Waqf Board Act : वक्फ कायदा काय आहे? मोदी सरकारला कायद्यात काय बदलायचे आहे? 

मुंबई तक

Waqf Act : 2013 मध्ये यूपीए सरकारच्या काळात वक्फ बोर्डाचे अधिकार वाढवण्यात आले होते. सामान्य मुस्लीम, गरीब मुस्लीम महिला, घटस्फोटित मुस्लीम महिलांची मुले, शिया आणि बोहरा यांसारखे समुदाय या कायद्यात बदल करण्याची मागणी बऱ्याच काळापासून करत आहेत.

ADVERTISEMENT

वक्फ कायद्यात सुधारणा केल्या जाणार आहेत, त्या कोणत्या?
वक्फ बोर्ड कायद्यामध्ये कोणते बदल केले जाणार आहेत?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वक्फ बोर्ड कायदा काय आहे?

point

वक्फ बोर्डाला किती अधिकार असतात?

point

वक्फ बोर्डाच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देता येते का?

Waqf Act Amendment : केंद्रातील मोदी सरकार वक्फ कायद्यात मोठी सुधारणा करणार आहे. अधिवेशनात संसदेत दुरुस्ती विधेयक आणण्याचा विचार सुरू आहे. याआधी शुक्रवारी (३ ऑगस्ट) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वक्फ कायद्यातील ४० सुधारणांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. संसदेत दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर वक्फ बोर्डाचे अनियंत्रित अधिकार कमी होतील. पडताळणीशिवाय कोणत्याही मालमत्तेचा ताबा बोर्ड जाहीर करू शकणार नाही. सुधारणा विधेयकामुळे वादंग निर्माण झाले असून, वक्फ कायदा काय आहे, याबद्दलच समजून घ्या.

2013 मध्ये यूपीए सरकारच्या काळात वक्फ बोर्डाचे अधिकार वाढवण्यात आले होते. सामान्य मुस्लीम, गरीब मुस्लीम महिला, घटस्फोटित मुस्लीम महिलांची मुले, शिया आणि बोहरा यांसारखे समुदाय या कायद्यात बदल करण्याची मागणी बऱ्याच काळापासून करत होते. 

आज वक्फमध्ये सामान्य मुस्लिमांना स्थान नाही. फक्त शक्तिशाली लोक आहे. महसुलाचा प्रश्न आहे. महसूल किती येतो याचा अंदाज कोणीच लागू देत नाही. जेव्हा महसूल रेकॉर्डवर येईल, तेव्हा तो फक्त मुस्लिमांसाठी वापरला जाईल. देशात सध्या 30 वक्फ बोर्ड आहेत. सर्व वक्फ मालमत्तांमधून दरवर्षी 200 कोटी रुपयांचा महसूल मिळतो, असा अंदाज आहे.

1) मोदी सरकारचा उद्देश काय?

मंत्रिमंडळाने वक्फ कायद्यात सुमारे 40 सुधारणांना मंजुरी दिली आहे. मोदी सरकारला कोणतीही मालमत्ता ‘वक्फ मालमत्ता’ म्हणून घोषित करण्याच्या वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर अंकुश ठेवायचा आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp