महाराष्ट्रातले 15 जिल्हे, कोरोना रूग्ण बरे होण्याबाबत ठरत आहेत आशेचा किरण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्या वाढते आहे. दररोज 60 हजार ते 67 हजारांच्या दरम्यान पॉझिटिव्ह रूग्ण आढळत आहेत. अशात महाराष्ट्रातल्या 15 जिल्ह्यांमधलं चित्र आशादायी ठरलं आहे. कारण हे 15 जिल्हे असे आहेत जिथे कोरोना रूग्ण वाढणाऱ्या संख्येपेक्षा बरे होणारे रूग्ण जास्त आहेत. उर्वरित 21 जिल्ह्यांमध्ये मात्र पॉझिटिव्ह रूग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रातल्या एकूण 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमधलं चित्र कोरोनाच्या अंधारातला आशेचा किरण ठरत आहेत.

कोणते आहेत हे 15 जिल्हे ?

१) मुंबई

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

२) पुणे

३) ठाणे

ADVERTISEMENT

४) नाशिक

ADVERTISEMENT

५) बीड

६) नांदेड

७) नागपूर

८) भंडारा

९) अहमदनगर

१०) धुळे

११)नंदुरबार

१२) जळगाव

१३) परभणी

१४) हिंगोली

१५) सिंधुदुर्ग

Corona संक्रमणाची साखळी कशी तोडता येईल? दुसरी लाट कधी संपेल?

या पंधरा जिल्ह्यांमध्ये रूग्ण बरे होण्यांचं प्रमाण हे पॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रासाठी ही नक्कीच समाधानाची बाब ठरली आहे.

२५ एप्रिलला आलेल्या कोरोना अहवालानुसार कोणत्या जिल्ह्यात किती संख्या पॉझिटिव्ह रूग्णांची होती आणि किती रूग्ण बरे झाले ते पाहुयात.

मुंबई

पॉझिटिव्ह रूग्ण 5542

बरे झालेले रूग्ण – 8 हजार 478

पुणे

पॉझिटिव्ह रूग्ण 4631

बरे झालेले रूग्ण 4759

ठाणे

पॉझिटिव्ह रूग्ण 1054

बरे झालेले रूग्ण 1495

नाशिक

पॉझिटिव्ह रूग्ण – 2727

बरे झालेले रूग्ण- 2931

बीड

पॉझिटिव्ह रूग्ण – 1237

बरे झालेले रूग्ण- 1034

अहमदनगर

पॉझिटिव्ह रूग्ण – 3553

बरे झालेले रूग्ण- 3493

धुळे

पॉझिटिव्ह रूग्ण – 204

बरे झालेले रूग्ण- 490

हिंगोली

पॉझिटिव्ह रूग्ण –

बरे झालेले रूग्ण –

नांदेड

पॉझिटिव्ह रूग्ण – 1105

बरे झालेले रूग्ण- 1276

जळगाव

पॉझिटिव्ह रूग्ण – 1097

बरे झालेले रूग्ण- 1070

ऩंदुरबार

पॉझिटिव्ह रूग्ण – 214

बरे झालेले रूग्ण- 808

परभणी

पॉझिटिव्ह रूग्ण – 639

बरे झालेले रूग्ण – 1172

भंडारा

पॉझिटिव्ह रूग्ण – 1238

बरे झालेले रूग्ण- 1368

Corona ची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा वेगळी का ठरते आहे?

या प्रमुख जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णांच्या पॉझिटिव्ह रूग्णसंख्येपेक्षा रिकव्हरी होण्याचं प्रमाण हे गेल्या काही दिवसांमध्ये वाढलं आहे. उर्वरित 21 जिल्हे असे आहेत जिथे मात्र कोरोना रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणापेक्षा पॉझिटिव्ह रूग्णांचं प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्रासाठी ही बाब चिंतेची आहे. तरीही दुसऱ्या लाटेतून आपण नक्कीच बाहेर पडू असा विश्वास प्रशासनाने आणि राज्य सरकारने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात 1 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. कदाचित हा लॉकडाऊन वाढण्याचीही शक्यता आहे. मात्र असं असलं तरीही येत्या काही काळात कठोर निर्बंधामुळे महाराष्ट्रातील रूग्णसंख्या कमी होण्यास मदत होऊ शकते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT