाईल. 

प्रश्न - मोदीजी, माझे वडील लष्करात होते. आम्ही काश्मिरात जात राहिलो आहोत. यावेळी रिपोर्टिंगसाठी गेलो तेव्हा, अनंतनाग, बारापुल्ला सारख्या ठिकाणी लोक प्रचार करत होते, जिथे लोक वरती बघायचे की कुठून गोळी चालवली जाणार नाही. यापुढे आता तुम्ही काश्मीरसाठी विचार करता?

मोदी - आधी माध्यमांनी स्वीकारावं. मी तुमच्यासमोर बसलोय, तर मी तुम्हाला म्हणत नाहीये. मी सगळ्यांना म्हणतोय. काही दिवसांपूर्वी माझा एक कार्यक्रम होता जम्मू काश्मीरमध्ये. ४० वर्षानंतर इतकी मोठी रॅली झाली असेल. टीका काय होत होती, सरकारी लोक आणून बसवले आहेत. तुम्हाला देशाचं भलं करायच आहे की, नाही. उद्या जवळपास ४० टक्के मतदान बघतील, तेव्हा त्यांच्या तोंडाला कुलूप लागेल. माझी इच्छा आहे की, निवडणूक सोहळा व्हायला हवा. निवडणूक गेले आणि मतदान करू आले, असं नाही. फेस्टिव्हल हवा. श्रीनगरमध्ये फेस्टिव्हलचा माहोल होता. लोक टाळ्या वाजवत होते. लोक चहा पाजत होते. लोक गाणे गात होते. ते खरंच सेलिब्रेट करत होते. माझ्यासाठी आनंदाचा दिवस होता.

प्रश्न - पंजाबमध्ये कमी प्रभाव आहे?

मोदी –Exactly तुमच्याजवळ काय माहिती आहे मला माहीत नाही.तुम्ही निवडणुकीच्या हिशोबाने पाहात असाल तर माझ्याजवळ कुठलंही उत्तर नाही. मी त्याच्याही पलिकडे गेलोय.चांगल होईल, जर तुमचं पंजाबी चॅनल असेल तर त्यांनी विश्लेषण करावं.या देशातील शीख समाजाचे मुलभूत मुद्दे काय राहीलेले आहेत आणि कुठल्या सरकारने त्या मुद्द्यांना सोडवण्याचा प्रयत्न केलायाची यादी काढा बाहेर. मग तुम्ही मला शंभरपैकी शंभर गुणे द्याल. कदाचित मी त्यांच्यापर्यंत पोहचू शकलो नसेल. नाहीतर मी पंजाबमध्ये काम केलेलं आहे तिथे अनेक वर्षं राहीलेलो आहे. आणि आणिबाणीच्यावेळी मी सरदारच्या वेशात अंडरग्राऊंड राहत होतो.आणि अगदी सामान्यरुपात मी येथे दिल्लीत राहत होतो तर कधीकधी लंगर खायला जात होतो. असं नाही की तिकडे मोफत मिळतय. माझी श्रद्धा होती. मी आजपण मानतो की शीख समाजाने या देशासाठी खूप मोठे योगदान केलं आहे. फार मोठे योगदान दिले आहे. आजपण ते जिथे आहे, हे दुर्भाग्य आहे की पंजाबमध्ये ड्रग्ज मोठ्याप्रमाणावर आहे अन्यथा हा शिस्तबद्ध समाज आहे. आम्ही गर्व करावा असा समाज आहे. ते मला स्विकारतात किंवा नाही यावर मी काय बोलू.

प्रश्न - महिलांचे प्रश्न

मोदी – एकतर जी-ट्वेंटीचं माझं स्वप्न तुम्ही बघितलं असेल. पश्चिम देश, जे पुढारलेले मानले जातात, त्यांच्यासमोरही एक फार मोठं, तुलनात्मकरित्या विचार करण्यासारखं, मी सागतो की गर्भवती महिलांसाठी माझ्या इथे २६ आठवड्यांची सुट्टी आहे तर ते माझ्याकडे असे पाहतात. म्हणतात काय २६? मी म्हणतो हो. त्यांना ते पचत नाही. आमच्याकडे पर्सेप्शन बनवलं गेलंय की भारतात महिला म्हणजे गृहीणी आहेत. हे सत्य नाही. तुम्ही भारताचे कृषी क्षेत्र बघा. मी आजही सांगतो की भारताच्या कृषी क्षेत्रात ६० टक्के योगदान महिलांचे आहे.आर्थिक जबाबदाऱ्या सांभाळतात. पण आमच्या देशाची तशी प्रतिमा तयार नाही झाली. योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचली नाही. आजही जगात व्यवसायीक विमानांचे जे पायलट आहेत त्यात १५ टक्के महिला पायलट या भारताच्या आहेत. आता त्या काही एका रात्रीतून पायलट झाल्या नसतील. त्यामुळे असं म्हणणं की भारतातील महिलांसोबत असं होतंय, हे जे काही फेमिनिस्ट टाईप विचार तयार झालेत, त्याचे आम्ही शिकार झालोय. पण मी मानतो की आम्ही दोन पावलं पुढं जायला हवं. कसं? एकतर आम्हाला मानसिक बंधनं तोडण्याची गरज आहे. माझ्यासोबत ईजिप्तचे राष्ट्राध्यक्ष बसलेले होते, २६ जानेवारीला. त्यादिवशी ते सोबत होते. ते म्हटले, ते पश्चिमवाले वुमन ऐंपॉवरमेंटचे बोलतात. मी तर इथे वुमन ऐंपॉवरमेंट बघतोय. समोर परेड सुरू होती. ईजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांनी हे म्हटलंय, हेच तर आहे वुमन ऐंपॉवरमेंट. ते तर मुस्लीम देशातील आहे. वुमन ऐंपॉवरमेंट मला दाखवत होते. दुसरी गोष्टी. जी ट्वेंटीमध्ये मी विषय आणला होता, वुमन लेड डेव्हलपमेंट. एक फार मोठं सायकॉलॉजिकल परिवर्तन आहे हे. आमच्याकडे महिला काम करत असेल तर ते काय करतात, तुम्ही बघितलं असेल एकदा, मार्क केलं की नाही तुम्ही माहित नाही. माझ्या पक्षाच्या सर्व पब्लिक रॅलींचं संचलन महिला करतायत. तुम्ही मार्क केलं नसेल. हा धोरणाचा भाग आहे. अचनाक झालेलं नाही. नाहीतर त्यांचं काम काय असायचं? एक डिश घेऊन यायची, त्यात पुष्पगुच्छ असणार. एक पुरूष येणार. तो पुष्पगुच्छ उचलणार आणि देणार. हे मला आवडत नाही. आज माझ्या सभांचं संचलन महिला कार्यकर्ता करत आहेत. हा माझा निर्णय आहे. माझ्या पक्षाचा निर्णय आहे. मी वुमन लिड डेव्हलपमेंटच्या दिशेने जातोय. दुसरे. मी गावच्या महिलांना पहिलं काय दिलं? सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे काय? पाप़ बनवा, वडी बनवा, विका. साबुण बनवा. अगरबत्ती बनवा. आय वॉन्ट टू ब्रेक. मी त्यांना ड्रोन पायलट बनवलं. माझं महिलांशी बोलणं झालंय. त्या म्हणाल्या आम्ही सायकलही नाही चालवली पण आज पुर्ण गाव मला ड्रोन पायलट म्हणून ओळखतं.ड्रोन पायलट. मी गुजरातला होतो, त्यावेळेस मी ठरवलं. भाई सरकार आहे म्ङणजे काय? पोलिसवाला आला म्हणजे सरकार आले हे इम्प्रेशन आहे. आय वॉन्ट टू चेंज धिस सायकालॉजी. मग मी आंगणवाडी आणि आशा वर्कर ज्या होत्या त्यांना सांगितलं, युनिफॉर्म सरकार देणार. यासाठी नाही की मला वोट पाहीजे होते. आणि माझी सुचनाही, मी फॅशन डिझायनरला बोलवलं. मी म्हटलं, एअर होस्टेसपेक्षा चांगले कपडे मला हवेत. या अंगणवाडी वर्करसाठी एअर होस्टेसपेक्षा चांगले कपडे आणि मी केलं. मग मी काय केलं, ज्यावेळेसही मुख्यमंत्री किंवा मिनिस्टर जाईल, तेव्हा जी क्यू असते त्यात आंगणवाडी आणि आशावर्कर राहील्या पाहीजेत. सर्वांना गर्व होता. गावात असं चित्र झालं की आशावर्कर उभ्या आहेत म्ङणजे सरकार उभं आहे. पुरा, म्ङणजे माझं कमिटमेंट आहे जी. जे आपल्याला दिसतं. आता माझ्याकडे डेअरीचं बघा. मी डेअरीमध्ये निर्णय घेतला, मी गुजरातला होतो. मिल्कचा जो पैसा आहे, तो पुरुषांकडे नाही जाणार. वुमन अकाऊंट असेल, तिच्या अकाऊंटमध्ये जाईल. आणि डेली दोन-दोन हजार कोटी रुपये. डेली. महिलांच्या खात्यात जात होता. आता काशीमध्ये मी डेअरी सुरू केली. म्हटलं डेअरी त्यावेळेस सुरू होईल, ज्यावेळेस महिलांच्या खात्यात पैसे जातील. पशूपालन त्या करतील. दुधाची चिंता करतील, दुध टाकायला त्या येतील आणि पैसे कुणीतरी दुसरे घेऊन जातील हे नाही चालणार. मी भूकंपात जे घर बनवले, सरकारने जी घरं बनवली मी म्हटलं महिलांच्या नावावर असतील. पुरुषांच्या नाही. आणि इथं मी जे आलो, चार कोटी घरं बनवली, म्हटलं पहिला अधिकार महिलांचा असेल. मग मी एक नियम केला, स्कुलमध्ये मुलगा दाखल होतो तेव्हा वडिलांचं नाव घेतात, मी म्हटलं नाही, आईचंही नाव असेल. हे बदल केले आहेत. आज आईचं नावही असतं स्कुलमध्ये मुलासोबत फक्त वडिलांचं नाव नसतं. तर आपल्याला, एकतर आपली थॉट प्रोसेस काम करत असते. मग छोट्याछोट्या गोष्टी आपल्याला सुचतात. ही शक्ती खालच्यास्तरावरून आणावी लागते. तिथून ज्यावेळेस शक्ती येते त्यानंतर जाऊन परिणाम दिसतात. मी एक काम केलं. मोठं इंट्रेस्टिंग आहे. ऐकून घ्या. मीडियामध्ये दाखवू नाही शकणार इतकं. मी गुजरातमध्ये नवानवा मुख्यमंत्री होतो. पंचायत निवडणुका झाल्या. पंधराशे पंचायतींच्या निवडणुका झाल्या. माझं काही लक्षंही नव्हते. कारण मी भूकंपाच्या कामात व्यस्त होतो, मुख्यमंत्री झाल्यानंतर. मग मला एक दिवस मेसेज आला की खेडा गावातील पंचायत मेंबर मला भेटू इच्छितात. पंचायत मंत्रीना भेटवा, त्यांचं काही काम असेल तर. मम्हणाले नाही, सगळ्या मेंबर महिला आहेत. सर्व मेंबर महिला आहे म्हणजे? म्हणे सगळ्या गावाने ठरवलं की यावेळेस सरपंच महिला आहे तर मेंबर पण महिलांना बनवू.पुरूष मेंबर आहेच नाही. तर त्या महिला भेटू इच्छित होत्या. मग माझा इंट्रेस्ट तयार झाला. मी म्हटलं बोलावा. डाकूरजवळ गाव एक छोटेसं. तर त्या आल्या. ते ११ मेंबरचं पॅनल होतं. अकराच्या अकराच्या भगिनी आल्या. आणि जी सरपंच झाली होती, ती आठवीपर्यंत शिकलेली होती. बाकी कुणी शिकलेलं नव्हतं. मी विचारलं त्यांना काय काम होतं? त्या म्हटल्या आम्ही सगळ्या महिला निवडून आल्या तर भेटायला आलो आणखी काही काम नव्हतं. अच्छा पाच वर्षं मिळाली तुम्हाला तर काय कराल आता? सरपंचाने जे सांगितलं ना, जगातला कुठला इकानॉमिस्ट नाही सांगणार. सरपंचाने सांगितलं, साहेब, गाव छोटं आहे. पण माझी इच्छा आहे की वर्षभरात एक पण गरीब गावात नसावा. त्या सरपंचाला इकानॉमीची समज होती. म्हटली माझ्या गावात कुणी गरीब नसावा, असं काहीतरी करायचं मला. मला त्यातून आयडिया आली. मी म्हटलं निवडणूक आली तर आम्ही समृद्ध गाव करुयात. तसं फिलॉसॉफिकली मी याशी परिचित होतो. विनोबा भावे यांचे एक सहकारी होती डॉक्टर द्वारकादास जोशी. ते माझ्या गावाचे होते. आणि त्यांची पत्नी रतनबेन, मोठे सेवाभावी होते. विनोबाजींसोबत त्यांनी जीवन व्यत्तित केले होते. तर त्यांचं भाषण मी लहानपणी ऐकलं होतं. मला ते आठवत नाही की मी विनोबाजींना ऐकलं होतं की द्वारकादास जोशींना ऐकलं होतं.माझी तेवढी मेमरी नाही. पण लहानपणीची आठवण बघा, लोकसभेच्या निवडणुका असतात ना तर वैरबैर नसतात. वैरबैर शब्द ठिक आहे. वैर - वैर. ते नसतं. असेंब्लीच्या निवडणुका असतात, तेव्हाही नसते. पण गावात ज्यावेळेस निवडणुका असतात ना, तर गाव दोन भागात वाटले जाते. मुलीलाही सासरहून पाठवून देतात कारण की तिने वोट नाही दिलं. गावात सहमतीने निवडणुका झाल्या पाहिजेत. हे मी लहानपणी ऐकलं होतं. ती एक गोष्ट आणि ज्या महिला मिळाल्या होत्या, माझं ब्रेन काम करायला लागलं. मग मी एक स्कीम बनवली. समृद्ध गाव.जे गाव सर्वसहमतीने निवडणुका घेतील त्या गावाला मी पाच लाख रुपये एक्स्ट्रा देईल विकासासाठी. कारण माझं पेंडिंग वेडिंग सगळा खर्च संपून जायचा. मग मला विचार आला की जे गाव सर्व महिला निवडतील, त्याला मी सात लाख देईल. मग मी म्हणालो की, ज्या गावात सगळ्या महिला असतील, त्याठिकाणचे जे सरकारी अधिकारी असतील त्याही महिला असतील. जमलंच तर पोलीस पण महिलाच असतील. आणि मी त्यांना निधीही देईन. आणि पॅसिव्ह लेव्हलला महिलांची पुर्ण वरपासून खालपर्यंत... फोर्टी फाईव्ह व्हिलेजेस सहमतीने माझ्याकडे व्हायला लागले. फोर्टी फाईव्ह व्हिलेजेस! आजही योजना आहे. आम्ही निधीही देतोय. जवळजवळ अशी अनेक गावं आहे ज्या गावात महिला सरपंच आहे, तिथं गावच ठरवतं की सगळ्या सदस्य महिला असतील. आणि मी सागतो, इतक्या चांगल्या परफॉर्म करतात त्या. म्हणजे छोट्याछोट्या गोष्टीना करावं लागतं. मला आठवतंय ज्या दिवशी ओबामा आले तेव्हा राष्ट्रपती भवनमध्ये त्यांच्या सन्मानासाठी सगळ्या महिला उभ्या होत्या.ती परेड असते. त्यांना लिड करणारी पण महिला होती. ओबामा म्हणाले महिला, मी म्हटलं येस्स. मला माहितीये, मी माझ्या देशाला कसं कुठं रिप्रेझेंट करायचं. (इथेही पन्नास टक्के महिला आहेत) नाही सांगायचं तात्पर्य हे आहे की, आम्ही पर्सेटेंजच्या हिशोबाने नाही बघितलं पाहीजे.खरंतर ज्यावेळेस मी विकसीत भारत म्हणत असतो ना, तेव्हा विकसीत भारताचे दोन मूळ आधार मी बघत असतो. एक ईस्टर्न इंडिया जिथे संपत्ती फार आहे पण गरीबी सर्वातजास्त आहे. पूर्वी उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, बंगाल, ओडिसा. इकॉनॉमिकली जर मी याला ताकद, मी पश्चिमच्या बरोबरीनेही घेतलं ना... पश्चिम म्हणजे गुजरात, महाराष्ट्र, गोवा पंजाब, पूर्ण संपत्ती आहे. ती माझी नैसर्गिक आहे आणि दुसरी माझी महिलांची शक्ती आहे. हे दोन एरिया असे आहेत, ज्यात मी भरपूर पोटेंशियल बघतो. आणि ते माझे ट्वेंटी फोर्टी सेव्हन चा सर्वात मोठ्या यशाचा म्हणजे बिल्कूल कन्व्हिक्ट, म्हणजे मी कन्व्हियन्स आहे, जे हेच मला परिणाम देतील. आणि मला परिणाम मिळेल.

प्रश्न - महिला व्होट, फ्री-बीज

मोदी –तसं तर यात महिलांचा विषय नाहीये. मुद्दा हा आहे की, पॉलिटिकल पार्टींनी निवडणुका जिंकण्यासाठी तिजोरी रिकामी केली पाहीजे का? सैद्धांतिक मुद्दा हा आहे. मला संपत्ती उडवण्याचा अधिकार आहे का?मला एन्पॉवरमेंटसाठी योजना बनवण्याचा अधिकार आहे. निवडणुका आहे म्हणून उडवून टाकू ही पद्धत किती योग्य आहे.हा विचार करण्याचा विषय आहे. आणि जगात ज्या ज्या देशांवर ही परिस्थिती ओढावली आहे, त्यांची उदाहरणं आमच्याकडे आहेत. आता बघं काय होतं., तुम्ही एका शहरात मेट्रो बनवतात. आणि त्याच शहरात निवडणुका जिंकण्यासाठी म्हणतात की आम्ही, महिलांना बसमध्ये फ्री घेऊन जाऊ. म्हणजे मेट्रोचे फिफ्टी पर्संट पॅसेंजर तुम्ही घेऊन टाकले. मेट्रो व्हायबल नाही होणार. आता भविष्यात मेट्रो बनणार की नाही बनणार? चिंता ही आहे की यावर कोणी चिंता किंवा चर्चा नाही करत. आम्ही पॉलिटिकल तुतु मैमैमध्ये जातो. मला ते नाही करायचंय. मी आपली काँक्रीट गोष्ट करत असतो. तुम्ही बसमध्ये, या कारणाने काय झालं, ट्राफिकलाही प्रॉब्लेम केला, पर्यावरणालाही प्रॉब्लेम केला. मोफत करून टाकलं आणि इकडे मेट्रो तुम्ही उभी करून ठेवली. आता ती मेट्रो कशी पुढे जाईल. देश का पुढे जाईल. 

प्रश्न - रशिया-युक्रेन युद्ध, भारताची भूमिका?

मोदी – आपण या हिशोबाने गोष्टींकडे कुठे पाहतो, मुळ गोष्ट काय आहे? आतापर्यंत आम्ही काय विचार करायचो, आमचा नरेटिव्ह हा असायचा आम्ही यापासून इतकं दुर आहोत. त्याच्यापासून इतकं दुर आहोत. आम्ही इक्वल डिस्टन्स मेटेंन करतो. डिप्लोमेटीक भाषेत हे चालायचं. मी म्हटलो नथींग टू डू. माझी भाषा आहे की आम्ही किती जवळ आहोत. मग जगात कॉम्पिटिशन सुरू झाली की, जवळ कसं जावं यांच्या. आधी दूर राहण्याची कॉम्पिटिशन होत होती आता बदल झालाय. सगळया लोकांमध्ये जवळ येण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. आता बघा काल माझा इराणमध्ये फार मोठा निर्णय झाला आहे. अग्रीमेंट झालं आहे. ती हिंदुस्थानच्या पेपरची हेडलाईन न्यूज आहे. टीव्ही मिडियाची चोवीस तासांची न्यूज आहे. आणि काल माझा मिनिस्टर चाबाहारमध्ये होते. इराणमध्ये होते. चाबाहार पोर्टचा माझा फायनल अग्रीमेंट झालंय. हे फार मोठं काम आहे. सेंट्रल एशियाशीजोडलं गेलेलं माझं एकानॉमीचं फार मोठं काम झालंय. पण माहिती नाहीये, इथं हेटेबल हेटेबल काय असतं हो?सगळ्या युद्धामध्ये माझं चाबाहारचं अग्रीमेंट होऊन जातं. तर ही माझी पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे कोणा तिसऱ्याच्या म्हणण्याने आम्ही निर्णय नाही करणार. आम्ही निर्णय आमच्यासाठी करू. याला वाईट वाटलं तर. याच्याशी बोललो तर. जी नाही. मी सगळ्यांशी संवाद साधणार. राष्ट्राध्यक्ष पुतीन जर माझं भरपूर कौतुक करत असेल तर याचा अर्थ हा नाही की मी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना भेटून सांगू शकत नाही का की, धीस इज नॉट द टाइम फॉर दी वॉर. ते पण माझा सन्मान करतील. कमीतकमी माझा असा मित्र आहे जो मला स्पष्ट सांगतो की, चूक की बरोबर. युक्रेनलाही माझ्यावर तितकाच विश्वास आहे. भारतावर. माझ्यावर म्हणजे मोदीवर नाही. भारतावर विश्वास आहे. काहीतरी हे योग्य करतील. मी आता गाझामध्ये रमजानचा महिना होता, तेव्हा मी माझ्या स्पेशल एन्वॉयला इस्रायलला पाठवलं होतं. इस्राईलचे प्रधानमंत्री, राष्ट्पती यांच्याशी भेटायचं होतं. म्हणटलं समजावा त्यांना किमान रमजानमध्ये गाझामध्ये बम्बार्डिंग, हल्ले करू नयेत. आणि त्यांना याचं पालन करण्याचे प्रयत्नही केले. शेवटीशेवटी दोन तीन दिवसात युद्ध झालं. पण मी स्पेशल एन्वॉय पाठवला.इथं तर तुम्ही मला मुस्लिमांमा घेऊन घेरत होतात पण मोदी गाझामध्ये रमजानच्या महिन्यात बम्ब. आता मी याची पब्लिसिटी नाही करत. अनेकांना प्रयत्न केले असतील. परिणाम योग्य मिळाले. मी पण प्रयत्न केले. देशाने, भारतानेही केले. इव्हन माझा आजही पॅलेस्टाईनसोबततेवढेच चांगले संबध आहे जेवढे की. मी इस्राईलला गेलो. आमच्याकडे फॅशन काय होती, इस्राईल जा. पॅलेस्टाईनला जा. सेक्युलिरिझम करून परत या. म्हटलं नथींग टू डू. इस्राईल जाणार परत येणार. मला ढोंग करायची गरज नाही. इस्राईलला गेलो मी. मी पॅलेस्टाईन जाईल तर स्टँड अलोन व्हीजिट असेल. पॅलेस्टाईन गेलो. गंमत बघा. जेव्हा मी पॅलेस्टाईनला गेलो, तर मला इथून सांगितलं हेलिकॉप्टर घेऊन जाई. हे नेऊ. जॉर्डनच्या राष्ट्रपतींना कळालं की, मी जॉर्डनवरून जाणार आहे पॅलेस्टाईन. आता ते मोहम्मद साहेबांचे थेट वंशज आहे. प्राईमिनिस्टर आहे, ते थेट वंशज आहेत मोहम्मद साहेबांचे. त्यांचेच आहेत. ते म्हणाले, मोदीजी आपण असं नाही जाऊ शकत. आपण माझे गेस्ट आहात. माझ्याच हेलिकॉप्टरमध्ये आपण जाणार.माझ्या घरी जेवण करून जाल. मी त्यांच्याघरी गेलो. जेवण केलं. बसलो आम्ही. त्यांच्या हेलिकॉप्टर. पण हेलिकॉप्टर जॉर्डनचा. डेस्टिनेशन पॅलेस्टाईन. आणि मला एस्कॉर्ट करत होते, इस्राईलचे फ्लाईट्स. बघा आपण जर जगात आणि तिघांचं जग वेगळं पण मोदींसाठी आकाशात सगळे एकत्र आले. मी मानतो, हे सगळं तेव्हा होतं, जेव्हा आपली नियत साफ असेल. तुमच्याप्रती विश्वास असेल. आणि लपूनछपून नाही. आणि अमेरिकनला विचारून मला करायचं नसतं. मला रशियाकडून माझ्या देशासाठी स्वस्तात पेट्रोल पाहीजे तर मी घेईन. माझ्यासाठी गरजेचं आहे. मी लपवत नाही आणि माझ्या टर्मस् वर माझा देश चालवतो. 

प्रश्न – दबावात कधी असतात

मोदी –काय असतं ते. तुम्हा लोकांचा प्रॉब्लेम हा आहे की, तुम्ही त्या जगात वाढला आहात तर तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी उदाहरणं तिथे आहेत. मी त्या विश्वातला माणूसच नाही. तुम्ही मला एक स्वतंत्र केस समजा. व्यवहारीक जिवनातील जेवढ्या गोष्टी तुम्ही पाहातात मी त्यापासून वेगळा आहे. माफ करा, मला हे सांगावं लागतंय. आणि यासाठी माझ्या जिवनात कुठलिच गोष्ट की मोदी इथे बसलाय, मोदी लिडर झालाय. नो नथींग टू डू. भारत पुढे जातोय. मी निमित्त असेन. आणि यासाठी कृपया करून, मी यापासून विरक्त, अलिप्त आहे. काही घेणंदेणं नाही.

प्रश्न - संन्यासासारखा विचार करतात?

मोदी – मी शब्दप्रयोग संन्यासी वैगेरे, मी विरक्त मनुष्य आहे. माझं काही घेणंदेणं नाही. 

प्रश्न – सॉलिड इंटरव्ह्यू..

मोदी – मला आपल्या लोकांशी हीच तक्रार आहे. हा अवघड शब्द तुम्हा लोकांचा नाहीये. एका इकोसिस्टमने तुम्हाला घाबरवून सोडलं आहे. आणि तुम्ही लोकं भित्र्यासारखे घाबरलेले आहात. त्यांच्या अजेंडा साईडसाठी हा प्रश्न घेऊन फिरत आहात. तुम्हाला वाईट वाटेल पण मी सत्य सांगतोय. तुम्ही सर्व दबावात जगत आहात. आणि मी मानतो, मी आता राजघाट येतो तर कमीतकमी मी पत्रकारांना  त्यांच्या तब्येतविषयी तरी विचारतो. मी थेट प्रश्नउत्तरं नाही करत. विचारतो. मला वाटतं त्यांच्या हृदयात दुसरं काही आहे. त्यांचे अनुभव वेगळे आहेत. पण इकोसिस्टमने असे प्रश्न उभे केले आहेत की आपण तोपर्यंत पत्रकार नाही आहात,आपण न्यूट्रल नाही आहातजोपर्यंतहे विचारत नाही. या अडचणीतून मलाही तुम्हा लोकांना काढायचं, ते काम पण मीच करणार. 

प्रश्न – पंतप्रधान पत्रकार परिषद का घेत नाही?

मोदी – पहिली गोष्ट ही आहे की, मागच्या या निवडणुकीत मला बघाल तर मॅक्झीमम मला आजतकमध्ये पाहाल. मॅक्झीमम मे आजतकपर दिखा. म्हणजेच मी कधीही कुणाला अडवलं नाही. दुसरं हे आहे की, जास्तकरून आमच्याकडे मीडियाचा उपयोग हा, हे कल्चर झालंय की काहीही करू नका. यांना सांभाळा. आपलं म्हणणं मांडा. देशभरात चालून जाईल. मला त्या रस्त्यावर नाही जायचंय. मला त्या रस्त्याने नाही जायचंय मला गरीबाच्या घरापर्यंत पोहोचायचंय. मी फण विज्ञान भवनात फित कापून फोटो काढू शकतो. मी ते नाही करत. मी छोट्या योजनेसाठी झारखंडच्या छोट्याशा डिस्ट्रिक्टमध्ये जाऊन काम करतो. मी एका नव्या वर्क कल्चरला आणलं आहे. ते कल्चर जर योग्य वाटलं तर मीडियाने दाखवावं. नाही तर नाही दाखवावं. दुसरी गोष्ट, माझी जबाबदारी ही पार्लामेंटप्रती आहे. मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे. तिसरी गोष्ट सांगतो. मीडिया आज तसा राहीला नाही जसा आधी होता. कारण आधी मी आजतकशी बोलायचो. पण आता दर्शकांना माहितीये मी राहुलशी बोलतोय. कोण राहुल? परवा त्याने हे ट्विट केलं होतं. म्हणजे हा तर मोदींच्या फेव्हरमध्ये लिहतोय. म्हणजे हा तर तीच गोष्ट करेल. तो आज मीडिया एस सच सेपरेट एंटिटी राहीली नाही. आपण अनेक लोकांप्रमाणेच आपले व्ह्यूज लोकांना कळालेले आहेत. ती स्थिती आता राहीली नाही. आधी मीडिया फेसलेस होता. त्याचा चेहरा नव्हता. मीडियात कोण लिहतय, लिहणाऱ्याचे विचार काय आहेत, काही घेणें देणं नाही. लोका समजायचे की हा हे एक अनालिसीस आहे. आज ती स्थिती नाहीये. तिसरी गोष्ट आहे, आधी कम्युनिकेशनचा एकच सोर्स होता, मीडियाशिवाय तुम्ही जाऊच शकत नव्हता. आज शेवटी तुम्हाला जनतेशी संवाद साधायचाय. कम्युनिकेशनचे टू वे आहेत. जनता पण विना मीडियाचा आपला आवाज पोहचवू शकते. व्यक्ती पण ज्याला उत्तर द्यायचय तो विना मीडिया आपली गोष्ट सांगू शकतो. तिसरे. मीजेव्हा गुजरातमध्ये होतो, तेव्हा माझी पब्लिक मीटिंग व्हायची, तेव्हा पब्लिक मीटिंगमध्ये मी विचारायचो, असा पाहायचो. मग मी विचारायचो, क्यू भाई ऐसा कार्यक्रम बनाया है. कुणी काळे झेंडे घेऊन दिसत नाही. अरे भाई, दोन तीन काळे झेंडे घेऊन उभे करा. तरच उद्या पेपरमध्ये छापलं जाईल की मोदी इथे आले होते, दहा लोकांना काळे झेंडे दाखवले. तर किमान माहिती तर पडेल की मोदीजी आले होते. काळ्या झेंड्याशिवाय माझ्या सभेला कोण विचारणार?तेव्हा मी दहा वर्षं अशी भाषणं केली गुजरातमध्ये. डेली माझा कार्यक्रम होता. एकादिवशी गावची लोकं भेटायला आली. अभिनंदन करायला आली. म्हणाले, आमच्या गावात चोवीस तास विज पुरवठा आहे. यासाठी अभिनंदन. माझ्या इथे मंगळवारी कुणालाही एंट्री असायची. माझ्या गुजरातला. मी म्हणालो, चोवीस तास विज मिळतेय?नाही होऊ शकत. म्हणाले नाही साहेब झालीये. मी म्हटलं, तुम्ही खोटं बोलताय. चोवीस तास विज मिळूच शकत नाही. मी तर कुठल्याच पेपरला वाचलं नाही की तुमच्या इथे चोवीस तास मिळतेय. ना रेडियोवर आलं. ना टीव्हीवर आलं. ना पेपरमध्ये आलं. म्हटले, नाही नाही साहेब, रेडिओवाले, पेपरवाले नाही सांगणार. चोवीस तास मिळतेय. झालीये. चला आता मिठाई खाऊ. तो साहब मी असा जगलोय.

अंजना – तुम्हाला आपला वारसा कसा सोडू इच्छिता?

मोदी - बघा हाच प्रश्न मला याआधीही कुणीतरी विचारला होता. युकेमध्ये विचारला होता. मी हैराण आहे. जी व्यक्ती देशासाठी जगतेय तो स्वतासाठी का विचार करेल. मी तर मानतो, माझी इतिहासात कुणीतरी आठवण काढावी यासाठी मी काम करतच नाही. कुणाला आठवणच काढायची तर माझ्या काश्मिरमध्ये चाळीस पर्सेंटच्या जवळपास चाळीस वर्षानंतर मतदान झालं, त्याची आठवण काढा. लोकशाहीचा उत्सव साजरा करा. जी ट्वेंटीमध्ये हिंदुस्थानचा डंका वाजला, त्याची आठवण काढा. कुणी आठवण काढेल की विश्वात माझा भारत तिसरी इकॉनॉमी बनतोय, त्याची आठवण काढा. मोदीचं काय घेणं. माझ्यासारखे तर शेकडो लोक येतील आणि जातील.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT