Mumbai Tak Chavadi: 'त्याच दिवशी कळेल अजित पवारांना सोबत घेणं ही चूक होती की नाही...', भाजप आमदाराचं मोठं विधान
Atul Bhatkhalkar Mumbai Tak Chavadi: अजित पवार यांनी भाजपने सोबत घेणं ही राजकीय चूक होत की नाही हे निकालाच्या दिवशी समजेल असं विधान अतुल भातखळकर यांनी मुंबई Tak चावडीवर बोलताना केलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकरांचं मोठं विधान
पाहा अजितदादांना सोबत घेण्याबाबत काय म्हणाले भातखळकर
पाहा मुंबई Tak चावडीवर भातखळकर काय-काय म्हणाले
Ajit Pawar and BJP: मुंबई: भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबई Tak च्या चावडीवर अजित पवार यांच्याबाबत एक मोठं विधान केलं आहे. 'अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपची राजकीय चूक झालीए की नाही हे आपल्याला 23 तारखेला म्हणजे निकालाच्या दिवशीच कळेल.' असं विधान अतुल भातखळकर यांनी केलं आहे. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
पाहा भाजप आमदार अतुल भातखळकर नेमकं काय म्हणाले:
प्रश्न: अजित पवारांना सोबत घेणं ही भाजपची चूक ठरली का? कारण त्यांच्याविरोधातच फडणवीसांनी विधानं केली होती. अशावेळी जनतेने भाजपला कोणत्या पार्श्वभूमीवर मतं द्यावीत?
अतुल भातखळकर: तुम्ही म्हणालात ते मुद्दे बरोबर आहेत. त्यात काही फार मोठी चर्चा किंवा विरोध करण्याचं कारण नाही. हे आम्ही सांगितलंच आहे की, अजित पवारांना सोबत घेणं ती एक आमची राजकीय खेळी होती.
हे ही वाचा>> Nawab Malik : निवडणुकीच्या तोंडावर मलिकांना धक्का, 'या' गोष्टीवर आक्षेप घेत ईडीकडून न्यायालयात याचिका
प्रश्न: ती राजकीय चूकही ठरू शकते का?










