मुंबईकरांचा गारेगार प्रवास स्वस्त! एसी लोकलच्या तिकिट दरांमध्ये ५० टक्के कपात
मुंबईकरांच्या एसी लोकलच्या तिकिट दरांचे दर ५० टक्क्यांनी कमी कऱण्यात येणार आहेत. या दरांमध्ये ५० टक्के कपात करण्याचा निर्णय झाल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये दिली आहे. याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभारही मानले आहेत. काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस? मुंबईत एसी लोकलचे दर कमी करण्याची लोकांची मागणी होती. ती मागणी मान्य करण्यात आली आहे. या […]
ADVERTISEMENT

मुंबईकरांच्या एसी लोकलच्या तिकिट दरांचे दर ५० टक्क्यांनी कमी कऱण्यात येणार आहेत. या दरांमध्ये ५० टक्के कपात करण्याचा निर्णय झाल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये दिली आहे. याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभारही मानले आहेत.
काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस?
मुंबईत एसी लोकलचे दर कमी करण्याची लोकांची मागणी होती. ती मागणी मान्य करण्यात आली आहे. या दरांमध्ये ५० टक्के कपात करण्यात आली आहे. आम्ही मुंबईकरांना दिलासा देत आहोत त्यांचा प्रवास सुखकर व्हावा हीच आमची अपेक्षा आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मी भारत सरकारचे विशेषतः माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. त्याच प्रमाणे रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी यासंदर्भातली घोषणा केली आहे त्यामुळे मी त्यांचेही आभार मानतो.