MU Senate Election : अमित ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर हल्ला, खरमरीत पत्रात काय?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

mumbai university senate election news in marathi : mns leader amit thackeray letter to governor of maharashtra.
mumbai university senate election news in marathi : mns leader amit thackeray letter to governor of maharashtra.
social share
google news

Mumbai University Senate Election News : मुंबई विद्यापिठाने 10 जागांसाठी होऊ घातलेली सिनेट निवडणूक स्थगित केली. विद्यापीठाच्या या निर्णयानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात काही सवाल उपस्थित करत अमित ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांना लक्ष्य केले आहे. (Amit Thackeray letter to governor ramesh bais)

अमित ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांना लिहिलेलं पत्र

राज्यपाल रमेश बैस याना लिहिलेल्या पत्रात अमित ठाकरेंनी म्हटलं आहे की, “मुंबई विद्यापिठाच्या पदवीधर मतदारसंघाची सिनेट निवडणूक ‘पुढील आदेश’ येईपर्यंत विद्यापिठाने स्थगित करण अत्यंत धक्कादायक आणि अशोभनीय आहे. ही निवडणूक लढवू इच्छिणारे नोंदणीकृत पदवीधर उमेदवार आज (शुक्रवार, 18 ऑगस्ट) सकाळी आपले उमेदवारी अर्ज विद्यापीठात दाखल करणार होते.”

“केवळ 12 तास आधी, काल (17 ऑगस्ट) रात्री 11 च्या सुमारास विद्यापिठाचे प्रभारी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. सुनील भिरूड यांनी कालच्या शासन पत्राचा संदर्भ देऊन, विद्यापिठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या कालच्याच बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार ही निवडणूक स्थगित केल्याचं जाहीर केलं.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा >> Mumbai University Senate Election : ‘ठाकरे’ लढणार होते विरोधात, पण येणार एकत्र?

“अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, नेमक्या कोणत्या कारणाने निवडणूक रद्द करण्यात आली, हे नमूद करण्याची पारदर्शकता दाखवणेही विद्यापिठाच्या कुलसचिवांना गरजेचे वाटले नाही”, असा संताप अमित ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

“आपल्याला माहितच आहे की, राजकीय-सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुशिक्षितांसाठी सिनेट निवडणूक ही व्यवस्थेत प्रवेश करण्याची पहिली पायरी असते. महाराष्ट्र विद्यार्थी सेनेसह इतरही अनेक विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी या निवडणुकीच्या माध्यमातून विद्यापिठाच्या कारभाराबाबत तसंच महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या गंभीर समस्यांबाबत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करत होते”, असा मुद्दा अमित ठाकरेंनी पत्रात उपस्थित केला आहे.

ADVERTISEMENT

वाचा >> NCP Crisis : अजित पवारांना मिळणार घड्याळ चिन्ह? शरद पवार तसे का बोलले?

“या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या केवळ 12 तास अगोदर ही निवडणूक स्थगित करण्यात आल्यामुळे आता एक वेगळीच शंका उमेदवार तसंच मतदार म्हणून नोंदणी केलेल्या सुमारे 95 हजार पदवीधरांच्या मनात उपस्थित झाली आहे. मुंबई विद्यापीठाचे प्रशासन नेमकं कुणाला घाबरत आहे?”, असा सवाल अमित ठाकरेंनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

ADVERTISEMENT

शिंदे-फडणवीसांचा उल्लेख टाळला, शेलक्या शब्दात सुनावलं…

अमित ठाकरेंनी या पत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख टाळला आहे. मात्र, त्यांचा रोख थेट दोन्ही नेत्यांवर असल्याचे पत्रातून अधोरेखित होत आहे.

अमित ठाकरेंनी पत्रात म्हटलंय की, “राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्या सोयीने सातत्याने पुढे ढकलणारे राज्याचे सत्ताधारी आता सिनेट निवडणुकाही वेळेवर होऊ देणार नसतील, तर त्याचा अर्थ दिल्लीतील सत्ताधीशांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्यांना लोकशाही गाडून हुकुमशाहीनेच कारभार हाकायचा आहे, हे स्पष्ट आहे.”

“महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि मुंबई विद्यापीठाचे पदसिद्ध कुलपती म्हणून आपण या अतिसंवेदनशील प्रकरणात जातीने लक्ष घालावे आणि सिनेट निवडणूक नेमक्या कोणत्या कारणाने रातोरात स्थगित करण्यात आली, हे स्पष्ट करावे, हीच आग्रहाची मागणी”, असं अमित ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे.

“सिनेट निवडणूक रद्द करण्यासाठी आज ‘पहाटे’चा मुहूर्त निश्चित केला नाही, यासाठी कुलपतींचे मनःपूर्वक आभार”, असा चिमटा अमित ठाकरेंनी काढला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT