Mumbai Lok Sabha Election : मुंबईतील मुस्लीम मतदार ठाकरे-गांधींबद्दल काय विचार करतात?

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींबद्दल मुस्लीम मतदार काय विचार करतात?
शिवसेनेचे (UBT) नेते उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात मुस्लीम मतदान निर्णायक

point

मुस्लीम मतदार लोकसभा निवडणुकीबद्दल काय विचार करतात?

North Mumbai Lok Sabha Election : महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक होत असून, अखेरच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी पार पडणार आहे आहे. या लोकसभा मतदारसंघात एम फॅक्टर अर्थात मराठी आणि मुस्लीम निर्णायक आहे. हा मतदार ज्यांच्याकडे वळेल, त्यांचा विजयी सोप्पा होणार आहे. त्यामुळे मराठा मतदाराबरोबरच मुस्लीम मतदार काय विचार करतो, हे जाणून घेणं महत्त्वाचे ठरते. 

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपने महायुतीचे उमेदवार म्हणून पीयूष गोयल यांना उमेदवारी दिलेली आहे. तर काँग्रेसने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून भूषण पाटील यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकर यांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढण्याची मागणी झाली होती. पण, त्यांनी नकार दिला. 

दरम्यान, मुंबईतील मुस्लीम मतदारांमध्ये ठाकरेंबद्दल सहानुभूती असून, त्याचा महाविकास आघाडीला होईल, असा अंदाज आहे. पण, मुस्लीम मतदार उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी, गांधी कुटुंबाबद्दल काय विचार करतात, हे पहा खालील दिलेल्या व्हिडीओमध्ये...

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT