Maharashtra Din: मुंबईकरांच्या हृदयात ‘ठाकरे’च! नागरिकांनी सांगितला त्यांच्या मनातील प्रभावशाली नेता
मुंबई: महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यात अनेक कार्यक्रम, सभा, सांस्कृतिक सोहळे आयोजित करण्यात आले होते. मात्र, याच दरम्यान, IANS आणि सी वोटरने महाराष्ट्राशी संबंधित एक सर्व्हे केला होता. जो आता समोर आला आहे. हे सर्वेक्षण जास्तीत मुंबईशी संबंधित आहे. याच सर्वेक्षणात एक असा सवाल विचारण्यात आला होता की, ज्याची आता सगळीकडे चर्चा सुरु आहे. सर्वेक्षणात सी-वोटरने मुंबईकरांना […]
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यात अनेक कार्यक्रम, सभा, सांस्कृतिक सोहळे आयोजित करण्यात आले होते. मात्र, याच दरम्यान, IANS आणि सी वोटरने महाराष्ट्राशी संबंधित एक सर्व्हे केला होता. जो आता समोर आला आहे. हे सर्वेक्षण जास्तीत मुंबईशी संबंधित आहे. याच सर्वेक्षणात एक असा सवाल विचारण्यात आला होता की, ज्याची आता सगळीकडे चर्चा सुरु आहे.
सर्वेक्षणात सी-वोटरने मुंबईकरांना असा सवाल विचारला होता की, 1960 मध्ये जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हापासून मुंबईतील सर्वात प्रभावशाली राजकारणी कोण आहेत असे तुम्हाला वाटते?
सी-वोटरच्या या सर्वेक्षणात तब्बल 14 प्रश्न विचारण्यात आले होते. याच सर्वेक्षणादरम्यान शहरातील नागरिकांनी आश्चर्यकारक मतं मांडली आहेत. यावेळी राजकीय, सामाजिक आणि स्थानिक समस्यांबद्दल प्रश्न मुंबईकरांना विचारण्यात आले. त्यापैकी एक प्रश्न होता की,1960 मध्ये जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हापासून मुंबईतील सर्वात प्रभावशाली राजकारणी कोण आहेत असे तुम्हाला वाटते?
दरम्यान, या प्रश्नाचं उत्तर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार असेल असं राजधानी दिल्लीतील मीडियाला वाटत होतं. पण मुंबईकरांनी सर्वाधिक प्रभावशाली नेता म्हणून ज्या नेत्याला पसंती दिली ती व्यक्ती म्हणजे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.