रामायणातील रावण काळाच्या पडद्याआड! अरविंद त्रिवेदी यांचं मुंबईत निधन
भारतात टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय ठरलेल्या रामायण मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते आणि माजी खासदार अरविंद त्रिवेदी यांचं ह्रदयविकाराने निधन झालं. मंगळवारी (5 ऑक्टोबर) मध्यरात्री मुंबईत त्यांची प्राणज्योत मालवली. ते 83 वर्षांचे होते. अरविंद त्रिवेदी यांचा जन्म मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये झाला होता. गुजराती रंगमंचावरून त्यांनी आपल्या अभिनयाची सुरूवात केली. रामायण मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अरविंद त्रिवेदी […]
ADVERTISEMENT

भारतात टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय ठरलेल्या रामायण मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते आणि माजी खासदार अरविंद त्रिवेदी यांचं ह्रदयविकाराने निधन झालं. मंगळवारी (5 ऑक्टोबर) मध्यरात्री मुंबईत त्यांची प्राणज्योत मालवली. ते 83 वर्षांचे होते.
अरविंद त्रिवेदी यांचा जन्म मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये झाला होता. गुजराती रंगमंचावरून त्यांनी आपल्या अभिनयाची सुरूवात केली. रामायण मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अरविंद त्रिवेदी यांनी 300 हून अधिक हिंदी आणि गुजराती सिनेमांमध्ये भूमिका साकारलेल्या आहेत.
गुजरातीतील धार्मिक आणि सामाजिक सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतः ओळख निर्माण केली. गुजरातीमध्ये त्यांनी जवळपास 4 दशक काम केलं. अरविंद त्रिवेदी यांना त्यांच्या अभिनयासाठी गुजरात सरकारने सात वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मानित केलेलं आहे.
2002 मध्ये त्यांना सेन्सॉर बोर्डाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं होतं. त्यांनी 20 जुलै 2002 ते 16 ऑक्टोबर 2003 या कालावधीत सेन्सॉर बोर्डावर काम केलं. 1991 मध्ये अरविंद त्रिवेदी यांनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं. त्यानंतर साबरकथा मतदारसंघातून ते खासदार झाले होते. 1996 पर्यंत ते या मतदारसंघाचे खासदार होते.