अमरावती हिंसाचार प्रकरणी धरपकड; 100 हून अधिक जणांना अटक, संचारबंदी अंशतः शिथिल
त्रिपुरातील तथाकथित हिंसाचाराच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या बंदला अमरावतीत हिंसेचे गालबोट लागलं होतं. सलग दोन दिवस शहरात हिंसक घटना घडल्यानं प्रशासनाने सध्या संचारबंदी लागू केलेली असून, हिंसाचाराशी संबंधित संशयित आरोपीची धरपकड केली जात आहे. आतापर्यंत 132 हून अधिक आरोपींना अटक करण्यात आली असून, आजपासून अमरावती शहरातील संचारबंदी अंशतः शिथिल केली जाणार आहे. अमरावती शहरात कायदा व […]
ADVERTISEMENT

त्रिपुरातील तथाकथित हिंसाचाराच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या बंदला अमरावतीत हिंसेचे गालबोट लागलं होतं. सलग दोन दिवस शहरात हिंसक घटना घडल्यानं प्रशासनाने सध्या संचारबंदी लागू केलेली असून, हिंसाचाराशी संबंधित संशयित आरोपीची धरपकड केली जात आहे. आतापर्यंत 132 हून अधिक आरोपींना अटक करण्यात आली असून, आजपासून अमरावती शहरातील संचारबंदी अंशतः शिथिल केली जाणार आहे.
अमरावती शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कलम 144 अन्वये संपूर्ण संचारबंदीचे आदेश आहेत. शहरातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन जीवनावश्यक वस्तू व्यवहारासाठी दुपारी 2 ते 4 या वेळेत 2 तासांची मुभा देण्यात आली आहे. अमरावती शहरातील सर्व नागरिकांनी शांतता राखण्याचं आवाहन शहराच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी केलं आहे.
‘हे सुनियोजित षडयंत्र’ अमरावती हिंसाचारावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
दुसरीकडे शहरातील वातावरण बिघडवणे तसेच अनुचित प्रकाराला जबाबदार असलेल्या व्यक्तींविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात 26 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकूण 132 संशयितांना अटक करण्यात आलेली आहे. समाजमाध्यमांद्वारे चुकीच्या माहितीचा प्रसार होऊ नये यासाठी आज रात्रीपर्यंत (16 नोव्हेंबर) सर्व इंटरनेट सेवा बंदच ठेवण्यात आलेली आहे.